Ladki Bahin Yojana| महिला आणि बालविकास विभागाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी सुरू केली आहे. यामध्ये उत्पन्न जास्त असूनही आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही काही महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याबाबत सरकारने कडक पावले उचललेले आहेत. यासंदर्भातच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
या महिलांवर होणार नाही कारवाई (Ladki Bahin Yojana)
तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या अडीच कोटी महिलांपैकी सर्वच अर्जांची छाननी होणार नाही. महत्वाचे म्हणजे यात पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारक महिलांच्या अर्जांची तपासणी केली जाणार नाही. अशा महिलांचे उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असल्याने त्यांना आपोआप पात्र मानले जाणार आहे. तसेच, या कार्डधारकांचे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाद्वारे आधीच व्हेरिफिकेशन झाले आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा छाननी करण्याची आवश्यकता नाही.
सरकारकडून सुरू असलेल्या तपासणीत अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेतून (Ladki Bahin Yojana) वगळले जाईल आणि त्यांना यासंबंधी कळवलेही जाईल. आतापर्यंत 4,500 हून अधिक महिलांनी स्वतःहून लाभ रद्द करत सरकारकडे पैसे परत केले आहेत. त्यामुळे सरकारकडून सुरू असलेल्या छाननीला देखील महिला प्रतिसाद देत असल्याचे यातून दिसून येत आहे.
दरम्यान, येत्या 26 जानेवारी रोजी लाडकी बहिणी योजनेचा (Ladki Bahin Yojana) पुढील हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. परंतु ज्या महिलांनी या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांना योजनेचे पैसे मिळणार नाही. त्यामुळे आता जानेवारी महिन्यातील हप्ता मिळणाऱ्या महिलांच्या संख्येत घट होणार आहे.