भारत वर्ल्डकप जिंकणार, विराट शतक मारणार; भविष्यवाणीने भारतीय चाहते खुश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND Vs SA World Cup Final) या २ संघात होणार आहे. रात्री ८ वाजता बार्बाडोस येथे ही फायनल मॅच खेळवण्यात येईल. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यंदातरी वर्ल्डकप जिंकावा अशी इच्छा क्रिकेट प्रेमींची आहे. भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडू दमदार फॉर्मात असले तरी विराट कोहलीच्या बॅटमधून अजूनही धावा निघाल्या नाहीत हि टीम इंडिया साठी चिंतेची बाब आहे. मात्र आजच्या अंतिम सामन्यात विराट शतक मारेल आणि भारतच यंदाचा T20 विश्वचषक जिंकेल अशी मोठी भविष्यवाणी इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरने केली आहे.

मॉन्टी पानेसरने एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हंटल कि, विराट कोहली (Virat Kohli) आज दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात शतक मारेल. तसेच भारतीय संघ T20 विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकेल असाही विश्वासही त्याने व्यक्त केला. मॉन्टी पानेसरची भविष्यवाणी खरी ठरली तर याच्यापेक्षा मोठा आनंद भारतीय क्रिकेट चाहत्यांना नसेल. विराट कोहली सध्या खूपच खराब फॉर्म मध्ये असला तरी आजच्या सामन्यात त्याने तुफानी खेळी करावी अशी इच्छा टीम इंडियाच्या पाठिराख्यांची असेल.

T20 विश्वचषक 2024 मध्ये कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने आतापर्यंत सहा डावांत 11 च्या मामुली सरासरीने केवळ 66 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही केवळ 100 राहिला आहे. विराट यंदा रोहित सोबत सलामीला येत आहे. मात्र आयपीएल मध्ये त्याने ज्याप्रमाणे आरसीबीला दमदार सलामी दिली त्याच प्रकारचा खेळ खेळण्यास त्याला पूर्णपणे अपयश आलं आहे. आजच्या अंतिम सामन्यात तरी कोहलीची बॅट तळपेल आणि भारताचा विजय होईल अशी इच्छा अपेक्षा त्याच्या चाहत्यांची असेल.