आ. पृथ्वीराज बाबांच्या अधिकाऱ्यांना सूचना : कराड-विटा महामार्गावरील पाणी निचऱ्याची कामे तातडीने पूर्ण करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड-विटा महामार्गावर गजानन सोसायटी दरम्यान पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठत असते. त्याचा निचरा व्हावा यासाठी मोठ्या पाईप टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. या कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली व अधिकाऱ्यांना हे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी महामार्ग विभागाचे उपअभियंता निखिल पानसरे, श्री. महाजन, कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नानासो जाधव, इंद्रजीत चव्हाण, खादी ग्रामोद्योग तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, सैदापुरचे माजी उपसरपंच सचिन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य तानाजी माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी जाधव, सोसायटी चेअरमन बाळासो जाधव, दत्तात्रय जाधव, सतीश जाधव आदी यावेळी उपस्थित होते. पावसाळ्यात जोराच्या पावसामुळे कृष्णा कॅनाल ते गजानन सोसायटी भागात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचत असल्याने याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत असतो. शिवाय या भागातील घरांमध्ये पाणी साचून नुकसान होत असते. याबाबत वेळोवेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या.

या महामार्गानजीक अण्णा नांगरे नगर हा भाग व आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने याचा निचरा होण्यासाठी जागा नाही यामुळे हे सगळे पाणी महामार्गावर येत असते. यासाठी अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून निचरा होईल असे तीन ठिकाणावर मोठ्या पाईप घालून हे सर्व पाणी मोरी मार्गे ओढ्याला व तिथून नदीला सोडण्याचे काम सद्या युद्धपातळीवर सुरु आहे. याच कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी करून अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली व सूचना केल्या कि हि कामे त्वरित पूर्ण करावीत. हे काम अत्यंत महत्वाचे आहे हे पूर्ण झाल्यावर पावसाळ्यात महामार्गावरील वाहतुकीची होणारी कोंडी व आसपासच्या भागातील घरांचे होणारे नुकसान होणार नाही यासाठीच हे काम तातडीने व्हावे अश्या सूचना देण्यात आल्या.

Leave a Comment