उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंचे राजकारण – जयंत पाटील

0
34
Jayant Patil
Jayant Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | आगामी निवडणूकांमध्ये उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून ठाकरे बंधू उत्तरप्रदेशमध्ये जावून आले. राज आणि उद्धव दोघेही निवडणूका डोळयासमोर ठेवून राजकारण करत आहेत. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

मे महिन्यात लोकसभा निवडणूका होत आहेत. कदाचित त्यासोबत विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. आता सगळेच पक्ष मतांकडे लक्ष ठेवून वागायला लागले आहेत. त्यानुसार काम करायला लागले आहेत. वोट बॅकचा विचार करुन बोलायला लागले आहेत. आत्ता उध्दव ठाकरे यांचं अयोध्येत शरयू नदीच्या काठावर जाणं होतं ते निवडणूका डोळयासमोर ठेवूनच होतं आणि राज ठाकरे यांचंही हिंदी भाषिकांसमोर जाणं आणि संवाद साधणं म्हणजे निवडणूकांचीच तयारी आहे असा आरोपही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बोलताना केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here