Success Story | मिश्र शेतीतून शेतकऱ्याने वर्षाला कमावले 15 लाख रुपये; असे केले नियोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story | आजकाल अनेक तरुण लोक देखील शेती व्यवसायात उतरत आहेत. त्यामुळे ते पारंपारिक पद्धतीने शेती न करता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. अनेक आधुनिक पद्धतीच्या पिकांची लागवड देखील आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहे. अशाच एका शेतकऱ्याची आपण कहाणी जाणून घेणार आहोत. या शेतकऱ्याचे नाव श्याम सिंह असे आहे. मध्य प्रदेशात राहणाऱ्या या शेतकऱ्याने आपल्या मिश्र शेतीतून उत्पन्न चांगले घेतले आहे. आणि त्या शेतकऱ्याला वर्षाला 15 लाख रुपये नफा होत आहे.

शाम सिंग यांच्याकडे 9 एकर एवढी जमीन आहे. यातून ते दरवर्षाला जवळपास 15 लाख रुपये नफा कमवतात. त्यांनी मिश्र शेती करून हे यश मिळवलेले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही एक प्रेरणा मिळालेली आहे. मिश्र शेती ही एक अशा प्रकारची शेती आहे, ज्यामध्ये पिके घेण्याव्यतिरिक्त पशुपालनाचा ही समावेश असतो. आशियावमध्ये भारत, मलेशिया, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, चीन , युरोप, कॅनडा, रशिया या सारख्या देशांमध्ये या प्रकारची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

श्याम सिंग यांचे नियोजन | Success Story

श्याम सिंग हे सध्या या मिश्र शेतीतून लाख रुपये कमवत आहेत. आत्मा प्रकल्पात सेंद्रिय आणि कृषी विविधीकरणाच्या मदतीने त्यांनी 9 एकर शेत जमिनीवर ही शेती केल्याचे सांगितले. त्यांनी दोन एकर शेतीमध्ये भाजीपाला लावलेला आहे. 4 एकरावर धान्य आणि 2 एकर जमिनीवर फळझाडे लावलेली आहे. तर उरलेली जमीन ही जमिनीवर त्यांनी सेंद्रिय तयार केलेले आहे.

पॉलिहाऊसमध्ये केला भाजीपाला

श्याम सिंग यांनी पॉलिहाऊस देखील तयार केलेले आहे. यामध्ये त्यांनी अनेक भाजीपाल्यांची लागवड देखील केलेली आहे. यातून त्यांना चांगलाच नफा मिळालेला आहे. यामध्ये त्यांनी पालकाची लागवड देखील केलेली आहे. त्यांनी 2 एकर जमिनीवर 100 ते 125 क्विंटल एवढ्या पालेभाज्या मिळत आहेत. त्यांच्या या सेंद्रिय भाज्यांना खूप जास्त मागणी आहे.

पशुपालन

श्याम सिंग हे शेती सोबत पशुपालनही करत आहे. त्यामुळे गावात दररोज 60 ते 70 लिटर दुधाची ते विक्री करतात. यातून त्यांना दर महिन्याला 1 लाख 26 रुपये एवढा नफा होतो. त्यांनी सेंद्रिय खत बनवण्याचे प्रशिक्षण देखील घेतलेले आहे. त्यांनी वर्मी कंपोस्ट खत तयार केलेले आहे. ज्याचा शेतीला खूप चांगला फायदा होतो.