विरोधकांनी केंद्राकडे राज्याला मदत करावी म्हणून शाई सुद्धा खर्च केली नाही- वडेट्टीवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना (Flood Infected Farmers) आज मदतीचा पहिला टप्पा म्हणून २ हजार २९७ कोटी वितरीत केला. याशिवाय ४ हजार ७०० कोटी आम्ही दिवाळीनंतर (Diwali 2020) देऊ असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी म्हटलंय. तसेच राज्य संकटात असताना विरोधकांनी केंद्राला मदत करावी म्हणून शाई सुद्धा खर्च केली नाही असा टोला वडेट्टीवारांनी लगावला. पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना देत असलेल्या मदतीसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आम्ही निधी देण्याची तयारी केली होती मात्र आचारसंहिता लागली. कुठे आचारसंहितेचा भंग होऊ नये आम्ही पत्र लिहले होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरीत केल्याचे ते म्हणाले. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी १० हजार कोटींच्या पॅकेजमधील ५६६ कोटी विदर्भात, मराठवाड्यात २,६३९ कोटी, नाशकात ४५० कोटी, पुण्यात ७२१ कोटी, कोकणासाठी १०४ कोटी असे पॅकेज राज्य सरकारने घोषित केले.

राज्यावर संकट आलं असताना विरोधकांनी केंद्राला मदत करावी म्हणून शाई सुद्धा खर्च केली नाही अशी टीका वडेट्टीवारांनी केली. केवळ विरोधासाठी विरोध करू नका. शेतकऱ्यांची खरंच कणव असेल तर त्यांनी केंद्राला मदतीचे पत्र द्यावे असे देखील ते पुढे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment