Saturday, December 6, 2025
Home Blog Page 11

Rohit Sharma : होय, मी पुन्हा आलोय …. रोहितच्या व्हिडिओने चाहते खुश

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rohit Sharma । मुंबईचा राजा रोहित शर्मा… भारतीय क्रिकेट संघाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा याचा चाहतावर्ग मोठा आहे.. रोहितची एक झलक बघायला चाहते मोठ्या प्रमाणावर स्टेडियम मध्ये गर्दी करतात,… एवढच नव्हे तर रोहित जिथे जिथे जातो, तिथे तिथे त्याच्यासोबत चाहत्यांचा मोठा गराडा असतो. मात्र रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे… मागील अनेक दिवसांपासून रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. रोहितच्या निवृत्तीबाबत सुद्धा सतत चर्चा सुरु असतात. याच दरम्यान, रोहित शर्माने एक नवा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना मोठा दिलासा दिला आहे. होय मी पुन्हा आलोय, आणि मला खूप छान वाटतंय असं म्हणत रोहित शर्माने प्रॅक्टिस करत असतानाच विडिओ शेअर केला आहे.

काय आहे रोहितच्या व्हिडिओत? Rohit Sharma

खरं तर रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमनाची तयारी सुरू केली आहे. अलिकडेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हिटमॅनच्या एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्तीबद्दल दावा करण्यात आला होता. मात्र आता थेट व्हिडिओच शेअर करत रोहितने या दावा फेटाळून लावला आहे.इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो असे म्हणताना दिसतोय कि, मी पुन्हा आलोय आणि मला इथे बरे वाटत आहे…. यावेळी रोहित सराव करताना दिसतोय आणि वेगवेगळे फटके मारताना दिसतोय… या व्हिडिओच्या माध्यमातून रोहितने निवृत्तीच्या चर्चाना पूर्ण विराम दिलाय. तसेच अजूनही माझ्यात भरपूर क्रिकेट शिल्लक आहे, अजूनही मी खेळू शकतो हेच दाखवण्याचा प्रयत्न रोहित शर्माने केला आहे.

दरम्यान, टी20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी20 क्रिकेटला अलविदा केला होता. 7 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधूनही त्याने निवृत्ती घेतली होती. मात्र आता वनडे फॉरमॅटमध्ये रोहित पूर्ण ताकदीने खेळणार आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रोहितचे पुनरागमन होऊ शकते. त्याने शेवटचा भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद जिंकले होते. रोहितने (Rohit Sharma) न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ७६ धावा केल्या. त्याच्या खेळीसाठी रोहितला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर रोहित आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानावर दिसलाच नाही.. अखेर त्याने आपला प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिलासा दिला आहे. रोहितने असच खेळत राहावे, २०२७ च्या विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करावे आणि भारताला वर्ल्ड कप जिंकवून द्यावा अशी इच्छा प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे.

Gold Rate : सोन्याच्या किमती 229 टक्क्यांनी वाढणार?? प्रतितोळा 3.61 लाख रुपये मोजावे लागणार

Gold Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Rate। सोने हा भारतीयांचा आवडता दागिना.. कोणत्याही शुभकार्यात किंवा सणासुदीला अनेक भारतीय मोठ्या उत्साहाने सोन्याची खरेदी करतात. परंतु मागच्या काही वर्षात सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आहे. सद्यस्थितीत सोन्याचा भाव १ लाख रुपयांच्या पार गेला आहे. अशावेळी सोने खरेदी करावं का? कि किमती कमी झाल्यानंतर सोन्याची खरेदी करावी याबाबत ग्राहकांच्या मनात गोंधळाचे वातावरण आहे. आता सोन्याच्या किमतीबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. भविष्यातही सोन्याचा दर असाच कायम वाढत राहील… येत्या काळात सोन्याच्या किमती २२९ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून ग्राहकांना एक तोळा सोन्याच्या खरेदीसाठी तब्बल 3.61 लाख रुपये मोजावे लागू शकतात. स्विस आशियाने हा अंदाज वर्तवला आहे.

