हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai To Kolhapur Special Train। पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई–कोल्हापूर मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे, त्यानिमिताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे हजारो चाहते मुंबईच्या दिशेने कूच करत असतात. अशावेळी रेल्वेवर अधिक ताण येऊ नये तसेच प्रवाशांचा प्रवास सोप्पा व्हावा यासाठी रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. याचा फायदा हजारो आंबेडकरी जनतेला होणार आहे.
कधी धावणार मुंबई – कोल्हापूर रेल्वे ? Mumbai To Kolhapur Special Train
कोल्हापूर–मुंबई विशेष एक्स्प्रेस (Train No. 01402) ही गाडी शुक्रवारी 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4.40 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटेल आणि 6 डिसेंबर रोजी पहाटे 4.00 वाजता मुंबई सीएसएमटी टर्मिनस येथे आगमन होईल. तर मुंबई ते कोल्हापूर-विशेष गाडी (क्रमांक ०४०१) ही गाडी शनिवार, दि. ६ रोजी रात्री १०.३० वाजता मुंबई सीएसएमटी येथून सुटेल व छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे सकाळी १०.०० वाजता पोहोचेल. Mumbai To Kolhapur Special Train
कोणत्या स्थानकावर थांबणार ?
कोल्हापूर-मुंबई विशेष एक्स्प्रेसचे थांबे व वेळा
हातकणंगले – सांयंकाळी 5.00 वाजता
जयसिंगपूर – सांयंकाळी 5.20 वाजता
मिरज – सांयंकाळी 5.35 वाजता
सांगली – सांयंकाळी 5.55 वाजता
किर्लोस्करवाडी – सांयंकाळी 6.20 वाजता
कराड – सांयंकाळी 6.50 वाजता
सातारा – रात्री 8.00 वाजता
लोणंद जंक्शन – रात्री 9.00 वाजता
जेजुरी – रात्री 9.30 वाजता
पुणे – रात्री 11.20 वाजता
चिंचवड – रात्री 11.50 वाजता
लोणावळा – मध्यरात्री 12.50 वाजता
कल्याण – मध्यरात्री 2.50 वाजता
ठाणे – पहाटे 3.20 वाजता
दादर – पहाटे 3.42 वाजता
मुंबई सीएसएमटी – पहाटे 4.00 वाजता आगमन
मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या या विशेष रेल्वेमुळे महापरिनिर्वाण दिनी हजारो नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच त्यांना अगदी आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. हि ट्रेन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून धावणार असल्याने फक्त कोल्हापूरचं नव्हे तर सातारा, सांगली आणि पुण्याच्या प्रवाशांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. प्रवाशांनी सुटण्यापूर्वी वेळापत्रक तपासून योग्य नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.




