शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता तुम्हाला वार्षिक 6000 ऐवजी 36000 रुपये मिळतील, त्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही आधीच किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला सरकारकडून दरमहा 3000 रुपये मिळण्याचा हक्क आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट द्यावे लागणार नाही. पीएम किसान मन धन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 36000 रुपये मिळू शकतात.

तुम्हाला 36,000 रुपये कसे मिळतील हे जाणून घ्या?
पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत, वयाच्या 60 वर्षांनंतर, शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये म्हणजेच 36,000 रुपये प्रति वर्ष पेन्शन दिली जाते.

कोणतेही डॉक्युमेंट सादर करायचे नाही
ही पेन्शन योजना केंद्र सरकारद्वारे देशातील छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी चालवली जाते. यामध्ये वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपयांची सुविधा दिली जाते. जर तुम्ही पीएम किसानचा लाभ घेत असाल तर तुम्हाला यासाठी कोणतेही अतिरिक्त डॉक्युमेंट सादर करण्याची आवश्यकता नाही.

या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकेल ?
>> 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतो.
>> यासाठी तुमच्याकडे जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत लागवडीयोग्य जमीन असावी.
>> तुम्हाला शेतकऱ्याच्या वयावर अवलंबून किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंत मासिक रु .55 ते 200 पर्यंत मासिक योगदान द्यावे लागेल.
>> वयाच्या 18 व्या वर्षी सामील झाल्यास मासिक योगदान दरमहा 55 रुपये असेल.
>> वयाच्या 30 व्या वर्षी या योजनेत सामील झाल्यास 110 रुपये जमा करावे लागतील.
>> जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी सामील असाल तर तुम्हाला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील.

Leave a Comment