मोदींची हुकूमशाह बनण्याकडे वाटचाल सुरु – सुशीलकुमार शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर | पंढरपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला सुशील कुमार शिंदे आणि नारायण राणे उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी आगामी निवडणूक जिंकले तर ती देशातील शेवटची निवडणूक ठरेल.’ कारण मोदींची हुकूमशाह बनण्याकडे वाटचाल सुरु आहे.

शेतकरी मेळाव्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि नारायण राणे उपस्थित होते. सांगलीचे माजी आमदार शहाजीबापू शिंदे यांनी सुशील कुमार शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली त्यावेळी ते म्हणाले, मागील निवडणुकांच्यावेळी वीजबिल माफीची घोषणा करून जिंकलात आणि एक महिन्याच्या आत बिले यायला सुरवात झाली.

‘चांगली कामे करून निवडून येता येत यावर माझा विश्वास राहिला नाही.’ असे नारायण राणे म्हणाले.नाहीतर मी आणि शिंदे साहेब निवडून आलो असतो.नारायण राणे आणि सुशील कुमार शिंदे यांसारखे दिग्गज नेते मेळाव्याला हजार असून ही शेतकरी वर्गाने या मेळाव्याकडे पाठ फिरवली.

 

इतर महत्वाचे –

जीवनात यशस्वी होण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या

बस स्थानाकातून महिलेची पर्स लंपास, १७ तोळे दागिने चोरीला

शेतकरी अवजार लायब्ररी, दुष्काळग्रस्त व गरजू शेतकऱ्यांसाठी पुण्यातल्या तरुणांचा विशेष उपक्रम

Leave a Comment