Sunday, March 26, 2023

विजेच्या तारेला पकडून तरुणाने केली आत्महत्या

- Advertisement -

औरंगाबाद | खुलताबाद तालुक्यातील येथील तरुणाने विजेच्या तारेला धरून आत्महत्या केल्याचा घटना समोर आली आहे. पवन मनोहर निळ (वय 26) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पवन याने गट नंबर 96 मधील सुखदेव चव्हाण यांच्या शेतातील विहिरी वर असलेले विद्युत चार हातात धरून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बाजार सावंगी पोलीस चौकीचे पोलीस नाईक विनोद बिघोत, योगेश नाडे, संतोष पुंड, पोलीस पाटील सुलभा सचिन गिरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला बाजार सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.