सातारा हादरला ! 24 तासात पाच जणांची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : हॅलो महाराष्ट्र – सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी तब्बल पाच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एकाच दिवसात पाच जणांनी केलेल्या आत्महत्येमुळे सातारा जिल्हा मोठ्या प्रमाणात हादरला आहे. या पाच जणांनी कौटुंबिक त्रासाला आणि आजारपणाला वैतागून आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्या केलेले पाचही जण 40 वर्षांच्या खालील आहेत.

आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे
गणपत कणसे ( वय 35, विहे, पाटण )
सुमित गायकवाड ( वय 28,वडगाव हवेली, कराड )
अमोल पाटील (वय 37, सुपने, कराड)
अक्षय इंगवले (वय 27, किडगाव, सातारा)
पोपट ढेडे (वय 40. वाई, भुईंज)

कशा प्रकारे केली आत्महत्या
सुमित सुरेश गायकवाड या तरुणाने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमोल निवासराव पाटील यांनी जनावरांच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणपत कणसे यांनी आजारपणाला कंटाळून घरातच गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. तर वाई तालुक्यातील भुईज येथील पोपट जनार्दन ढेडे यांनी वाईतल्या एमएसईबीच्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये साडीने गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. अक्षय हिंदूराव इंगवले यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Leave a Comment