स्विस आशियाने सोन्याच्या किमतींबाबत (Gold Rate) सर्वात मोठा दावा केला आहे. सोन्याची सध्याची किंमत प्रति १० ग्रॅम १.१० लाख रुपयांपर्यंत आहे. २०३२ पर्यंत सोन्याची किंमत ११९% वरून २२९% पर्यंत वाढू शकते. जर सोन्यात ११९% वाढ झाली तर नवीन किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे २,४०,९०० रुपये असेल. जर २२९% वाढ झाली तर ती प्रति १० ग्रॅम ३,६१,९०० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच, पुढील ७ वर्षांत सोने प्रति १० ग्रॅम २.४० लाख रुपयांवरून ३.६१ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. सोन्याच्या किमतींबाबतचा हा अन्दाज खरा ठरला तर एक तोळा सोने खरेदी करणंही सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाईल .

सध्या सोने प्रति औंस $३,६५० वर आहे. कॅपिटल लीगचे राजुल कोठारी म्हणतात की, नजीकच्या भविष्यात सोने $३,७००-$३,८०० पर्यंत जाऊ शकते. परंतु , अल्पावधीत २-५% ची घसरण देखील होऊ शकते.

का वाढत आहेत सोन्याच्या किमती? Gold Rate

जागतिक अनिश्चितता आणि भारतीयांची पारंपारिक खरेदी यामुळेच सोन्याच्या किमतीचा आलेख हा वर वरच जात आहे. स्पेक्ट बुलियन अँड रिफायनरीचे सीईओ दर्शन देसाई यांच्या मते भविष्यात सोन्याच्या किमतीत काही चढउतार होतील, परंतु सुरक्षित गुंतवणुकीची मागणी आणि जागतिक आर्थिक परिस्थिती या दोन्ही कारणांनी सोन्याच्या किमती या वाढतच राहतील. दुसरीकडे, आयबीजेएचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनीही दर्शन देसाई यांच्या सुरात सूर मिसळत म्हंटल कि, जरी बाजार काही काळ स्थिर राहिला तरी, उत्सवाची मागणी आणि सुरक्षित गुंतवणुकीचा प्रवाह सोन्याच्या किमती कमी होऊ देणार नाही.

महाराष्ट्रात 48000 नव्या नोकऱ्या मिळणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली गुडन्यूज

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील तरुणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र सरकारने माहिती तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, गोदाम, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक्स हब यासारख्या क्षेत्रात सुमारे १.०९ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार (MOU) केले आहेत. या करारामुळे राज्यात ४८००० नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात उद्योजकांना सकारात्मक गुंतवणूक अनुभव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही यावेळी फडणवीसांनी म्हंटल.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड नागपूर जिल्ह्यातील कमलेश्वर लिंगा येथे एकात्मिक कोळसा पृष्ठभाग वायूकरण डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह्ज प्रकल्पात ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, यामुळे ३०,००० रोजगार निर्माण होतील, तर पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड नंदुरबारमधील पॉलिमर उत्पादन प्रकल्पात २,०८६ कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी समूहाकडून करण्यात येईल ज्यामुळे ६०० लोकांना रोजगार मिळेल. औद्योगिक गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब उभारणीसाठी एमजीएसए रिअ‍ॅलिटी यांच्यावतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी ₹5000 कोटींची गुंतवणूक केली जात असून, यातून 10,000 रोजगार निर्मिती होईल.

लोढा डेव्हलपर्स लिमिटेड ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क उभारणार आहे. त्यातून ६,००० रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे १,५१३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकात्मिक अन्न आणि पेये उत्पादन सुविधा उभारेल, ज्यामुळे ५०० रोजगार निर्माण होतील.

यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य शासन नेहमीच तत्पर आहे. उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

यावेळी राज्य सरकारच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन आणि अमरप्रकाश अग्रवाल (एमजीएसए रिअॅल्टी), अभिषेक लोढा (लोढा डेव्हलपर्स लिमिटेड), केतन मोदी (रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड), अजित बडोदिया (अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड) आणि प्रणय कोठारी (पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड) यांच्यात सामंजस्य करारांचे आदानप्रदान झाले.

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींना 1500 मिळण्यास सुरुवात; आत्ताच मोबाईल चेक करा

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana August Installment । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या यौजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा केले जातात. आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेतून एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत… आता ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येणार याकडे लाडक्या बहिणी डोळे लावून बसल्या होत्या. अखेर आज त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे.ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आजपासून ऑगस्ट महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलावर्गात मोठं आनंदाचे वातावरण आहे.

