Saturday, December 6, 2025
Home Blog Page 12

शेत रस्त्याची कटकट मिटणार;  सरकारने लॉन्च केली नवी योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने नवीन योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना असे या योजनेचे नाव असून शेतीतील रस्ते वाहतुकीची समस्या मिटवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठीविधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून या रस्त्यांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात यावा तसेच यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की… ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या आयुष्यात क्रांंती घडविणारी ही योजना आहे. शेतकर्‍याच्या शेतापर्यंत रस्ते,वीज आणि पाणी पोहोचले तर त्याला आपला माल बाजारपेठेत घेऊन जाणे शक्य होणार आहे. यासाठी सरकारने प्राधान्याने या योजनेवर भर दिला असून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, सर्व आमदारांनी याबाबत अतिदक्ष राहून सर्व पाणंद रस्ते नकाशावर आणावेत. हा नकाशा पुढील महिनाभरात गावामध्ये प्रसिद्ध करण्यात यावा. विविध 13 योजनांच्या माध्यमातून सध्या या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

​या योजनेसाठी मनरेगा आणि इतर १३ विविध योजनांतून निधी उपलब्ध केला जाईल. ​सीएसआर (CSR) निधीचा उपयोग करण्यासाठी प्रांताधिकारी यांचे विशेष खाते तयार केले जाईल.​एक किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांना व्हीआर नंबर देण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल.

Pune New Tunnel : पुण्यात तयार होणार 2 नवीन बोगदे; प्रवास होणार सुपरफास्ट

Pune New Tunnel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune New Tunnel । शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीचे बेस्ट ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी हा मुख्य प्रश्न बनला आहे. शहराच्या सर्वच भागांना वाहतूक कोंडीने अक्षरशः ग्रासलं आहे. हि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासन सातत्याने नवनवीन प्रकल्प राबवत असते. आता असाच एक निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या वाहतूक कोंडीला तोंड देण्यासाठी, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शहराच्या प्रमुख भागांना जोडणाऱ्या दोन नवीन बोगद्यांच्या योजनांना गती दिली आहे. तळजाई-पाचगाव आणि सुतारदरा-पंचवटी यादरम्यानच्या बोगद्यांची कामे आता लवकरात लवकर मार्गी लागणार आहेत.

प्रवासाचा वेळ अवघ्या १० मिनिटांवर- Pune New Tunnel

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पांना जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर, पीएमसीने आता तळजाई-पाचगाव आणि सुतारदरा-पंचवटी बोगद्याचे काम सुरू करण्यासाठीच्या हालचाली वाढल्या आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी या बोगद्यासाठी आवश्यक जागेची नुकतीच पाहणी केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की तळजाई-पाचगाव बोगदा सातारा रोड आणि सिंहगड रोडला थेट जोडेल. सध्या या मार्गावरील ९-१० चौकांमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ४० ते ५० मिनिटे लागतात. परंतु एकदा का बोगदा बोगदा पूर्ण झाला कि मग हेच अंतर २.५ किलोमीटरपर्यंत कमी होईल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ अवघ्या १० मिनिटांवर येईल. Pune New Tunnel

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या बोगद्यांमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल… त्यांच्या गाडीतील इंधनाची बचत होईल आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होईल.पीएमसी अधिकाऱ्यांनी यावर भर दिला की जलद बोगदा प्रकल्प शहराच्या दीर्घकालीन शहरी गतिशीलता धोरणाचा भाग आहेत आणि हा प्रकल्प वेळेवर कसा पूर्ण करता येईल याकडे आम्ही बारकाईने लक्ष्य ठेवू . थोडक्यात काय तर या प्रस्तावित बोगद्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांचा प्रवास सुसाट होणार आहे. एका तासाचा प्रवास जवळपास पाच – दहा मिनिटांवर येणार असल्याने प्रवाशांचा अतिशय महत्वाचा असा वेळ वाचणार आहे.

