धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार

मुंबई प्रतिनिधी | भांडूपमधून अपहरण करण्यात आलेल्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी विद्याविहार रेल्वे स्टेशन जवळील एका नाल्यातून ताब्यात घेतला असून आरोपीला भांडूप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांनी दिनांक 5/11/19 रोजी पोलीस ठाणेस येऊन फिर्याद दिली … Read more

अयोध्या निकालावर तापसी म्हणते, ‘हो गया. बस. अब?’

मुंबई प्रतिनिधी | आज अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री तापसी पन्नू हिने ट्विटरवर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Ho gaya. Bas. Ab ? — taapsee pannu (@taapsee) November 9, 2019 तापसीने … Read more

शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेबांना दिलेलं वचन – उद्धव ठाकरे

 मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंना दिलेले वचन आहे असे मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेसोबत काही बोलणेच झाले नाही असे म्हणल्यानंतर ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत फडणवीस घोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. … Read more

Breaking | रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीला

मुंबई प्रतिनिधी | भाजप शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन चांगलेच जुंपले असताना सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. अशात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहे. आठवले आणि पवार यांच्या भेटीमुळे राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे. रामदास आठावले शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास शरद पवार यांच्या सिल्वरवोक या … Read more

तथाकथीत मध्यस्थांची गरज नाही, संजय राऊतांचा भिडे गुरुजींना टोला

मुंबई प्रतिनिधी | सत्तावाटपाच्या मुद्द्यावरुन सेना भाजप यांच्यात चांगली जुंपली असून हा तिढा मध्यस्तांच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. गुरुवारी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे आणि भिडे यांची भेट होऊ शकली नाही. यावर तथाकथीत मध्यस्तांची गरज नाही असं म्हणत संजय … Read more

राज्यात राष्ट्रपती राजवट? अॅटर्नी जनरल व राज्यपालांच्या दरम्यान चर्चा

मुंबई प्रतिनिधी | राज्यात अद्याप कुठल्याही राजकीय पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राज्याच्या अॅटर्नी जनरलला राजभवनात चर्चेसाठी बोलावले आहे. अॅटर्नी जनरलच्या सल्ल्यानंतरच राज्यपाल आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र भाजपने उद्या संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यमान विधानसभेचा … Read more

मी ‘मुख्यमंत्री’ होणार नाही, शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई प्रतिनिधी |राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. शिवसेनेकडे नेतृत्व देऊन राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार असल्याचे समजते. तर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकारला काँग्रेसने बाहेरून पाठिंबा द्यावा, यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. परंतु या … Read more

शरद पवारांच्य‍ा पत्रकार परिषदेतील महत्वाचे ५ मुद्दे!

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार यांनी देशाती आणि राज्यातील महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. शरद पवार यांच्या पत्रकर परिषदेतील महत्वाचे पाच मुद्दे खालीलप्रमाणे

१) पोलीसांची सुरक्षितता – आठवडाभरापूर्वी मुंबईत पोलीसांवर जमावाकडून हल्ला झाल्याची घटना घडली होती. याबाबत पवार यांनी पोलीसांची सुरक्षितता एरणीवर आल्याचं म्हटलं आहे. देशातील सर्वच राज्यांत पोलिसांची अवस्था बिकट आहे. पोलीसांना ८ तासांहून अधिक काम करावे लागते. तसेच आठवड्याची सुट्टीही पोलिसांना मिळत नाही. अशा परिस्थितीत पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात. पोलीसांवर हल्ला होणं ही गांभिर्याची बाब आहे. केंद्राने यात लक्ष घालणं गरजेचं आहे. असं पवार म्हणाले.

२) अतिवृष्टीचा शेतकर्‍यांना फटका – राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसला असून यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असल्याचं पवार यांनी सांगितले. मी राज्यात फिरलो तेव्हा शेतकर्‍यांना विशिष्ट आर्थिल मदतीची, काही प्रमाणात कर्जमाफीची आणि बँकांकडून कर्जपूरवठा उभारण्याची गरज शेतकर्‍यांनी मला बोलावून दाखवली आे पवार म्हणाले.

३) विमा कंपण्यांचा भोंगळ कारभार – शेतकरी विमा काढतात मात्र विमा कंपण्या आपली जबाबदारी पार पाडायला तयार नाहीत. केंद्र सरकारने विमा कंपण्यांची बैठक बोलावून त्यांना तशा सुचना देणे गरजेचे आहे असे पवार यांनी म्हटलं आहे.

४) अयोध्या निकाल – अयोध्या प्रकरणाचा निकाल लागणार असून तारीखही जवळपास निश्चित होत आहे. अशात शांतता व सुव्यवस्था राखणे ही आपली जबाबदारी आहे. बाबरी मस्जिद हल्ला झाला तेव्हा देशात जी परिस्थिती निर्माण झाली होती स्थिती येऊ नये यासाठी पवार यांनी आवाहन केले.

५) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण – राज्याच्या परिस्थितीवर बोलण्यासारखे अद्याप काही नाही. जनतेने भाजप शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे. त्य‍ांनी राज्यातील स्थिती पूर्ववत करावी असं पवार म्हणालेत. शिवसेना आणि भाजप यांची युती पंचवीस वर्षांची आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सरकार बनवण्यासाठी कौल दिला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार स्थापन करावं असं मत पवार य‍ांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. तसेच जनतेने आम्हाला विरोधीपक्षात बसवलं असून आम्ही विरोधीपक्षाची भुमिका योग्य पद्धतीने पार पाडू असंही पवार म्हणालेत. आपण मुख्यमंत्री होण्यास तयार होता काय असं एका पत्रकाराने विचारले असता मी चार वेळा मुख्यमंत्री राहिलो आहे. आता मला मुख्यमंत्री करा यासाठी मी कधीही आग्रही नव्हतो असं म्हणत या चर्चा म्हणजे प्रपोगंडा आहेत असे पवार म्हणाले.

Breaking | शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत शरद पवारांचे मोठे विधान

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भेट घेतली. राऊत यांच्यासोबत तासभर दरवाजा बंद चर्चा केल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि भाजप यांची युती पंचवीस वर्षांची आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सरकार बनवण्यासाठी कौल दिला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेने … Read more

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, बंद दरवाजा आड चर्चा सुरु

मुंबई प्रतिनिधी शिवसेनेचे नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. राऊत पवार यांच्या सिल्वरओक बंगल्यावर पोहोचले असून राऊत आणि पवार यांच्यात बंद दरवाजा आड चर्चा सुरु झाली आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेनेकडून काही प्रस्ताव आला तर आम्ही त्यावर विचार … Read more