राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते राष्ट्रपती; रामनाथ कोविंद यांचा थक्क करणारा जीवणप्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज वाढदिवस. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते राष्ट्रपती हा रामनाथ कोविंद यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मूळचे कानपूरचे असलेले कोविंद यांच्यावर मोरारजी देसाई यांचे सरकार असताना मोठी जबाबदारी होती. भाजपच्या मागासवर्गीय आघाडीचे नेतृत्व त्यांनी केले आहे. दोन वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले ७१ वर्षीय कोविंद राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निश्चित होण्याआधी बिहारचे राज्यपाल होते. जाणुन घेऊयात कोविंद यांचा संपुर्ण जीवणप्रवास.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते राष्ट्रपती हा रामनाथ कोविंद यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मूळचे कानपूरचे असलेले कोविंद यांच्यावर मोरारजी देसाई यांचे सरकार असताना मोठी जबाबदारी होती. भाजपच्या मागासवर्गीय आघाडीचे नेतृत्व त्यांनी केले आहे. दोन वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले ७१ वर्षीय कोविंद राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निश्चित होण्याआधी बिहारचे राज्यपाल होते. विविध संसदीय समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती कल्याण, गृह, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, कायदा आणि न्याय या समित्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात मायावतींना आव्हान देण्यासाठी भाजपने दलित समाजातील कोविंद यांना मैदानात उतरवले होते. रामनाथ कोविंद हे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी भाजपमध्ये विविध पदांवर काम केले आहे. कोविंद यांनी २००२मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण केले असून विविध देशांना भेटीही दिल्या आहेत.

महत्वाचे टप्पे –

ऑक्टोबर १९४५ रोजी कानपूरमधील छोट्या गावात दलित कुटुंबात जन्म.

कानपूर विद्यापीठातून कॉमर्स आणि कायद्याची पदवी.

१९७७ ते १९७९ दरम्यान दिल्ली हायकोर्टात केंद्र सरकारचे वकील.

१९८० ते १९९३ दरम्यान केंद्र सरकारच्या स्टँडिंग कौन्सिलवर काम.

दिल्ली हायकोर्ट, तसेच सुप्रीम कोर्टात सुमारे १६ वर्षे वकिली.

१९९८ ते २००२ या काळात भाजप दलित मोर्चाचे अध्यक्षपद सांभाळले.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही जबाबदारी सांभाळली.

१९९४ ते २००० आणि २००० ते २००६ अशी १२ वर्षे राज्यसभेचे सदस्य.•८ ऑगस्ट २०१५ रोजी बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.

एप्रिल १९९४ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती. मार्च २००६ पर्यंत, सलग १२ वर्षं खासदारकी.

अखिल भारतीय कोळी समाजाचेही ते अध्यक्ष होते.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही जबाबदारी सांभाळली.

लखनऊमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि कोलकात्याच्या आयआयएममध्ये ते बोर्ड मेंबर होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment