Viral Video | अशाप्रकारे 1 मिनिटात धबधबा घेतो अक्राळ विक्राळ रूप; व्हिडिओ पाहून चुकेल काळजाचा ठोका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | पावसाला सर्वत्र सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी धबधबे, धरणे वाहत आहेत. आणि याच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटन देखील ठिकठिकाणी भेट देत आहेत. परंतु निसर्गाच्या सौंदर्यात लोक इतके हरवून जातात की, ते स्वतःच्या सुरक्षितेकडे लक्ष देत नाही. आणि त्यांचा जीव धोक्यात टाकतात. नुकतेच लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना आहे. त्यानंतर ताम्हिणी घाटात एका तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. सोशल मीडियावर (Viral Video) या दोन्ही घटनांचे व्हिडिओ खूप व्हायरल होता आहेत. पण तरी देखील लोक आपल्या जीव धोक्यात घालून या ठिकाणी भेट देतात.

अनेकवेळा आपल्याला निसर्गाचे चक्र माहीत नसतात. आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते होते. झालेल्या अपघातानंतर या प्रशासनाने देखील खूप काळजी घेतलेली आहे. लोकांच्या डोळ्यासमोरून ते पाच लोक वाहून गेले. तरी देखील कोणाला काहीच करता आले नाही. कारण हे एक नैसर्गिक संकट होते. पाण्याचा वेग इतका वाढला की, ज्यापुढे लोकांना काही अर्थ आले नाही. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ चर्चेत आहे. ज्यामध्ये एका मिनिटात धबधब्याचे पाणी कसे वाढते हे पाहायला मिळते.

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे लोकेशन माहीत नाही. त्या व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, “मिनिटात धबधब्याचे पाणी कसे वाटते ते बघा व्हिडिओ आपल्याकडील नसेल, तरी धबधब्याची परिस्थिती सारखीच असते सावध रहा अवास्तव धमकी नको.”

https://www.instagram.com/reel/C89owojozyu/?utm_source=ig_embed&ig_rid=28417893-ed9c-42f2-818e-51d6e3da85ba

सोशल मीडियावर व्हायरल येणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक धबधबा दिसत आहे. तिथे सुरुवातीला खडकाळ भागातून पाणी वाहताना दिसत आहे. सुरुवातीला या पाण्याचा वेग अगदी शांत असतो. त्यानंतर धबधब्याचे पाणी मागून उंच लाटांमधून कोसळताना दिसत आहे. आणि अगदी क्षणातच पुढच्या डोंगरावरील पाणी वाढते. आणि काही सेकंदात हा धबधबा मोठ्या स्वरूपात व्हायला लागतो. जोरदार पाण्याचा प्रवाह देखील वाहतो. अशाप्रकारे काही मिनिटातच धबधब्याचे पाणी वाढते. आपण जर अशा ठिकाणी फिरायला गेलेलो असेल, तर आपल्याला वरून येणाऱ्या पाण्याचा काहीच अंदाज नसतो. यासोबत आपली जीवितहानी देखील होऊ शकते. त्यामुळे लोकांनी फिरायला जाताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे.