महाराष्ट्रात जाती जातीत विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच; मनसेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल*

0
63
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे नेते राज ठाकरे व राष्ट्रवादी असा नवा वाद आता सुरु झाला आहे. याबाबत मनसे नेते राज ठाकरेंकडून राष्ट्रवादीवर टीका केली जात आहे. दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी देखील राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला असून त्यांनी “महाराष्ट्रात जाती जातीत विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच,” असे ट्विटकरीत निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला या राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही राष्ट्रवादीवर जोरदार टीका असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “राष्ट्रवादी चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले वीस वर्षे बघत आहे.”

“नाव राष्ट्रवादी आणि राजकारण संकुचित असलेल्या लोकांनी आम्हाला राष्ट्रद्रोही म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच. महाराष्ट्रात जाती जातीत विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच,” असे म्हणत देशपांडेंनी टीका केली आहे. देशपांडे यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी देखील आक्रमक पावित्रा घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here