अजित पवारांच्या नावाखाली 200 कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचा सनसनाटी आरोप

Ajit Pawar Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाखाली तब्बल २०० कोटींचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या भ्रष्ट्राचार संचालक मंडळाने केला असून या घोटाळ्यात अधिकारी सामील आहेत, तसेच मंत्रालयापर्यंत हफ्ते दिले जात असल्याचा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केलाय. त्यांच्या या आरोपामुळे पुण्याच्या राजकारणात सनसनाटी निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली नाही, तर १५ दिवसांत मोठं आंदोलन करू असा इशाराही रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

पुणे बाजार समितीत ४ हजार बोगस परवाने देऊन शेतकर्‍यांना लुटले जात आहे. शेतकर्‍यांशी घेणेदेणे नसलेल्यांना फुलबाजारातील गाळ्यांचे वाटप करत घोटाळा केला आहे. बाजारात अतिक्रमण करत केस कापणार्‍यांपासून गुटखा विक्री करणार्‍यांना जागांचे वाटप केले. पार्किंगच्या नावाखाली लूट, सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीत भ्रष्टाचार आणि स्वच्छता कंत्राटात गैरव्यवहार असे अनेक गैरप्रकार सुरू आहेत अधिकृत पावती फक्त दहा रुपयांची दिली जाते, मात्र प्रत्यक्षात २०० ते ३०० रुपयांपर्यंत रक्कम वसूल केले जात असून यामध्ये संचालकांचा सहभाग आहे असं रोहित पवार यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, रोजंदारी सेवकांच्या कायम नियुक्तीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. माथाडी कायद्याचा गैरवापर केला जात आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकरी, वाहतूकदार आणि कामगार वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे. शासनाने याप्रकरणाची तातडीने चौकशी करून जबाबदार संचालकांवर कठोर कारवाई करावी.

रोहित पवार यांनी यावेळी थेट अजित पवारांचे नाव घेतलं. अजित पवार कडक नेते असून चुकीच्या कामांना ते पाठीशी घालणार नाहीत, अशी आमची भावना आहे. मात्र, बाजार समितीचे सर्व संचालक अजित पवार यांनी सांगितले असे सांगत त्यांच्या नावावर घोटाळे करत आहेत. यावर स्वतः अजितदादांनी आता खुलासा करावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तसेच जर सरकारने पुढील १५ दिवसांत यावर कोणतीही कारवाई केली नाही, तर शेतकऱ्यांच्या सोबत मोठं आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Mumbai Local Train : आता नवी मुंबईतून थेट वसईला जाता येणार; तयार होतोय नवा रेल्वेमार्ग

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. लोकांचा प्रवास सुखकर, आरामदायी आणि जलद पद्धतीने व्हावा यासाठी मध्ये रेल्वे सातत्याने प्रयत्नशील असते. आताही प्रवाशांच्या भल्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा बहुप्रतिक्षित पनवेल-बोरिवली-वसई लोकल ट्रेन कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या कॉरिडॉरमुळे आता नवी मुंबईतून थेट वसईत जाता येणार आहे. पनवेल-बोरीवली-वसई लोकल ट्रेन कॉरिडोर मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (Mumbai Urban Transport Project) म्हणजेच एमयूटीपीच्या 3 बीच्याअंतर्गत विकसित केला जाणार आहे.

कसा असेल नवीन प्रकल्प ? Mumbai Local Train

सध्याच्या घडीला नवी मुंबईहून बोरिवली किंवा वसईला जायचं म्हंटल तर प्रवाशांना कुर्ला किंवा वडाळ्याला जावे लागते, तेथून ट्रेन (Mumbai Local Train) बदलावी लागते, त्यामुळे साहजिकच प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु आता पनवेल-बोरिवली-वसई लोकल ट्रेन कॉरिडॉरमुळे प्रवाशाना थेट आणि कुठेही न उतरता प्रवास करता येईल. पनवेल-बोरिवली-वसई हा उपनगरीय लोकल रेल्वे कॉरिडॉर 69.23 किमी लांबीचा असेल आणि त्यासाठी 12,710 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर एकूण 19 नवीन स्थानके बांधली जाणार आहेत. यामध्ये जुचंद्र, कामन रोड, पाये गाव, खरबाव, डुंगे, कलवार, भिवंडी रोड, पिंपळस, नवी डोंबिवली, कोपर, निळजे, नांदवली, नारिवली, निघू, तळोजे पानचंद, पिंढार, नवाडे रोड, कळंबोली, तेंबोडे, नवीन पनवेल यांसारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश असेल.

