राज्यसरकारने भटके विमुक्त व ओबीसींची दिशाभूल थांबवावी -डॉ. धर्मराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात अली. डॉ. धर्मराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात अली. भटके विमुक्तांचे व ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व हलगर्जीने रद्द झाले. असे चव्हाण यांचे म्हणणे आहे .

ओबीसीच्या व भटके विमुक्तांच्या नावाखालीजे आरक्षणाचे लढे उभे राहत आहेत. ते सर्व लढे जनतेची दिशाभूल करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आखलेला डाव आहे. आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना कोर्टाने मागितलेला इम्पेरीयल डाटा राज्यसरकारने सादर केला नाही. तसेच आवश्यक माहिती न दिल्याने आरक्षण रद्दची झळ भटके विमुक्त व ओबीसींना सोसावी लागत आहे. राज्य सरकार स्वताचा हलगर्जीपणा झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. अथवा रोहिणी आयोग स्वीकारण्यात यावा व ओबीसींचे त्रिस्तरीय वर्गीकरण करावे. असे ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणले.

यावेळी, जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम योगेश गुलाबराव बन, जिल्हा सदस्य औरंगाबाद पश्चिम श्रीरंग ससाणे, शैलेन्द्र मिसाळ, पंडितराव तुपे आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment