21 दिवसांत संसाराचा धक्कादायक शेवट, पोलिसांकडून पत्नीला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये बीडमधील गेवराई येथील पांडुरंग चव्हाण या तरुणाचा मृत्यू (death) झाला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाचे अवघ्या 21 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी थेट त्याच्या पत्नीवर संशय व्यक्त केला आहे. आपल्या मुलाच्या मृत्युप्रकरणी (death) त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनी केली होती.

काय आहे प्रकरण?
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील पांडुरंग रामभाऊ चव्हाण या 22 वर्षीय तरुणाचा काही दिवसापूर्वीच विवाह झाला होता. मात्र अचानक त्याचा मृत्यू (death) झाल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. पांडुरंगचा अचानक मृत्यू (death) झाल्याने त्याच्या कुटुंबियातील सदस्यांनी पांडूरंगच्या पत्नीवर संशय व्यक्त केला आहे. यादरम्यान पांडुरंग चव्हाण या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले असून तिची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

अवघ्या 21 दिवसांचा संसार झाला उद्धवस्त
मृत पांडुरंग हा खूप मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचे परिसरातील सर्वांसोबतच चांगले संबंध होते. त्याचा 21 दिवसांपूर्वीच विवाह पार पडला होता. त्याच्या विवाहाने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. त्याचा नवा संसार फुलण्याच्या आतच काळाने त्याच्यावर घाला घातला आणि अवघ्या 21 दिवसांचा संसार क्षणार्धात उध्वस्थ झाला. यामध्ये पांडुरंगच्या मृत्यूला (death) त्याच्या पत्नीला जबाबदार धरण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?