तूर्तास लॉकडाऊन नाही, पण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – राज्यात लॉकडाउन सध्या नाहीच या बाबत कुणीच अफवा पसरवू नये, भीती ही दाखवू नये तूर्तास लॉकडाऊन लागणार नाही. पण जेव्हा 700 मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागले की ऑटोमोडमध्ये लॉकडाउन लागेल असे टोपे म्हणाले.

राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या आकडेवारीबद्दल आणि निर्बंधाबद्दल आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहीती दिली आहे. ते आज औरंगाबादमध्ये बोलत होते. यावेळी माहिती देत असताना राजेश टोपे यांनी संगीतल की, राज्यात दोन दिवसात आकडे डबल होत आहेत. डेल्टा आणि ओमिक्रोनचा प्रसार वाढू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

तसेच तूर्तास लॉकडाऊनचा विचार नाही, पण निर्बंध कडक करणार असेही टोपे म्हणाले.

Leave a Comment