दोन कुटुंबांच्या वादात चिमुकल्याचा बळी

0
48
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली प्रतिनिधी | मुलांनी शुल्लक कारणावरून केलेल्या भांडणात 9 महिन्याच्या स्वराज शिंदे या बालकाला आपला नाहक प्राण गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील वापटी गावात घडली आहे, स्वराज शिंदे असे मयत बालकाचे नाव असून, मयत स्वराजच्या आईचे, शेजारील कुटुंबासोबत लहान मुलांच्या भांडणावरून कडाक्याचे भांडण झाले होते.

त्यानंतर याच भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आरोपींनी स्वराजच्या आईवर हल्ला केला. यावेळी आईच्या कडेवर असलेला स्वराज बाजूला असलेल्या खड्ड्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान कुरुंदा पोलिसांनी स्वराजच्या मृत्यूप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध घटनेच्या १८ तासा नंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर शिंदेंच्या घरावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here