भिवंडीला विशेष फायदा –

69.23 किमी मार्गाच्या या उपनगरीय लोकल सेवेमुळे (Mumbai Local Train) नवी मुंबई परिसरातून मुंबईच्या पश्चिमेला सहज जाता येणं शक्य होणार आहे. नोकरीसाठी नवी मुंबईतून वेस्टर्न लाईनला येणाऱ्या चाकरमान्यांना याचा विशेष लाभ होईल. तसेच या प्रवाशांच्या वेळेची बचतही होईल. परंतु त्यापेक्षाही सर्वात जास्त फायदा कोणाला होणार असेल तर तो भिवंडीकरांना होणार आहे. ‘लूम पॉवर इंडस्ट्री’ अशी ओळख असलेल्या भिवंडी शहराला आता नवी मुंबई आणि पश्चिम मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. याशिवाय शिळफाटा रोडवरील पलावा, रुणवाल सिटी यांसारख्या मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पातील रहिवाशांनाही बोरिवली, वसई आणि पनवेल गाठण्यासाठी नवा पर्याय मिळेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. 

Mobile Internet Saving Tips : मोबाईलचं नेट लगेच संपतंय? मग आत्ताच बदला ‘या’ सेटिंग्स

Mobile Internet Saving Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mobile Internet Saving Tips आजकाल मोबाईल म्हणजे आपला जीव कि प्राण… एकवेळ तुम्ही जेवण करायचं विसराल, परंतु मोबाईल हातात घेतल्याशिवाय राहणार नाही…. मोबाईलचे वेड आता व्यसनात बदलत आहे, आणि त्यातील इंटरनेट म्हणजे मोबाईलचा जणू आत्माच…. जसे पंख्याशिवाय पक्षी काहीच करू शकत नाही, त्याचप्रमाणे इंटरनेट शिवाय मोबाईलला किंमत नाही… म्हणूनच कि काय मोबाईलचे रिचार्ज कितीही महाग झाले तरी इंटरनेटच्या वापरासाठी आपण पैसे खर्च करतोच. सध्याच्या महागाईच्या काळात अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत, तर हे करत असताना दुसरीकडे इंटरनेट डेटा प्लॅन मात्र कमी केला आहे. त्यामुळे अनेकांना इंटरनेटची बचत करत करत वापर करावा लागतोय. अनेक वापरकर्त्यांची समस्या तर हीच असते कि त्यांचे नेट खटाखट उडते.. अशावेळी नेमकं काय करायचं? कोणती ट्रिक वापरून इंटरनेटची बचत करायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) डेटा सेव्हर मोड चालू करा-

सर्वात आधी तुमच्या मोबाईल सेटिंग्जमध्ये डेटा सेव्हर मोड सुरू करा. यामुळे बॅकग्राउंड डेटा वापर कमी होईल आणि तुमचा डेटा फक्त गरजेच्या ॲप्ससाठी वापरला जाईल. इतर कुठेही विनाकारण तो खर्च होणार नाही.

२) ऑटो अपडेट्स बंद करा- Mobile Internet Saving Tips

अनेकदा जेव्हा तुम्ही इंटरनेट डेटा सुरु करता तेव्हा अँड्रॉइड आणि आयफोनमधील अॅप्स आणि ऑपरेटिंग सिस्टम ऑटोमॅटिक अपडेट होतात. यामुळे तुमची गरज नसतानाही फुकटचे नेट वाया जाते. त्यामुळे हे ऑटो अपडेट्स बंद करणे गरजेचं असते. यासाठी तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जावा. अॅप्स आणि सिस्टम अपडेट्स फक्त वायफायवर सेट करा. यामुळे तुमचे दररोजचे इंटरनेट वाचेल आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाचे वायफाय वापराल तेव्हाच ते अँप्स अपडेट होत राहतील.

३) WhatsApp डाउनलोड थांबवा-

कधी कधी तुमच्या WhatsApp वर येणारे फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाउनलोड होतात… हे फोटो कधी आणि कसे आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतात हे तुम्हाला माहितीही पडत नाही. परिणामी तुमचा इंटरनेट डेटा अनावश्यक्य संपतो. अशावेळी व्हाट्सअप सेटिंग मध्ये जावा… आणि ऑटो डाउनलोड बंद करा (Mobile Internet Saving Tips) . गरज असेल तेव्हाच फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड करा.

