लॉकडाऊनबाबत येत्या काही तासांत निर्णय; पालकमंत्र्यांचे सुतोवाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यातील 85 टक्के रुग्णांना कुठल्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत तसेच मृत्यू दरही एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. ही दिलासादायक बाब असली तरी कोरोनाचा संसर्ग रोखला पाहिजे. यामुळे अंशतः लॉकडाऊन केला रात्रीची संचारबंदी ही लावली, परंतु रुग्ण संख्या वाढतच आहे. यामुळे कडक लॉकडाऊन लावण्याबाबत विचार करावा लागेल. येत्या काही तासांत याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांत कोरोणाची रुग्ण संख्या वाढत आहे. आज घडीला तब्बल १३ हजार ६४६ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. दररोज सहा हजारांपेक्षा अधिक चाचण्या केल्या जात आहेत. ही संख्या आता वाढवली जाणार असून दररोज किमान दहा हजार कोरोना चाचणी केल्या जातील. लॉकडाऊनबाबत बोलताना ते म्हणाले, आरोग्य विभाग तसेच तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 4 एप्रिल नंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. तसेच याला प्रतिबंध करण्याकरिता लॉकडाऊन करा, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

आम्हीदेखील त्याबाबत विचार करतो आहोत. आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे ऐकून मी मुंबईच्या संपर्कात आहे. येत्या काही तासांत याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे देखील देसाई म्हणाले. दाेन आठवड्यापासून शनिवार, रविवारी पूर्ण लॉकडाऊन तसेच रात्री ८ पासून रात्रीचा कर्फ्यू देखील करण्यात आला आहे. रात्री ८ नंतर शहरात कसून चौकशी केली जाणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group