औरंगाबादेतही कडक लॉकडाऊन? ; मुख्यमंत्र्यांच्या संकेता नंतर शहरात चर्चेला उधाण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद: राज्यात कोरोनाचा आलेख दिवसागणिक वाढत आहे.आज घडीला दररोज १० हजार पेक्षा अधिक रूग्ण आढळत आहे. स्थानिक प्रशासन आढावा घेवून विविध जिल्ह्यात निर्बंध लागू करत आहे.औरंगाबाद शहरात आजपासून अंशत: लॉकडाउन सुरू झाला आहे.परंतु लोक पालन करताना दिसत नसल्याने शहरात सुद्धा कठोर लॉकडाउन लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

ठाकरे यांनी आज कोरोना लस घेतली. प्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पञकारांनी औरंगाबादेत कोरोना रूग्ण वाढत आहे. तेथील जिल्हा प्रशासनाने अंशत: लॉकडाउन लागू केला असला तरी लोक बाहेर फिरत आहे.नियमांचे पालन करत नाही.असे प्रश्न विचारले असता ठाकरे म्हणाले, काही ठिकाणी कडक लॉकडाउन करावे लागेल.

येत्या एक-दोन दिवसात आम्ही निर्णय घेणार आहोत.गरज वाटेल तिथे लॉकडाउन करावा लागेल,असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर औरंगाबादेत कडक लॉकडाउन लागणार का?अशी जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment