नांगरे पाटलांनी केले भावनिक आवाहन अन हिंसक जमाव झाला स्तब्ध

2
51
Thumbnail 1533036640528 1
Thumbnail 1533036640528 1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चाकण | मराठा आंदोलकांकडून काल दिनांक ३० जुलै रोजी पुणे जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. चाकण परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याठिकाणी पोलिसांच्या गाड्यांची अक्षरशः राख करण्यात आली. अजय भापकर नावाचे पोलीस शिपाई गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. दाखल केल्यानंतर दोनच तासात ते कोम्यात गेले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने कोल्हापुर परिक्षेत्राचे म्हानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चाकण मध्ये रिक्षांने फिरुन आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करू लागले. व्यवस्थेची वाताहत पाहून नांगरे पाटील ही भावनिक झाले आणि आंदोलकांना म्हणाले मोठा भाऊ समजून माझं ऐका! असे म्हणताच आंदोलक शांत झाले आणि शहरात शांतता प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.
चाकण औद्योगिक वसाहतीचा पट्टा असल्याने तेथील लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे. औद्योगिक वसाहत पट्टा असल्याने या भागात शांतता प्रस्तापित होणे अत्यंत आवश्यक आहे. चाकण परिसरात पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अतिरिक्त कुमक मागवून शांतता राखण्यास मोठी कसरत केली. आज दिवस भरात काही अपवाद वगळता शांततेत सर्व नागरी कारभार सुरळीत पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here