राष्ट्रवादीत मला काय मिळालं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी दिल्ली येथे भाजप मध्ये प्रवेश केला. यानंतर महाराष्ट्रात परतल्यानंतर राष्ट्रवादीत मला काय मिळालं ठेंगा असा सवाल उपस्थित करत भोसले यांनी आपण जनतेच्या भल्यासाठी भाजपात गेलो असल्याचं सांगितले.

शेवटी सहनशिलता असते. एक – दोन नव्हे तब्बल पंधरा वर्षांत मला काहीच मिळालं नाही. ज्यांनी वीस वीस वर्ष पदं उपभोगली ते गेले सोडून आणि मी का जाऊ नये असे म्हणत जर भाजपात जाऊन जनतेची कामे होणार असतील तर का जाऊ नये असा प्रतिप्रश्न भोसले यांनी केलाय.

मतदार संघाचा विकास करणे हे माझं मुख्य उद्दीष्ट आहे. तो आत्तापर्यंत झाला असता तर आज ही वेळ आली नसती असंही उदयनराजे यांनी यावेळी म्हटलंय.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

EVM वर विश्वास नाही असं म्हणणार्‍या उदयनराजेंचा भाजपात प्रवेश

तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम

Leave a Comment