साथीदाराशी नातं गोड राहण्यासाठी , ”दुरिया भी हे जरुरी ”!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । आनंदी राहण्यासाठी एकत्र राहण्याची बाब आता जुनी झाली आहे. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की जोडपे जो कामाच्या संबंधात एकमेकांपासून दूर राहतात, ते एकमेकांवर अधिक प्रेम करतात आणि त्यांच्यात नेहमीच घनिष्ट नाते असते. कित्येक दिवसांनी जेव्हा ते एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांना याची जाणीव होते.

तथापि, हे अंतर पाच दिवसांपेक्षा जास्त नसावे. यूकेच्या ट्रॅव्हलॉज हॉटेल्सने केलेल्या या सर्वेक्षणात 2000 लोकांनी भाग घेतला. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, दर दहापैकी चार लोक त्यांच्या नात्याबद्दल आनंदी आहेत, जे त्यांच्या कामामुळे आपल्या साथीदारांपासून दूर राहतात.

खरंतर एकमेकांपासून कामानिमित्त दूर राहणारे जोडपे हे दिवसभर बाहेरच्या जगाचा सामना करत असतात . आयुष्याच्या या स्ट्रगल नंतर आपल्या साथीदाराच्या सहवासात गेल्या नंतर एक सेफ झोन मिळतो . त्या व्यक्तीची ओढ कायम राहते . आपल्या सुख-दुःखात आपल्या खांद्याला खांदा लावून लढणारा साथीदार हा सर्वस्व होतो पण त्यासाठी ”दुरिया भी हे जरुर” … !

Leave a Comment