अदिती तटकरे यांनी दिली खुशखबर – Ladki Bahin Yojana August Installment

याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी x माध्यमावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हंटल की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. अदिती तटकरे यांच्या या ट्विटनंतर लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana August Installment) मोठा दिलासा मिळाला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana August Installment) लाभाचं वितरण करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला रक्कम वर्ग करण्यात येते. त्याप्रमाणं सामाजिक न्याय विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाच्या वितरणासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यासंदर्भातील शासन निर्णय 9 सप्टेंबरला जारी करण्यात आला होता. त्यामुळं ऑगस्ट महिन्याच्या लाभाचं वितरण करण्यासंदर्भातील एक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलीय.

महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल; राष्ट्रपतींनी या नेत्यावर सोपवली जबाबदारी

President Maharashtra

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतिपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होतील याची प्रतीक्षा अनेकांना लागली होती. अखेर महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालांचे नाव समोर आलं आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल असतील. विशेष बाब म्हणजे आचार्य देववृत्त हे सध्या गुजरातचे सुद्धा राज्यपाल आहेत. आता त्यांच्यावर महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रूपती मुर्मू यांनी हि नियुक्ती केली आहे.

याबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, भारताच्या राष्ट्रपतींनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी नियुक्ती केली आहे, जी ते त्यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त पार पाडतील.

कोण आहेत आचार्य देवव्रत ?

हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समलखा तालुक्यात जन्मलेले आचार्य देवव्रत हे एक शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी आहेत. ते २०१९ पासून गुजरातचे २० वे राज्यपाल म्हणून काम करत आहेत. याआधी ते २०१५ ते २०१९ पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. आता त्यांच्याकडे गुजरात सह महाराष्ट्राचा देखील पदभार सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत एकूण 768 खासदारांनी मतदान केले होते. यामध्ये सीपी राधाकृष्णन यांना एकूण 452 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. तर दुसरीकडे सुदर्शन रेड्डी यांना एकूण 300 पहिल्या पसंतीची मतं मिळाली. त्यामुळे सीपी राधाकृष्णन यांच्या रूपाने भारताला नवे उपराष्ट्रपती मिळाले आहेत. सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाल्यानंतर आता त्यांच्या जागी गुजरातचे राज्यपाल आचार्य देववृत्त यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी करण्यात आली आहे.

Supreme Court On Ind VS Pak Match : भारत- पाक सामना रद्द होणार?? सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

Supreme Court On Ind VS Pak Match

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Supreme Court On Ind VS Pak Match । आशिया चषक २०२५ मध्ये रविवारी म्हणजेच १४ सप्टेंबरलला भारत विरुद्ध पाकिस्तान असा रंगतदार सामना होणार आहे. एकीकडे क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याविषयी मोठी उत्सुकता आहे, तर दुसरीकडे देशवासीयांच्या अशाही भावना आहेत कि ज्याप्रकारे पाकिस्तानने पहलगाम हल्ला करून निष्पाप भारतीयांचे जीव घेतले, त्यांच्या पत्नीचे सिंदूर पुसले ते पाहता कोणत्याही परीस्थितीत पाकिस्तान विरुद्ध खेळायलाच नको. याच संदर्भात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. १४ सप्टेंबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र कोर्टाने अवघ्या ३ शब्दात उत्तर देऊन हा विषयच संपवून टाकला आहे.

काय म्हणाले सुप्रीम कोर्ट? Supreme Court On Ind VS Pak Match

उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी भारत पाकिस्तान सामना रद्द करण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. याचिकेमध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणे हे राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि लोकांच्या भावनांच्या विरुद्ध आहे, असा दावा करण्यात आला होता. १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी सुनावणीची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला. काय गरज आहे? हा सामना आहे, तो होऊ द्या असे उत्तर न्या. जे. माहेश्वरी यांनी दिले. कोर्टाने सामन्याच्या आधी सुनावणी घेण्यास नकार दिल्याने (Supreme Court On Ind VS Pak Match) भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

याचिकेत काय म्हंटल होते?

