हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : म्हणतात ना जिद्द अन चिकाटी असेल तर काहीही अशक्य नाही. अशी काहीशी मनाशी खूणगाठ बांधून अन “आपण असं काही करावं कि एकदातरी जगात आपलं नाव घ्यावं असं करून दाखवाव” असं म्हणत सांगली येथील राहणारे व सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्तलय येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी नुकतंच जगातील सर्वोच्च शिखर ” माऊंट एव्हरेस्ट ” हे सर केलंय. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गुरव यांचे ते बंधू आहेत. संभाजी गुरव यांच्या या सुवर्णमय कामगिरीमुळे त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवलेले आहे. “मिशन एव्हरेस्ट 2021, महिलांचा आदर करा,” या ब्रीद वाक्याखाली पोलीस दलातील संभाजीने माउंट एव्हरेस्टच्या हि मोहीम फत्ते केली आहे.
आपण देशासाठी काही ना काही तरी करायचं अस मनाशी ध्येय बाळगून पोलीस दलात प्रत्येक युवक दाखल होतो. भरती झाल्यानंतर देशाप्रती अतिम प्रेम व कर्त्यव्याची भावना जणू त्या युवकाच्या नसा नसात भिणलेली असते. अशीच भावना मनाशी बाळगून सांगलीचे संभाजी गुरव हे पोलीस दलात भरती झाले. आणि आपल्या कर्तृत्व व जिद्दीच्या जोरावर त्यांनी जगातील सर्वोच्च असलेलं शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल आहे. त्यांच्या या फत्ते केलेल्या मोहिमेचं सध्या पोलीस दलातून चांगलंच कौतुक केलं जात आहे.
https://www.facebook.com/100004354539642/videos/pcb.2165956726892791/2165954380226359
सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले संभाजी गुरव यांनी आतापर्यंत राष्ट्रपती शौर्य पदक, विशेष सेवा पदक, अंतरीक सेवा पदक, डीजी इन्सिग्निया आणि मिशन एव्हरेस्ट हे पुरस्कार प्राप्त केली आहेत. पोलीस दलात कार्यरत असलेल्या संभाजी गुरव यांनी ६ एप्रिल रोजीपासून जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात केली. तब्बल चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर महाराष्ट्र पोलिस दलाचा प्रतिनिधी म्हणून जगातील सर्वोच्च शिखरावर संभाजी गुरव यांनी शिखर सर केल्याची पताका फडकविली आहे.
Hon. Police commissioner, Navi Mumbai flagged off IMF- Indian Everest Massif Expedition 2021.
He interacted with participant API Mr. Sambhaji Gurav and wished him best for Mission Everest- 2021. pic.twitter.com/p68DejSuTT— नवी मुंबई पोलीस – Navi Mumbai Police (@Navimumpolice) April 7, 2021
नवी मुंबई पोलीस आयुक्तलय येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी नुकतंच जगातील सर्वोच्च शिखर ” माऊंट एव्हरेस्ट ” हे पादाक्रांत केलंय. या प्रवासाबद्दल त्यांनी काही प्रसन्गही सांगितले आहेत. त्यामध्ये ते ज्यावेळी माउंट एव्हरेस्ट शिखराच्या पर्यंत ६ हजार फुटांपर्यंत गेले. त्यावेळी बर्फवृष्टी ने त्यांचे स्वागत केले. या शिखरावर जात असताना मोठ मोठ्या बर्फच्या तुकड्यांवर वसलेली ठिकाणे, प्रचंड स्वरूपात जाणवत असलेली थंडी आणि ठीक ठिकाणी असणाऱ्या हिमभेगा शिवाय नेमून दिलेल्या जागे शिवाय कुठेही जाणे धोक्याचे होते. या संबंध प्रवासाच्या दरम्यान गुरव याना छोट्या गॅस वरती बनवलेले अन्न खावे लागले.
https://www.facebook.com/100004354539642/videos/pcb.2180028738818923/2180021512152979
आली ताजच्या चहाची आठवण…
एव्हरेस्ट शिखर सर करताना अनेक आठणींचा उजाळा आल्याचे गुरव सांगतात. ज्यावेळी आम्ही तेंगबुचे (3900 mt) या मुक्कामच्या ठिकाणावरून ट्रेकला सुरुवात केली दोन तासाचे ट्रेक नंतर पांगबुचे या ठिकाणी जेवणासाठी थांबलो. या ठिकाणी थोड गरम काहीतरी प्यावं म्हणुन जिंजर टी घेतला. मी सहज रेटकार्डवर नजर टाकली तेव्हा आश्चर्य चकितच झालो. या कार्डवरील चहाची किंमत हि हॉटेल ताज मधील चहाच्या किमती एवढी म्हणजे 200 रुपये इतकी होती. तेव्हा कळलं कि हॉटेल ताजचा चहा इतका महाग का? थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की जिथुन ट्रेक ची सुरुवात होते त्या लुक्ला या ठिकाणापासून ते एव्हरेस्ट बेस कँपपर्यंत कुठेही वाहन जात नाही. म्हणजे दळणवळणाच कोणतंही सहज उपलब्ध होईल असे साधन नाही,असे गुरव यांनी सांगितले.