सरकारच्या दमनशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे – शरद पवार

मुंबई । जेएनयूमध्ये जे घडले ते योग्य नव्हते, म्हणून त्याचा सर्वत्र विरोध होत आहे. लोक सरकारवर संतप्त आहेत म्हणून देशात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. सरकारी दडपशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई येथे आज शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आदी … Read more

शरद पवारांच्या संमतीशिवाय सरकार बनलं हे पवारांना सिद्ध करावं लागेल – आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | अजित पवार यांनी आज भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

लोकांनी माझे एकले असते तर आजचा सुखद धक्का त्यांना बसला नसता असं म्हणत प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलीय. तसेच शरद पवार हे खरोखर पुरोगामी आहेत काय हे आता त्यांना सिद्ध करावं लागेल. आज बनलेलं सरकार हे शरद पवारांच्या संमतीशिवाय बनले आहे हे शरद पवारांना सिद्ध करावं लागेल असंही आंबेडकर यावेळी म्हणालेत.

दरम्यान तीन दिवसांपूर्वीच शिवसेनेचा पोपट होऊ शकतो असं मी म्हणालो होतो. आज उल्लू कोण कोण बनलं असं तुम्ही विचाराल तर काँग्रेस आणि शिवसेना हे उल्लू बनले आहेत असं आंबेडकर यांनी सांगितले.

शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला नाही हे सिद्ध केलं पाहिजे - प्रकाश आंबेडकर

इतर महत्वाच्या बातम्या –

काँग्रेसने केवळ कामाची पाटी लावली तर भाजपने अनेक कंपन्या बंद पाडल्या -प्रकाश आंबेडकर

ज्यावेळी काँग्रेसची सरकार होती त्यावेळी त्या सरकारने प्रत्यक्षात विकास कामे करण्याऐवजी केवळ त्या कामाची पाटी लावण्याचे काम केले आहे. तर आजच्या भाजपच्या राजवटीत या सरकारने अनेक कंपन्या बंद पाडून राज्यातील जवळपास आठ लाख कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आज संधी आपल्याकडे आली आहे. त्यामुळे मतदारांनी वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा, आमचा पक्ष तुमच्यासाठी कार्य करेल असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उमरगा  येथील सभेत केले.

“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”- प्रकाश आंबेडकर

“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी घनसांगवीत बोलतांना केला. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार विष्णू शेळके यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची जालना जिल्ह्यातील घनसावंगी मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

पुर्वीचे आघाडी शासन म्हणजे भुरटे चोर होते तर आताचे सत्ताधारी डाकू आहेत – प्रकाश आंबेडकर

पूर्वीचे आघाडी शासन म्हणजे भुरटे चोरटे होते तर आताचे सत्ताधारी डाकू आहेत. आघाडीतील पक्ष हाती लागेल ते घेऊन जायचे, आताचे सत्ताधारी संघटीतपणे भ्रष्टाचार करतात’ अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजप सरकार केली. आज पाथरी व परभणी येथील वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजीत जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली.

मला एकदा पकडूनच दाखवा, प्रकाश आंबेडकरांच सरकारला खुले आव्हान

उस्मानाबाद प्रतिनिधी | अजित माळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची आज कळंब येथे उस्मानाबाद मतदारसंघाचे उमेदवार धनंजय शिंगाडे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. हे सरकार त्यांच्या विरोधात बोलनाऱ्यावर कारवाई करत आहे. जो विरोधात बोलतोय त्यांच्यावर देशद्रोहाची कारवाई करतायेत. मी सरकारला आव्हान करतो मला एकदा पकडूनच … Read more

‘काँग्रेस हे भुरटे चोर तर भाजपवाले डाकू आहेत’- प्रकाश आंबेडकर

“काँग्रेस म्हणजे भुरटे चोर होते, तर भाजपवाले डाकू आहेत”, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. आंबेडकर चंद्रपूरमधील बल्लारपुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. “आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे काँग्रेस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी चर्चेची वाट बघत होते,” असा धक्कादायक खुलासाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

जालन्यात प्रकाश आंबेडकरांच्या अटकेचे पडसाद, ‘वंचितसेना’ रस्त्यावर

आरे येथील जंगलतोडी विरोधात रस्त्यावर उतरलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज जालन्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली.

ओवेसींनी घेतली ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांची भेट, ‘बाळासाहेबांना’ समजावण्याची घातली गळ

औरंगाबाद प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज अखरेचा दिवस आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची एकत्र निवडणुक लढवण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामागचे कारण म्हणजे, औरंगाबाद येथे एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीत ओवेसी यांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांना आघाडीसाठी समजावण्याची विनंती केली. याबाबत सविस्तर वृत्त … Read more

शेतकरी आत्महत्येला शेतकरीच जबाबदार- प्रकाश आंबेडकर

यवतमाळ प्रतिनिधी। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी शेतकरीच जबाबदार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी विवादास्पद वक्तव्य केलं आहे. यवतमाळ इथं बोलतांना त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. शेतकरी जात पाहून मतदान करतो. त्यामुळं शेतकऱ्याची ही अवस्था आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान केल्यास कापसाला हमी भावाप्रमाणे पैसे मिळतील. तर जात पाहून मतदान केल्यास 3500 रु प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळणार. असं म्हणून … Read more