शांततेचं श्रेय जम्मू काश्मीरमधील लोकांना – अल्ताफ बुखारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतरही शांतता नांदण्यासाठी कुणी जास्त सहकार्य केलं असेल तर ते जम्मू काश्मीरचे लोक आहेत असं म्हणत जम्मू काश्मीरमधील नेते अल्ताफ बुखारी यांनी इथल्या लोकांचं कौतुक केलं आहे.

वातावरण शांत करण्याचं नियोजन करणाऱ्या लोकांनाही धन्यवाद द्यायला हवं असं बुखारी यावेळी म्हणाले. रस्त्यांवर जर प्रेताचा सडा पडला असता तर वातावरण भयानक झालं असतं म्हणूनच काश्मीरींच्या समजूतदारपणाला दाद द्यायला हवी असं बुखारी पुढं बोलताना म्हणाले.

अल्ताफ बुखारी हे पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे माजी नेते आणि जम्मू-काश्मीर राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री आहेत.  त्यांनी विविध प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांच्या 30 नेत्यांसमवेत नवीन पक्ष स्थापन केला आहे.

Leave a Comment