भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 मार्चपर्यत मुदतवाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्ह्यातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 11 व 12वी, पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक पदवी या अभ्यासक्रमासाठी पहिल्या व दुसऱ्या वर्गातील प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि. 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्याकरीता सातारा नगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. अंतराच्या आतील महाविद्यालयांमध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाच्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येतो. अधिक माहितीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा 415003 (दूरध्वनी क्र. 02162-298106) येथे संपर्क साधावा.

Leave a Comment