आई, मावशीला जमिनीचा ताबा मिळावा म्हणून शेतकऱ्याने स्वतःला जमिनीत घेतले गाडून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना : हॅलो महाराष्ट्र – आजपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला अनेक प्रकारची आंदोलने (agitation) करताना पाहिले असेल. जालन्यामध्ये अशाच एका शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीचे आंदोलन (agitation) केले आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आई, मावशीला जमिनीचा ताबा मिळावा म्हणून या शेतकऱ्याने स्वतःला थेट जमिनीत गाडून घेतले आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील हलस येथे घडली आहे. या अनोख्या आंदोलनाचा (agitation) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत आई आणि मावशीला मिळालेल्या जमिनीचा ताबा त्यांना मिळावा, म्हणून जालन्यातील एका शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने आंदोलन (agitation) करत स्वतःला जमिनीत गाडून घेतले आहे. जालन्यातील मंठा तालुक्यातील हेलस या गावामध्ये हे आंदोलन करण्यात आले. सुनील जाधव असे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकरी सुनील जाधव यांच्या आई आणि मावशीला प्रत्येकी 1 हेक्टर 35 आर जमीन मंजूर झालेली आहे. मात्र, असे असतानाही या जमिनीचा अजूनही ताबा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना जमिनीचा ताबा मिळत नव्हता. यामुळे अखेर या शेतकऱ्याने वैतागून हे अनोखे आंदोलन (agitation) केले. या आंदोलनाच्या माध्यमातून त्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता प्रशासन यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या