हिंदुस्थानातं चमच्यांची सुद्धा कमतरता पडली आहे का?- नितीन गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । ‘देशभरातील उद्योग व्यवसायसंबंधी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चीनमधून उदबत्तीपासून प्लास्टिकचे चमचे देखील आपल्या देशात आयात केले जात आहे. ही माहिती मिळाली, त्यावरून मी सेक्रेटरीला म्हटलो की, अपने हिंदुस्थान में चमचो की भी कमी पड गई क्या?’ असा किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

पुण्यात मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्सच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, ‘आपल्या देशात उद्योग व्यवसाय वाढीसाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आहे. त्या दृष्टीने रोजगारनिर्मिती आणि निर्यात वाढवण्यासाठी उद्योग जगताने प्रयत्न करावेत, सरकार त्यांच्या पाठिशी आहे’ असे आश्वासन गडकरींनी उपस्थित उद्योजकांना दिले.

तसेच कृषी मालवाहतूक रेल्वेने वाढली पाहिजे, जेणेकरून वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर आता बांबू पासून तेल मिळत असल्याने बांबू शेतीला चालना देण्यात येणार आहे. येत्या साडेतीन वर्षांत दिल्ली मुंबई हायवेचे काम पूर्ण होईल. यामुळे १३ ते १४ तासामध्ये अंतर पार करता येणार आहे. त्याचबरोबर देशात अशा स्वरुपाचे आणखी तीन हायवे बनवले जात असून देशात २२ ग्रीन हायवेंचं काम प्रगतीपथावर आहे अशाप्रकारे विविध प्रकल्पांचा आढावा त्यांनी यावेळी दिला.

गडकरी पुढे म्हणाले की, देशातील अनेक राज्यामध्ये शहरांचे प्रमाण वाढत आहे. त्या सर्व शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली जात आहे. मात्र त्याच दरम्यान पुणे आणि मुंबई सारख्या शहरात उद्योग आणि व्यवसायांचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. यामुळे खूप मोठी समस्या झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा शहराच्या बाहेर देखील उद्योग व्यवसाय जाण्याची गरज असून त्यासाठी विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment