सोलापूर मधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदान व्यवस्थित पार पडत आहे, तसेच नागरिकही मोठ्या उत्साहात मतदानाला जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु सोलापूर मधील सूतगिरणी परिसरात राहणाऱ्या सुमारे १ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधीना मतदान करूनही आपल्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत म्हणून हे पाऊल उचललं असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

सोलापुरात मतदान केंद्रात शिरले पाणी; मतदानावर परिणाम

या विधानसभा निवडणुकीमध्ये निसर्गाने उमेद्वारांचीच नाही तर मतदारांनचीही परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. यंदा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने कहर केला आहे. अद्यापदेखील राज्यात पावसाच्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचारादरम्यान देखील पावसाने अनेक सभा, रॅलीचे नियोजन फिस्कटवले. काही सभा आणि रॅली भर पावसात देखील पार पडल्या.

पालघर जिल्ह्यात सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात

पालघर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्या पासून मतदानाला सुरवात झाली आहे. जिल्यात एकूण एकूण-19 लाख 51 हजार 668 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यातील नालासोपारा विधान सभेत 2 लाख 86 हजार 4 पुरुष, तर 2 लाख 33 हजार 20 स्त्रिया आणि  इतर- 58 असे  एकूण-5 लाख 19 हजार 82 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदान करणाऱ्यांना सरकारकडून सर्वात जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार – मुख्यमंत्री फडणवीस

मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे’ नागरिकांना आवाहन केले. तसेच ‘प्रत्येकाला सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे.’ मतदान करणाऱ्यांना सर्वात जास्त अधिकार आहे. सर्वांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करावं’ असे आवाहन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे

भंडाऱ्यात मतदानाला सुरवात, १० लाख मतदार बजावणार हक्क

आज राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असून, सकाळी सात वाजल्यापासून राज्यात सर्वत्रच मतदानाला सुरवात झाली आहे. भंडारा जिल्हातील तीन मतदार संघात १ हजार २०६ मतदार केंद्र आहेत. तर या मतदार संघात एकूण ९ लाख ९१ हजार ८९० मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. नागरिकांना मतदान व्यवस्थित करता यावे तसेच कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५ हजार २०२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २ हजार ३७५ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ‘ईव्हीएम’मध्ये नोंद होणार

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१०० टक्के मतदान झालं पाहिजे – मोहन भागवत

मतदानानंतर मोहन भागवत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांना निवडणुकीच्या मतदानाचे महत्व समजावून सांगितले आहे. तसेच १०० टक्के मतदान हे झाले पाहिजे असं देखील आवाहन केले आहे.

‘मतदान करा, भरघोस सूट मिळवा’ !! त्वरा करा!

मतदारांनी मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून लढवल्या जातात. नागपूर प्रशासनान विधानसभेसाठी असाच एक अभिनव उपक्रम केला आहे. मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या परिक्षेत्रातील रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये भरघोष सूट मिळवा. अशी युक्ती लढवली आहे.