Maharashtra Dam Water Storage | महाराष्ट्रातील धरणांमध्ये 36 टक्के पाणीसाठा पूर्ण; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Dam Water Storage | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्याचप्रमाणे आता सगळे नदी, नाले आणि धरणे देखील भरलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणे 10 टक्के भरलेली आहेत. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे.

जलसंपदा विभागाने एक अहवाल दिला आहे. त्यानुसार आता राज्यातील धरणांमध्ये आता 36. 7 टक्के एवढा पाणीसाठाउपलब्ध आहे. यातील केवळ छत्रपती संभाजी नगरमध्ये 15.26 टक्के पाणी शिल्लक आहे. कोकण विभागात सध्या मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे कोकणातील धरणांमधील पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. अनेक धरणे ही आता 50% पर्यंत पोहोचलेली आहे. यातील सूर्या, धामणी हे धरण 50.67% भरलेली आहेत. तर अप्पर वैतरणा हे धरण 37.50% भरलेले आहे.

मराठवाड्याला पाण्याची प्रतीक्षा

मराठवाड्यात जास्त पाऊस पडत नाही. या ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात जास्त वाढ झालेली नाही. जायकवाडीचा पाणीसाठा अजूनही 5 टक्क्यांनी पेक्षा जास्त झालेला नाही. अजूनही मराठवाड्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मराठवाड्यातील जायकवाडी हे धरण 4.13% भरलेले आहे. त्याचप्रमाणे निम्न दुधना हे धरण 6.27% भरलेले आहे. येलदरी हे धरण 30.9% भरलेले आहे. तर पैनगंगा हे धरण 39.55 टक्के भरलेले आहे.

पुणे विभागातील धरणे किती भरली?

पुणे भागात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे धरण साठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील प्रमुख धरणे 50% पेक्षा जास्त भरलेली आहे. यातील डिंभे हे भरण 24.49% भरलेले आहे. पानशेत हे धरण 51.67% धरलेले आहे. खडकवासला हे धरण 70.24 टक्के भरलेले आहे. चाक समान हे धरण 25.190% भरलेला आहे. तर निरा देवघर हे धरण 34.12 टक्के एवढे भरलेले आहे.