Sunday, December 7, 2025
Home Blog Page 16

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : दक्षिण मुंबईतील ‘हे’ रस्ते बंद; वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय

Manoj Jarange Mumbai Morcha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil Mumbai Morcha । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखोंच्या संख्यने मराठा बांधव मुंबईला गेला आहे. मराठा बांधवांच्या मोठ्या संख्यने मुंबईतील सीएसएमटी परिसरासह संपूर्ण दक्षिण मुंबई पॅक झाली आहे. रस्त्यांवरील गाडयांनाही जागा नाही अशी परिस्थिती झाली आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील काही रस्ते बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे वाहतुकीतील हे बदल पाहूनच मुंबईकरांनो घराबाहेर पडा.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर मराठा बांधवांची मोठी गर्दी (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) होत आहे. त्यामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबत ट्विट करत म्हंटले कि, उद्या सकाळी सुरू असलेल्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईकडे जाताना वाहतूक मंदावण्याची आणि कधीकधी अडथळा येण्याची शक्यता आहे. गैरसोय कमी करण्यासाठी वाहतूक चौकांवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे .

कोणकोणते रस्ते बंद? Manoj Jarange Patil Mumbai Morcha

१) मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतूकीसाठी बंद राहणार आहेत.
२) जे.जे उड्डाणपुला मार्गे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या मुंबई पोलिस आयुक्तालयामार्गे पुढे मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानक मार्गे पुढे जाऊ दिले जाणार.
३) मेट्रो जंक्शन ते सीएसएमटीच्या दिशेने येणारा आझाद मैदानच्या मुख्यद्वाराजवळील मुंबई महानगरपालिका मार्ग हाही बंद ठेवला जाणार आहे.
४) हजारीमल सोमानी रोड जो फॅशनस्ट्रीटहून CSMT कडे येणारा आणि आझाद मैदानला लागून असलेला मार्गही बंद असणार आहे.
५) हुतात्मा चौकाहून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत.
६) मंत्रालयासमोरील मॅडम कामा रोड ते मरीनड्राईव्ह जंक्शन मार्गही सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या या महत्वाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव फोर्सही देण्यात आली आहे. वडाळा वाहतूक पोलिसांना 35 तर आझाद मैदान पोलिसांना 35 अशी 70 जणांची वाढीव कुमक देण्यात आली आहे.

LPG Gas Cylinder Price : बाप्पा पावला रे!! गॅस सिलेंडर झाला स्वस्त; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन LPG Gas Cylinder Price । सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना मोठी गुडन्यूज आहे. गॅस सिलेंडरच्या किमती तब्बल ५१.५० रुपयांनी कमी झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना जणू बाप्पाचा पावला असं म्हणावं लागेल. परंतु या किमती घरगुती गॅस सिलेंडर साठी नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी कमी झाल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती आहे तशाच कायम आहेत, त्यात कोणताही बदल झालेला नाही.

कोणत्या शहरात किती रुपये दर? LPG Gas Cylinder Price

तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केल्यानंतर नव्या दरानुसार, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १६३१.५० रुपयांवरून १५८० रुपयांवर आली आहे. कोलकातामध्ये यापूर्वी १७३४.५० रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर आता १६८४ रुपयांत मिळेल. मुंबईत सुद्धा व्यावसायिक गॅस सिलेंडर १५८२.५० रुपयांवरून १५३१.५० रुपयांवर आला आहे. तर दक्षिण भारतातील चेन्नई मध्ये १७८९ रुपयांचा गॅस सिलेंडर आता १७३८ रुपयांना मिळणार आहे. यामुळे हॉटेल चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे हॉटेल, बार, लॉज, ढाबा, रेस्टॉरंट अशा ठिकाणी जेवणाचे रेट कमी होतील.

तस बघितलं तर मागील काही महिन्यापासून १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती (LPG Gas Cylinder Price) सातत्याने कमी होताना दिसत आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात तेल विपणन कंपन्यांनी देशभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ३३.५० रुपयांची कपात केली होती. जुलै महिन्यात सुद्धा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती ५८ रुपयांनी स्वस्त झाली होती. आता सप्टेंबर महिन्यात ५१.५० रुपयांनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती, भारतीय चलन रुपयाची स्थिती आणि इतर बाजार परिस्थितीवर गॅस सिलेंडरच्या किमती अवलंबून असतात.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय!! उद्यापासून पाणी पिणं बंद

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील २ दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषण पुकारलं आहे. लाखो मराठा बांधव मुंबईत गेले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. याच दरम्यान, जरांगे पाटील यांनी आज टोकाचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून पाणीही पिणं बंद करणार आहेत. जरांगे पाटलांच्या या निर्णयामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार आहे. आता सरकार मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कस हाताळतंय ते बघावं लागेल.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, काल आणि आज मी पाणी प्यायलो. उद्यापासून मी पाणी घेणार नाही. पाणी बंद करणार आहे. सरकार मागण्यांची अंमलबजावणी करत नाही. त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आता माझं उपोषण कडक करणार आहे. तुम्ही सर्वानी शांत राहावा. सरकारने आपल्यावर कितीही अन्याय अत्याचार करू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हा माझा शब्द आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपली उपोषणाची लढाई आणखी बोथट केली.

