कश्मीर कधी पाकिस्तानचे होते..? पाकिस्तान तर पहिले भारताचाच हिस्सा होता – संरक्षणमंत्री राजनाथसिंह

0
29
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली प्रतिनिधी । “कश्मीर कधी पाकिस्तानचे होते..? आज जो पाकिस्तान बनला आहे , तो तर पहिले भारताचाच हिस्सा होता. आता ते राष्ट्र बनले आहे, म्हणून आम्ही त्यांच्या राष्ट्रांचा आदर करतो. मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांनी कश्मीर बाबत काहीही विधान करावे” अशा शब्दात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला सुनावले.

आज लद्दाख़ येथे संरक्षण विभागाच्या ‘डीआरडीओ’च्या ‘किसान जवान विज्ञान मेळा’ आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कश्मीर आमचे होते यावर देशात कधीही कोणतीच शंका नव्हती. कारण हा आमचाच प्रदेश होता. मात्र गिलगिट-बाल्टिस्तान सह त्यांनी पाकव्याप्त कश्मीर वर गैर कानूनी कब्ज़ा केला आहे. तसेच तेथील नागरिकांच्या मानवी अधिकारांचे शोषण केले जात आहे यावर पाकिस्ताने लक्ष द्यावे, अशी समज त्यांनी यावेळी पाकिस्तानला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here