Weather Update | वीज, वाऱ्यासह आज महाराष्ट्राला पावसाचा धोका; हवामान विभागाने दिला इशारा

0
1
Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | मागील आठवड्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे. परंतु सध्या संपूर्ण राज्यात ऊन सावलीचा खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे. तर काही ठिकाणी मात्र ऊन आहे. यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत बहुतांश ठिकाणी पाऊस पडलेला आहे. परंतु आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अजूनही काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आज म्हणजेच 31 ऑगस्ट 2024 रोजी आणि ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार आहे.

हवामान विभाग हे पावसाबद्दल रोजच माहिती देत असतात. आज देखील हवामान विभागाने राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पाऊस (weather Update) पडणार आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. या ठिकाणी सोसाट्याचा वारा देखील असणार आहे वाऱ्याचा वेग 30 ते 40 प्रति तास एवढा असणार आहे. तसेच आज विदर्भात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाची शक्यता |Weather Update

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी परतीचा मान्सून हा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पडण्याची शक्यता आहे. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. यामध्ये ला निनोमुळे कमी दाबाचा पट्टा होऊन तयार होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत परतीचा मान्सून प्रवास असणार आहे. यावेळी ला निनाच्या प्रभावामुळे मान्सून जास्त काळ राहणार आहे. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

यावर्षी नेहमीपेक्षा जास्त पाऊस (weather Update) झालेला आहे आत्तापर्यंतच्या सरासरी पेक्षा 7 टक्के पाऊस हा देशात जास्त झालेला आहे. परंतु जर सप्टेंबर आणि ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहिला, तर सोयाबीन, मका, कापूस यांसारख्या पिकांवर मात्र त्याचा मोठा परिणाम होणार आहे. तसेच जमिनीत ओलावा राहिल्यामुळे खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना मात्र फायदा होणार आहे. त्यामुळे या पावसाचा एकीकडे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर दुसरीकडे तोटा देखील सहन करावा लागणार आहे.