घटनेच्या कलम ३२ अंतर्गत दाखल केलेल्या या जनहित याचिकेत उर्वशी जैनसह चार कायद्याच्या विद्यार्थिनींनी आशिया कप टी-२० लीगचा भाग म्हणून १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुबई येथे होणारा भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना रद्द करण्याचे निर्देश तात्काळ देण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, २०२५ च्या अंमलबजावणीसाठी निर्देश देण्याचीही मागणी केली आहे. याचिकेत म्हटले आहे की पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय नागरिक आणि सैनिकांनी आपले प्राण गमावले. अशावेळी दहशतवादाला आश्रय देणाऱ्या राष्ट्रासोबत खेळांमध्ये सहभागी होणे म्हणजे आपल्या सैन्याचे मनोबल कमी करण्यासारखं आहे. यामध्ये आपल्या शहिद जवानांना आणि ज्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली त्या कुटुंबाना नक्कीच त्रास होण्याची शक्यता आहे. राष्ट्रहित, सैन्याचे बलिदान आणि देशातील लोकांच्या भावना यांच्यापेक्षा क्रिकेटला जास्त महत्व देता येणार नाही असेही सदर याचिकेत म्हंटल होते.

MHADA Pune Lottery : पुणेकरांना मिळणार स्वस्तात घरे; म्हाडातर्फे 4186 घरांची लॉटरी जाहीर

MHADA Pune Lottery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MHADA Pune Lottery । शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीसाठीचे बेस्ट ठिकाण म्हणून नावलौकिक असणाऱ्या पुण्यात आपलं हक्काचं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. परंतु आजकाल घरांच्या किमती इतक्या गगनाला भिडल्या आहेत कि सर्वसामान्य माणसाला मुंबई पुण्यासारख्या शहरात घर खरेदी करणं म्हणजे कधीही पूर्ण होणाऱ्या स्वप्नासारखं झालं आहे. परंतु आता चिंता करू नका. गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने (MHADA) पुणेकरांसाठी 4186 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात आज 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 पासून होणार आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे पुणेकरांचे हक्काचे घर घेण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.

कोणत्या प्रकल्पात किती घरे ? MHADA Pune Lottery

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने 4186 घरांच्या भव्य सोडतीची (MHADA Pune Lottery) घोषणा केली आहे. या सोडतीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २१९ घरे आहे. म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत १६८३ घरे आहे. तर ८६४ घरे हा सामाजिक गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्त बांधली जाणार आहे. 20% सर्वसमावेशक गृहयोजनेत 3322 घरे उपलब्ध आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात आज 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 पासून होणार आहे. ऑनलाईन अनामत रक्कम स्वीकारण्यासही आजपासूनच सुरुवात होणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:55 पर्यंत असेल. अनामत रक्कम ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:59 पर्यंत ठेवण्यात आली आहे. जे इच्छुक अर्जदार बँकेद्वारे RTGS/NEFT पद्धतीने रक्कम भरतील त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेतच पैसे भरावेत.

या प्राथमिक यादीवर (MHADA Pune Lottery) दावे किंवा हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत 13 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अंतिम यादी 17 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:00 वाजता प्रसिद्ध केली जाईल. पुण्यातील या घरांची सोडत २१ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. तुम्ही २१ नोव्हेंबररोजी संध्याकाळी ६ वाजता वेबसाइटवर जाऊन लॉटरीची माहिती मिळवू शकतात. यावरुन तुम्हाला कोणाला घरे मिळाली याची माहिती मिळेल. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि सोयीसाठी अर्जदारांनी सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासून घ्यावी. नोंदणी करताना, अर्ज भरताना आणि अनामत रक्कम भरत असताना सदर अर्जदारांनी खात्री करावी तसेच वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे असं आवाहन म्हाडा कडून करण्यात आलं आहे.

हाफ तिकीटने प्रवास करणाऱ्या महिलांना धक्का!! ST महामंडळाने घेतला मोठा निर्णय

MSRTC Bus Women

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलावर्गाला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा आजही महाराष्ट्रातील करोडो महिला घेत आहेत. निम्म्या पैशात तिकीट मिळत असल्याने तासनतास महिला एसटी बसची आतुरतेने वाट बघत असतात. परंतु आता याच महिलांना सरकारने जोर का धक्का दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी तिकिट सवलतीत महत्त्वाचे बदल केले आहेत. एसटी महामंडळाने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी एक विशेष ओळखपत्र अनिवार्य केले आहे. हे ओळखपत्र असेल तरच महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिटात सवलत मिळणार आहे.