४) व्हिडिओ लो क्वालिटी बघा –

तुमच्यापैकी अनेकजण युट्युब किंवा इतर प्लॅटफॉर्म वरून विडिओ बघत असतील. विडिओ बघत बसल्याने तर सर्वात जास्त इंटरनेट जाते. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही युट्युब वर विडिओ बघाल तेव्हा त्याची क्वालिटी अतिशय लो ठेवा.. म्हणजे तुम्ही कितीही वेळ विडिओ बघितला तरी इंटरनेटची बचत होऊ शकते. तर मित्रानो, या सोप्या पद्धतींनी तुम्ही तुमच्या इंटरनेटची बचत करू शकता.

Mumbai To Nagpur Special Train : मुंबईवरून नागपूरसाठी सुरु होणार स्पेशल ट्रेन; कसा असेल रूट?

Mumbai To Nagpur Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai To Nagpur Special Train । महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरच्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबई – नागपूर प्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे. सध्याच्या सणासुदीच्या काळात म्हणजे दुर्गादेवी, दसरा, दिवाळी या काळात मुंबई वरून नागपूरला वाजणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते, साहजिकच, जास्त प्रवासी एकाच वेळी प्रवासासाठी बाहेर पडल्याने गर्दी होते. गर्दीच्या संख्येनुसार, पुरेशी वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याचे प्रवाशांच्या प्रवासाचा खेळ खंडोबा होतो. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २५ सप्टेंबर पासून मुंबईतून नागपूरसाठी एक विशेष रेल्वे चालवली जाईल. या नव्या रेल्वेगाडीमुळे विदर्भवासीयांचा प्रवास आणखी सोप्पा, आरामदायी आणि जलद होण्यास मदत होणार आहे.

कसं असेल रेल्वेचे वेळापत्रक? Mumbai To Nagpur Special Train

ट्रेन क्रमांक ०२१३९ हि २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) वरून नागपूर असा प्रवास करेल. ही दिवाळी स्पेशल रेल्वे दर गुरुवारी मुंबईवरून मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांनी सुटेल आणि दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०२१४० २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी नागपूरहून दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी मुंबईत दाखल होईल (Mumbai To Nagpur Special Train) . हि स्पेशल ट्रेन ३ एसी ३-टायर, १० स्लीपर, ५ जनरल सेकंड क्लास, २ सेकंड सीटिंग आणि गार्ड-ब्रेक व्हॅनसह असेल.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार?

मुंबई ते नागपूर स्पेशल ट्रेन तिच्या प्रवासादरम्यान, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. Mumbai To Nagpur Special Train

पुणे नागपूर ट्रेनही धावणार –

मुंबईशिवाय मध्य रेल्वे सणासुदीच्या काळात पुणे ते नागपूर अशी रेल्वेही सुरु करणार आहे. पुणे – नागपूर विशेष रेल्वेगाडी 27 सप्टेंबरपासून (Pune Nagpur Special Train) सुरु होणार आहे. ही स्पेशल गाडी 30 नोव्हेंबर पर्यंत धावेल. ०१२०९ नागपूर -पुणे- नागपूर साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या) रेल्वे गाडी २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. तर ०१२१० नागपूर- पुणे- नागपूर विशेष (१० सेवा) रेल्वे गाडी २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. या प्रवासादरम्यान, ती उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर , कोपरगाव, मनमाड , जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

Nepal Protests : मोठी बातमी!! तरुण मुले थेट संसदेत घुसली; पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

Nepal Protests

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nepal Protests। भारताचा शेजारी देश असलेला नेपाळ मोठ्या भीषण संकटात आहे. नेपाळच्या संसदेत हजारो तरुण मुले शिरली आहेत. तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जात आहेत. या तरुण आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी आंदोलकांवर फायरिंग सुद्धा केली. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे बोललं जात आहे. नेपाळ सरकारने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर हा सगळा राडा झाल्याचं बोललं जात आहे.

