Vande Bharat Express : सुसाSSS ट …! राज्यातील पहिली सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ सुरु होणार ‘या’ तारखेपासून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Express : स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ भारतात अनेकांच्या पसंतीला उतरली आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास देणारी ट्रेन म्हणून ही ट्रेन लोकप्रीय आहे. वंदे भारताच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबरी आहे. लवकरच मुंबई ते अहमदाबाद ही पहिली सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस 160 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे. तसे पाहायला गेले तर राज्यातील इतर ट्रॅकवर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे स्पीड हे जवळपास 130 किलोमीटर प्रति तास आहे.. मात्र मुंबई ते अहमदाबाद रूटवर धावणारी सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ही 160 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे.

एका इंग्रजी माध्यमाच्या रिपोर्टनुसार, मुंबई अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ही 15 ऑगस्ट पासून 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे. रेल्वे बोर्डाने मुंबई ते वडोदरा डिव्हिजनला 30 जून पर्यंत आवश्यक काम पूर्ण करण्यासाठी आदेश दिले आहेत. तसेच कन्फर्मेट्री ओसिलोग्राफ कार चालवण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत. तसे पाहायला गेले तर मुंबई ते अहमदाबाद हे 491 किलोमीटरचे अंतर वंदे भारत एक्सप्रेस ने (Vande Bharat Express) पाच तास 15 मिनिटात कापता येते मात्र गतीमध्ये आणखी वाढ केल्यास 30 मिनिटांची बचत होणार आहे.

काय असेल वेळ? (Vande Bharat Express)

या रूट वरून सध्या वंदे भारत ट्रेन चालवल्या जातात एक ट्रेन रविवारी आणि दुसरी वंदे भारत बुधवारी सोडून इतर 6 दिवशी वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जातात. मुंबई अहमदाबाद रूट वर जाणारी ट्रेन क्रमांक 22 92 अहमदाबाद मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस अहमदाबादहून सहा वाजून दहा मिनिटांनी रवाना होते आणि अकरा वाजून 35 वाजता मुंबई सेंट्रल इथे पोहोचते. ही ट्रेन सकाळी 11:35 वाजता मुंबई सेंट्रल ला पोहोचण्याच्या आधी वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली अशा काही स्थानकांवर थांबते. परतीच्या प्रवासामध्ये ट्रेन क्रमांक 22 961 सेंट्रल मुंबई अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मुंबई सेंट्रल हून 15:55 वाजता रवाना होते आणि 21:25 बसा अहमदाबाद मध्ये पोहोचते. या ट्रेनमध्ये बडोदरा, सुरत, वापी आणि बोरवली अशी स्थानक येतात.