पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटलेले 20 भारतीय मच्छिमार बाघा सीमेवरून मायदेशी परतणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याप्रकरणी 20 भारतीय मच्छिमारांची चार वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर रविवारी पाकिस्तानच्या लांडी जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या मच्छिमारांना सोमवारी वाघा सीमेवर आणून भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी मच्छिमारांच्या नॅशनॅलिटीची पुष्टी केल्यानंतर त्यांना सदिच्छा म्हणून सोडण्यात आल्याचे लांधी कारागृहाचे अधीक्षक इर्शाद शाह यांनी सांगितले. सुटका करण्यात आलेले बहुतांश मच्छिमार हे गुजरातमधील आहेत.

इर्शाद शाह म्हणाले,”या मच्छिमारांनी चार वर्षे तुरुंगात काढली होती आणि आमच्या सरकारने सदिच्छा म्हणून त्यांची आज सुटका केली आहे. ना-नफा सामाजिक कल्याणकारी संस्था ईधी ट्रस्ट फाउंडेशनने मच्छिमारांना लाहोरमधील वाघा सीमेवर नेण्याची व्यवस्था केली, तेथूनच त्यांना सोमवारी भारतीय अधिकार्‍यांकडे सोपवले जाईल.” इर्शाद शाह म्हणाले,”आम्ही सुटका झालेल्या मच्छिमारांना ईधी फाऊंडेशनकडे सोपवले आहे जे त्यांच्या प्रवासाचा आणि इतर सर्व खर्च उचलत आहे. अल्लामा इक्बाल एक्सप्रेस ट्रेनने ते लाहोरला जातील.” अधिकाऱ्याने पुढे सांगितले की,”588 भारतीय नागरिक अजूनही लांधी तुरुंगात बंद आहेत, त्यापैकी बहुतांश मच्छिमार आहेत.”

वृत्तानुसार, या सर्वांना पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा एजन्सीने (PMSA) कच्छ किनारपट्टीपासून अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा (IMBL) ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याबद्दल अटक केली होती. असे अजूनही सुमारे 600 मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. इधी ट्रस्ट फाऊंडेशनने सांगितले की, सुमारे 600 भारतीय मच्छिमार सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. फैझलचा दावा आहे की, डझनभर गरीब भारतीय मच्छिमार लांड आणि मालीर तुरुंगात बंद आहेत. गेल्या वर्षीही पाकिस्तान सरकारने अनेक भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती.

Leave a Comment