राहुल द्रविडने पुन्हा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज का केला नाही? जय शहांचा मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. राहुल द्रविडने 2021 च्या अखेरीस टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला मोठं यशही मिळाले. त्यामुळे जर द्रविडची इच्छा असती तर तो पुन्हा एकदा भारतीय संघाचा कोच बनू शकला असता, मात्र त्याने अर्ज भरला नाही. यामागे नेमकं कारण काय होते ते आता बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी मोठा खुलासा केला आहे.

कौटुंबिक बांधिलकीमुळे आपण पुन्हा एकदा प्रशिक्षक पदासाठी अर्ज भरू इच्छित नाही, त्यामुळे मला प्रशिक्षकपदावरून पायउतार व्हायचे आहे असं आपल्याला राहुल द्रविड यांनी सांगितलं असल्याच्या खुलासा जय शाह यांनी केला. राहुल द्रविड यांच्या या निर्णयाचा आपण आदर केला आणि त्यांच्यावर पुन्हा प्रशिक्षक होण्यासाठी मी कोणतीही जबरदस्ती केली नाही असं जय शाह यांनी सांगितलं. राहुल द्रविड यांनी साडेपाच वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. ते तीन वर्षे एनसीएचे संचालक होते आणि गेली अडीच वर्षे ते टीम इंडियाचे प्रशिक्षक होते असं म्हणत जय शाह यांनी राहुल द्रविड यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ दोन वर्षांचा होता. 2023 मधील ५० षटकांच्या एकदिवसीय विश्वचषक-2023 नंतर त्यांचा कार्यकाळ संपत होता, परंतु टी-20 विश्वचषक-2024 जवळ येत असल्याचे पाहून बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ वाढवला. बीसीसीआयचा हा निर्णय योग्य ठरला आणि त्याच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने टी-20 विश्वचषक जिंकला. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची जोडी चांगलीच जमली होती. दोघांचा स्वभाव शांत असल्याने एकमेकांना समजून घेणं त्यांना सोप्प पडलं. त्याचा संपूर्ण परिणाम भारतीय संघावर झाला आणि राहुल- रोहित जोडगोळीने एक मजबूत भारतीय क्रिकेट संघ तयार केला.