‘या’ कारणामुळे औरंगाबाद शहरात झपाट्याने वाढतायत कोरोनाचे रुग्ण

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मागील तीन दिवसांत शहरातील रुग्णसंख्या तिपटीने वाढल्याने अनेकांना यामुळे काळजी वाटू लागली आहे. मात्र जास्त कोरोना चाचण्या झाल्यामुळे रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचा खुलासा मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी केला आहे.

प्रति दहा लाख व्यक्तीमागे भारतात मुंबईनंतर सर्वात जास्त टेस्ट औरंगाबाद शहरात होत असल्यामुळे तसेच कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला टास्क फोर्स च्या मदतीने आपल्या संरक्षणात घेऊन त्याची लगेच चाचणी केल्यामुळे मागील तीन दिवसात शहरात अचानकपणे कोरूना बाधितांची संख्या वाढल्याचे दिसत आहे अशी माहिती मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे. कोरोना या रुग्णांची शहरात मागील तीन दिवसात अचानकपणे वाढ झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शहरात संशयितांचे टेस्टिंग मध्ये झालेली वाढ आहे तसेच कोरुना बाधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी टास्क फोर्सचे गठण करण्यात आले आहे.

कोरुना रोगाचा प्रभाव रोखण्यासाठी डब्ल्यूएचओ टेस्टिंग च्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भारतात प्रति दहा लाख व्यक्ती मागे मुंबई नंतर औरंगाबाद शहरात सर्वात जास्त टेस्ट होत आहे. यामुळे अचानक शहरात रुग्णांची संख्या वाढली आहे. शहराची टेस्टिंग कॅपॅसिटी वाढली असून प्रत्येकी दहा लाख व्यक्ती मागे तीन हजार लोकांचे टेस्ट शहरात होत आहेत. तसेच शहरात जास्तीत जास्त नागरिकांचे टेस्ट करावे त्यातील पॉझिटिव्ह रुग्णाचे उपचार करावे त्यानंतरच हा रोग आटोक्यात येईल म्हणून या मॉडेल नुसारच आम्ही काम करत आहोत अशी माहिती असते कुमार पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here