रिटायरमेंटनंतर दरमहा 2 लाख रुपये पेन्शन मिळवण्यासाठी गुंतवणूक कशी करावी ‘हे’ जाणून घ्या

0
89
Mutual Funds
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिटायरमेंटचे प्लॅनिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. या प्लॅनिंगची पहिली पायरी म्हणजे रिटायरमेंटनंतर तुमचे आयुष्य सुरळीत चालवण्यासाठी किती पैसे लागतील हे ठरवणे. एखाद्या तरुण व्यक्तीला रिटायरमेंटबद्दल विचार करणे किंवा बोलणे विचित्र वाटू शकते, मात्र सत्य हे आहे की, तुम्ही जितक्या लवकर रिटायरमेंटचे प्लॅनिंग आणि अंमलबजावणी सुरू कराल, तितक्या लवकर तुमचा रिटायरमेंटनंतरचा फंड जास्त असेल.

एखाद्या व्यक्तीला वयाच्या 60 व्या वर्षी रिटायर व्हायचे आहे, असे नाही. आजकाल तरुण वयाच्या 45 व्या वर्षी रिटायरमेंटचा विचार करत आहेत. त्यामुळे रिटायरमेंटनंतर तुम्हाला आर्थिक अडचणी हव्या नसतील तर आतापासून विचारपूर्वक गुंतवणूक करावी. यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर असल्याचे पर्सनल फायनान्स एक्‍सपर्ट्सचे मत आहे.

सतत गुंतवणूक
लाइव्ह मिंटच्या एका रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीचे वय आता 30 वर्षे आहे आणि त्याला वयाच्या 45 व्या वर्षी रिटायर व्हायचे असेल, तर त्याला आतापेक्षा जास्त गुंतवणूक करावी लागेल, कारण रिटायरमेंटनंतर त्याला त्याच्या बचतीतून बरीच वर्षे घालवावी लागतील. एवढेच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा खर्चही त्याला करावा लागणार आहे. त्यामुळे या सगळ्यासाठी त्याला आता मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. त्याने म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीसाठी मंथली इन्‍वेस्‍टमेंट सुरू करावी. गुंतवणूक सातत्याने करावी लागेल आणि गुंतवणुकीची रक्कमही कालांतराने वाढवावी लागेल.

असा रीतीने तयार करा फंड
रिटायरमेंटनंतर तुम्हाला दरमहा 2 लाख रुपये पेन्शन मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. एसेट मॅनेजरचे व्यवस्थापकीय भागीदार सूर्य भाटिया यांनी लाइव्ह मिंटला सांगितले की,” यासाठी गुंतवणुकीत सातत्य ठेवावे लागेल तसेच गुंतवणुकीची रक्कमही कालांतराने वाढवावी लागेल. जर तुम्ही पुढील 33 वर्षांसाठी दरमहा 30000 रुपये वाचवले तर तुमच्याकडे एकूण 1.2 कोटी रुपयांचा फंड असेल. यामध्ये 9 टक्के वाढ केली तर ती एकूण 7.4 कोटी रुपये इतकी होते. महिन्याने महिन्याचा हिशोब केला तर 6 टक्के पैसे काढण्याच्या दराने 3.7 लाख रुपये येतात. जर महागाईचा दर 6 टक्केही धरला, तर हे 3.7 लाख रुपये आजच्या काळात 54000 रुपयांच्या बरोबरीचे असतील. याचा अर्थ आपण आपली बचत वाढवत राहिली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here