हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Uddhav Thackeray Attack On Bjp । भाजप म्हणजे बोगस जनता पार्टी, त्यामुळे आपलं मत चोरी होणार नाही याची दक्षता घ्या, प्रामाणिक निवडणूक घेतली तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाही, जे जिंकले आहेत त्यांचे राहुल गांधी यांनी यांचे ढोंग उघडे पाडले अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच जर रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, तर मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं? असा सवालही ठाकरेंनी केला. राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला.
तुमचा गरम सिंदूर कुठे गेला? Uddhav Thackeray Attack On Bjp
उद्धव ठाकरे म्हणाले, पाकिस्तानच्याविरुद्ध कोणीही बोलायला तयार नाही, पण त्याच पाकिस्तान सोबत आता आपण क्रिकेट खेळणार आहोत. पाकिस्तासोबत तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी कशी देता? आपल्या हिंदुस्थानची टीम ही पाकिस्तानविरुद्ध आता क्रिकेटचा सामना खेळणार, मग तुमचा गरम सिंदूर कुठे गेला? देशाच्या सैनिकांनी शौर्य गाजवून भाजप त्यांचे श्रेय घेत आहे. सोफिया कुरेशी या सैन्य अधिकाऱ्यांना आतंकवाद्यांची बहीण म्हणणारे भाजपचे गधडे आहेत. तरीही ते डोक्यावर मंत्री म्हणून बसलेत. एवढच नव्हे तर आपलं शिष्टमंडळ संपूर्ण जगात गेलं, एकेक खासदार घेतले आणि जगभर पाठवले, पण एक तरी देश आपल्या बाजूने उभा राहिला का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. Uddhav Thackeray Attack On Bjp
मग आता काय जगभरात पुन्हा शिष्टमंडळ पाठवणार का ? नाही नाही, आमच्या पहिल्या शिष्टमंडळाचं म्हणणं खोटं होतं, आता या शिष्टमंडळाचं म्हणणं खरं आहे असं सांगणार का? पाकिस्तान हा चांगला गुणाचा पुतळा आहे, आम्ही त्यांच्यासोबत आता क्रिकेट खेळत आहोत,असं ऐकवणार का ?? अशा शब्दात ठाकरेंनी (Uddhav Thackeray Attack On Bjp) संताप व्यक्त केला. आम्हाला खेळ महत्वाचा वाटतो, देश महत्वाचा वाटत नाही, हेच देशाचं दुर्दैव आहे. त्यामुळे अशी बोगस जनता पक्षाची लोकं आपल्या डोक्यावर घेऊन आपला देश त्यांच्या हातात दिला आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर चौफेर हल्ला केला.