देशातील जनता सरकारवर नाराज – Nepal Protests

नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी ४ सप्टेंबरपासून देशात सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली आहे. नेपाळ सरकारने 4 सप्टेंबरला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, वॉट्सऐप, रेडिट आणि X सारख्या 26 सोशल मीडिया ऐप्सवर बंदी घातली आहे. या बंदीचे मोठे पडसाद आज नेपाळ मध्ये पाहायला मिळाले. सोशल मीडियाच्या बंदीमुळे शिक्षण आणि व्यवसाय प्रभावित होत आहे असे या तरुण आंदोलकांचे म्हणणं आहे. आधीच नेपाळ मध्ये बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीवरून सरकार वर नाराजी आहे. त्यात आता सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केल्याने खास करून युवकांमध्ये संताप उसळला. या बंदीविरोधात राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये हजारो Gen-Z तरुणांनी हिंसक निदर्शने केली. यादरम्यान शेकडो तरुण नेपाळच्या संसदेत घुसले.आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून आणि गेट ओलांडून न्यू बानेश्वर येथील संघीय संसद परिसरात घुसखोरी केली. Nepal Protests

या एकूण परिस्थितीमुळे संपूर्ण देशभरात मोठा गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू केली आहे. नेपाळी वृत्तपत्र ‘रिपब्लिका’नुसार, तरुण आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि डझनभर रबर बुलेटचा वापर केला. पोलिसांच्या कारवाईत एका आंदोलकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. काठमांडू डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ऑफिसने संपूर्ण न्यू बानेश्वरमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे . मुख्य जिल्हाधिकारी छाबीलाल रिजाल यांनी सेक्शनमध्ये 6 अंतर्गत दुपारी 12. 30 पासून लावलेला कर्फ्यू रात्री 10 वाजेपर्यंत असेल.

Pune Nagpur Special Train : पुणे- नागपूरसाठी विशेष ट्रेन; पहा कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार

Pune Nagpur Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nagpur Special Train । सध्याचे दिवस हे सणासुदीचे दिवस आहेत. नुकतंच सर्वानी गणपती विसर्जन केलं आहे. यानंतर आता महिन्याच्या अखेरीस नवरात्री आणि पुढच्या महिन्यात दिवाळीचा सण येईल. सणासुदीच्या काळात मुंबई- पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरांत काम करणारा नोकरदार वर्ग मूळगावी जातो. एकाच वेळी जास्त लोक प्रवासासाठी बाहेर पडल्याने गर्दी तर होणारच… तसेच या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.येत्या २७ सप्टेंबर पासून नागपूर ते पुणे अशी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या रेल्वेगाडी मुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल. तसेच नवरात्रीच्या काळात प्रवाशांचा प्रवासही सोप्पा आणि आरामदायी होईल.

कसे असेल ट्रेनचे वेळापत्रक? Pune Nagpur Special Train

पुणे – नागपूर विशेष रेल्वेगाडी 27 सप्टेंबरपासून (Pune Nagpur Special Train) सुरु होणार आहे. ही स्पेशल गाडी 30 नोव्हेंबर पर्यंत धावेल. ०१२०९ नागपूर -पुणे- नागपूर साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या) रेल्वे गाडी २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. तर ०१२१० नागपूर- पुणे- नागपूर विशेष (१० सेवा) रेल्वे गाडी २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल.

कोणकोणत्या स्थानकावर थांबणार?

मध्य रेल्वेने या विशेष रेल्वेगाडीला (Pune Nagpur Special Train) या मार्गावरील 14 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार, पुणे नागपूर स्पेशल ट्रेन उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर , कोपरगाव, मनमाड , जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. सद्यस्थितीत नागपूर वरून पुण्याला रेल्वेने यायचं म्हंटल तर रेल्वेगाड्यांची संख्या अतिशय मर्यादित आहे. अशावेळी या नवीन स्पेशल ट्रेन मुळे प्रवाशांना दिवाळीच्या काळातही जलद आणि सुरक्षित प्रवास अनुभवायला मिळेल अशी आशा रेल्वे विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Chhagan Bhujbal Against Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाला पुन्हा धक्का? GR विरोधात भुजबळ कोर्टात जाणार

Chhagan Bhujbal Against Maratha Aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Chhagan Bhujbal Against Maratha Aarakshan । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित करण्यासाठी सरकारने नवीन GR काढत हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी केली. सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाज अस्वस्थ झाला. आपल आरक्षण जातंय कि काय अशी भावना ओबीसी समाजात निर्माण झाली. याच एकूण सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात भुजबळ आता थेट मुंबई हायकोर्टात जाणार आहेत. छगन भुजबळ यांच्याकडून येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआर विरोधात याचिका दाखल केली जाणार आहे.