मार्च 2023 पासून महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बससेवेवर साधी, मिनी, निमआराम, शिवशाही आणि शिवशाही स्लीपर 50% सवलत दिली जात आहे. ही सवलत अजूनही कायम आहे, परंतु त्याच्यासाठी यापूर्वी महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना आधारकार्ड दाखवणे गरजेचं होते. आधारकार्ड नसेल तर ५० टक्के सवलतीचा लाभ मिळत नव्हता.. आता मात्र एसटी महामंडळाने राज्य परिवहन महामंडळाचे अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य केलं आहे. एसटी महामंडळाकडून हे ओळखपत्र दिले जाणार असून यासाठी महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर हे ओळखपत्र बनवावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे हे विशेष ओळखपत्र नसेल तर तुम्हाला एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला प्रवासाचे संपूर्ण तिकिटाचे पैसे द्यावे लागतील.

का घेतला हा निर्णय?

शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सवलतींचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. सवलतींचा गैरवापर टाळण्यासाठी महामंडळाकडून अधिकृत ओळखपत्र जारी करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे सवलतीचा प्रवास योग्य आणि पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे तसेच यामुळे योजना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि व्यवस्थीत राबवता येणार आहे असा विश्वास एसटी महामंडळाला वाटत आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला पहिला धक्का; हैदराबाद गॅझेटबाबत महत्वाचे अपडेट्स

Maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maratha Reservation । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित करण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा केली. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरच्या आधारे 2 सप्टेंबर रोजी जीआर काढला. मात्र यानंतर ओबीसी समाज मात्र अस्वस्थ झाला आहे. आपलं आरक्षण जातेय कि काय? आपल्यात नवीन वाटेकरी येतात कि काय? अशी भीती ओबीसी समाजाला वाटत आहे. आता हैदराबाद गॅझेटबाबत मोठी अपडेट्स समोर येत आहेत. सरकारने हैदराबाद गॅझेटबाबत काढलेल्या जीआर विरोधातच आता याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टात हि याचिका दाखल झाली असून मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी हा पहिला धक्का मानला जात आहे.

कोणी दाखल केली याचिका? Maratha Reservation

हैदराबाद गॅझेटला विरोध करणाऱ्या एक नव्हे तर २ याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. यातील एक याचिका शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने ॲड. सतीश तळेकर यांनी केली आहे, तर दुसरी याचिका व्यवसायाने वकील असलेले विनीत धोत्रे यांनी दाखल केली आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करणार असल्याचा जो जीआर काढला आहे तो पूर्णपणे बेकायदा असल्याने रद्द करावा, याचिका प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी करू नये व त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी अंतरिम मागणी याचिकांद्वारे करण्यात आली आहे. या याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

काय आहे याचिकेत?

मराठा आणि कुणबी एकच नसल्याचे व मराठा समाज आर्थिक व सामाजिक मागास नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करूनही राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करणारा आहे. अशाप्रकारे मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसींमध्ये समाविष्ट करून सरकार ओबीसींची संधी हिरावून घेत आहे. जरांगे यांच्या दबावाला बळी पडून सरकारने ही अधिसूचना काढली आहे असे याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यासह अनेक ठिकाणी मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी गावपातळीवर समित्या गठीत करण्यात येत आहेत. या समित्यांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. प्रमाणपत्रासाठी अर्जदारांनी मराठा समाजातील भुधारक, भूमिहीन शेतकरी किंवा बटाईदार म्हणून जमीन शेती करत असल्याचे पुरावे सादर करणे आवश्यक राहणार आहे.

No PUC No Fuel : या लोकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल- डिझेल मिळणार नाही; सरकारचा मोठा दणका

No PUC No Fuel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन No PUC No Fuel । राज्यातील वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी राज्य सरकारने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नसेल तर तुम्हाला पेट्रोल पंपावर पेट्रोल- डिझेल मिळणार नाही.. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत थेट निर्देश दिले आहेत.

भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचे आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री बोलत होते.

CCTV कॅमेऱ्याच्या आधारे गाड्यांचे स्कॅनिंग- No PUC No Fuel

राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला (स्कॅन करून ) जाईल. जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल. जर त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही. तथापि, त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून देण्याची व्यवस्था देखील केली जाईल. जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटी (UID) असणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते.

भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम व वाहन दुरुस्ती करणारे गॅरेजमध्ये देखील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था (No PUC No Fuel) करण्यात येईल. जेणेकरून रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन हे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेले असेल. ज्यामुळे प्रदूषण पातळी कमी होण्यास मदत होईल. त्याबरोबरच सध्या अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पडदाफाश करण्यासाठी परिवहन विभागाने मोठी धडक मोहीम राबवावी, अशा सूचनाही प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिल्या.