नवी दिल्ली : देशातील परिस्थितीबाबत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात का आहे हे आजच्या तरुणांना सांगण्यासाठी मोदींकडे धैर्य असले पाहिजे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर उभे राहण्याची पंतप्रधानांमध्ये हिंमत नाही. मी त्यांना आव्हान देतो की कोणत्याही विद्यापीठात जा, तिथे पोलिसांशिवाय उभे रहा आणि या देशासाठी काय करत आहात ते लोकांना सांगा. कॉंग्रेसने बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधी बोलत होते.
Rahul Gandhi: Narendra Modi should have courage to tell youngsters why Indian economy has become a disaster…He doesn’t have guts to stand in front of students. I challenge him to go to any university, stand there without police&tell people what he’s going to do for this country https://t.co/5USuPw9dGe
— ANI (@ANI) 13 January 2020
राहुल गांधी म्हणाले की, तरुणांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी नरेंद्र मोदी देशाचे लक्ष विचलित करत आहेत आणि लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरूणांचा आवाज कायदेशीर आहे, तो दडपू नये, सरकारने त्यांचा आवाज ऐकला पाहिजे.
दरम्यान, काँग्रेसने आज बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत विरोधकांचे ऐक्य दिसून आले नाही. या बैठकीला शिवसेना, तृणमूल काँग्रेस, बसप,आम आदमी पार्टी हे पक्ष हजर नव्हते.