2 तासात उरकावं लागणार शुभमंगल सावधान! नियम मोडले तर 50 हजार दंड? जाणुन घ्या काय आहेत लग्नसंमारंभासाठीचे नवे निर्बंध

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अखेर ब्रेक द चेनच्या अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावली अंतर्गत सरकारने कडक नियम लागू केले असून राज्याच्या मुख्य सचिवांकडून त्याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार सरकारी, खासगी कार्यालये, सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतूक यासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे आता लग्नासाठी लोकांच्या संख्येची नाही तर वेळेचीही मर्यादा लागू केली आहे. आता केवळ २ तासचं लग्नासाठी देण्यात आले असून केवळ २५ लोकांचं परवानगी देण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास थोडाथोडका नाही तर तब्बल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीमध्ये लग्नसमारंभासाठी यापूर्वी 50 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु, सुधारित आदेशानंतर आता फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडावा लागणार असून फक्त दोनच तास वेळ लग्नासाठी देण्यात आला आहे.

इतकच नाही तर अवघ्या २ तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावा लागणार आहे. या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here