भुजबळांना इतर राजकीय नेत्यांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता- Chhagan Bhujbal Against Maratha Aarakshan

भुजबळांना इतर नेत्यांचाही छगन भुजबळ यांनी यापूर्वीही सरकारने काढलेल्या जीआरवर नाराजी व्यक्त केली होती. सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज किंवा उद्या मराठा आरक्षण संदर्भातील निर्णयाला हायकोर्टात याचिका दाखल करत छगन भुजबळ हे आव्हान देणार आहेत. खरं तर यासाठी मागील ३-४ दिवसांपासून छगन भुजबळ अनेक वकिलांसोबत चर्चा करत आहेत. ओबीसी समाजाकडून कागदपत्रांची जुळणी सुरु होती. ही कागदपत्रे जमा झाल्यानंतर आता छगन भुजबळ हे येत्या २ दिवसांत मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात कोर्टाचे दार ठोठावतील. विशेष बाब म्हणजे छगन भुजबळ हे सर्व ओबीसी नेत्यांच्यावतीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल (Chhagan Bhujbal Against Maratha Aarakshan) करणार आहेत. म्हणजेच त्यांना ओबीसी समाजातील इतर राजकीय नेत्यांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. तसेच मराठा विरुद्ध ओबीसी हा नवा वादही उफाळून येऊ शकतो.

मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार याबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना विचारलं असता, आमच्या जीआरला खोड करून अडचणी आणल्यास महाराष्ट्रात यांना येऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा रोष घेणार नाहीत असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच आम्हाला हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र द्या, अन्यथा येत्या दसरा मेळाव्यास भूमिका जाहीर करावी लागेल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

Mumbai Local Train : मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सोप्पा; AC लोकल होणार 18 डब्ब्यांची

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे मुंबई लोकल मधून प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी व्हावा आणि त्यांना गारेगार प्रवासाचा आनंद मिळावा यासाठी रेल्वेने एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईकरांना आता १८ डब्यांची एसी लोकल मिळणार आहे. हि लोकल ट्रेन वंदे मेट्रो सारखी असेल. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे २,८५६ वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी आणि दीर्घकालीन देखभालीसाठी ई-निविदा जाहीर करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई लोकल ट्रेनचा चेहरामोहराच बदलणार आहे.

२ नवीन डेपोही उभारणार – Mumbai Local Train

सध्या मुंबईत मुख्यतः १२ आणि काही ठिकाणी १५ डब्यांच्या लोकल धावतात. मात्र, नवीन AC लोकल ट्रेन १२, १५ आणि १८ डब्यांची असेल. पुढील ७ ते ८ वर्षांत मुंबई उपनगरीय सेवेत कमीत कमी २३८ AC लोकल ट्रेन उपलब्ध होतील. या लोकलमुळे (Mumbai Local Train) मुंबईकरांचा प्रवास आणखी आरामदायी आणि वेगवान होणार आहे. १२/१५/१८ डब्याच्या AC लोकल ट्रेनच्या कॉन्फिगरेशनमध्ये ३५ वर्षे देखभाल केली जाईल, ज्यामध्ये MUTP-III आणि MUTP-3A अंतर्गत दोन नवीन देखभाल डेपोची स्थापना करण्यात येईल असे MRVC ने एका निवेदनात म्हटले आहे. मध्य रेल्वेवरील भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेवरील वाणगाव येथे हि २ नवीन डेपो तयार केले जातील.

मार्चमध्ये, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती की, मुंबई उपनगरीय नेटवर्कसाठी २३८ वातानुकूलित (एसी) लोकल ट्रेन खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. “मी महाराष्ट्रात होतो आणि मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train) सुधारणांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. आम्हाला आनंद होत आहे की २३८ नवीन लोकल ट्रेन खरेदीला अखेर मंजुरी देण्यात आली आहे,” असे वैष्णव यांनी संसदेत सांगितले होते. अखेर आता याबाबत निविदा काढण्यात आली असून रेल्वेमंत्र्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आहे. ही निविदा सादरीकरण ८ डिसेंबरपासून सुरू होईल आणि निविदा उघडण्याची तारीख २२ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली. ही निविदा मेक इन इंडिया धोरणानुसार राबवली जाणार आहे. ज्यामुळे देशांतर्गत उत्पादन आणि तंत्रज्ञानाला चालना मिळेल.