ई-केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा 11वा हप्ता मिळणार की नाही?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । 12 कोटी लाभार्थी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळालेल्या रकमेच्या 11व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र या योजनेंतर्गत असे अनेक रजिस्टर्ड शेतकरी आहेत, ज्यांच्यासमोर या रकमेबाबत अडचण निर्माण झाली आहे.

वास्तविक, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसीची शेवटची तारीख 31 मार्च 2022 होती जी 31 मी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र आता समस्या अशी आहे की, सध्या किसान पोर्टलवर ई-केवायसीचा पर्याय दिसत नाही. सरकारने ते काही दिवस पुढे ढकलल्याचेही वृत्त आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही त्यांना पुढील हप्ता मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांनी आता काय करावे ?
आता किसान पोर्टलवर ई-केवायसीचा पर्याय दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी काय करावे? तर अशावेळी तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन तुमचे ई-केवायसी करून घेणे. मात्र, तिथे खूप गर्दी पाहायला मिळते. दुसरीकडे, तुमच्याकडे वाट पाहण्याचा दुसरा पर्याय आहे. वास्तविक, हे देखील शक्य आहे की ज्या प्रकारे सरकारने गेल्या वेळी केवायसीशिवाय हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवला होता, त्याच प्रकारे तुम्हाला केवायसीशिवाय हप्ता मिळण्याचीही शक्यता आहे.

केवायसीची शेवटची तारीख वाढवली
या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसीची शेवटची तारीख बदलली आहे. याआधी जिथे तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत तुमचे केवायसी करू शकता. त्याच वेळी, आता त्याची शेवटची तारीख 31 मे 2022 करण्यात आली आहे.

पीएम किसान योजना
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, केंद्र सरकार दर चार महिन्यातून एकदा या योजनेअंतर्गत रजिस्टर्ड केलेल्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये पाठवते. अशाप्रकारे, आदर्शपणे 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना त्याचा पहिला हप्ता मिळतो. त्याचप्रमाणे, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान उपलब्ध आहे.

Leave a Comment