राज ठाकरेंवर टीका- Manoj Jarange Patil

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकलेलं पोरगं. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बरबाद झाला तरी चालतं. तुमचे ११ ते १३ आमदार निवडून दिले. ते पळून गेले. आम्ही विचारलं का. देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेला तुझा गेम केला, विधानसभेला तुझ्या मुलाला पाडलं. तरी आम्ही विचारलं का? तुम्ही पुण्याला गेला, नाशिकला गेला, आम्ही विचारलं का? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंचा पाणउतारा केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या कोणत्या?

1) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
2) मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे
3) हैदराबाद गझेटियर लागू करा…तसेच सातारा, मुंबई गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
४) सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या पोट जात म्हणून घ्या.
५) मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी
६) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.

मनोज जरांगे हे शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदाराच्या विधानाने खळबळ

Manoj Jarange Patil sharad pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Pati) हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे भाजप आमदार संजय केणेकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना एक स्फोटक विधान केलं आहे. मनोज जरांगे पाटील हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब आहे, शरद पवार हे मनोज जरांगेंचा वापर करत आहेत. शरद पवारांनी (Sharad Pawar) सुसाईड बॉम्ब व्यक्तिगत द्वेषापायी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेला आहे असं म्हणत संजय केणेकर (Sanjay kenekar) यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय केणेकर यांनी म्हंटल कि, शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून मनोज जरांगेंकडे बघितले जाते. शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता परस्पर जरांगे सारखे सूसाईड बॉम्ब तयार करतात आणि त्याचा वापर करतात हे राज्याचं दुर्देवं आहे. शरद पवारांनी जरांगे हा सुसाईड बॉम्ब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकण्यासाठी तयार केला आहे. पवारांची कारकीर्द पाहिली तसेच यापूर्वीचा इतिहास बघितला तर तो असाच राहिला आहे. पवारांनी कोणालाच मुख्यमंत्री पदावर कायमचं बसू दिलेलं नाही. परंतु जरांगे पाटील यांच्यामुळे समाजाचे नुकसानच होत आहे असं संजय केणेकर यांनी म्हंटल.

जरांगे पाटलांना कोणाकोणाचा पाठिंबा ?

ओमराजे निंबाळकर – खासदार, धाराशिव लोकसभा
कैलास पाटील – आमदार, धाराशिव-कळंब विधानसभा
संजय ऊर्फ बंडू जाधव – खासदार, परभणी लोकसभा
उत्तमराव जानकर, आमदार माळशिरस विधानसभा
बजरंग सोनवणे खासदार, बीड लोकसभा
नारायण आबा पाटील, आमदार करमाळा विधानसभा
संदीप क्षीरसागर आमदार, बीड विधानसभा
राजेश विटेकर – आमदार पाथरी विधानसभा
विजयसिंह पंडित – आमदार, गेवराई विधानसभा
प्रकाश सोळंके – आमदार, माजलगाव विधानसभा
राजू नवघरे – आमदार- वसमत विधानसभा
डॉ. – बाबासाहेब देशमुख, आमदार सांगोला विधानसभा

जरांगे पाटील यांच्या मागण्या काय ?

1) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
2) मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे
3) हैदराबाद गझेटियर लागू करा…तसेच सातारा, मुंबई गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
४) सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या पोट जात म्हणून घ्या.
५) मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी
६) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश!! सरकारने मान्य केली ‘ती’ मागणी

Manoj Jarange Patil Mumbai Morcha (2)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil Mumbai Morcha । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून बसणऱ्या मनोज जरांगे पाटलाना मोठं यश मिळालं आहे. जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर नेमण्यात आलेल्या वंशावळ समितीला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. हि मागणी आता सरकार कडून पूर्ण करण्यात आली आहे. राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील सवलती मिळवता येतील- Manoj Jarange Patil Mumbai Morcha

खरं तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं 25 जानेवारी 2024 रोजी तालुकास्तरावर वंशावळ समिती गठीत केली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. नंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला होता. या उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीला अनुसरून तालुकास्तरीय समितीला किमान सहा महिन्यांची अधिक मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ 30 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. मराठा समाजातील पात्र व्यक्तींची वंशावळ तपासून त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देणं, ज्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील सवलती मिळवता येतील. हाच या समितीचा मुख्य हेतू होता. सरकारने आता या समितीची मुदतवाढ केल्याने मराठा बांधवांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) सरकार ऍक्शन मोड मध्ये आलं आहे. मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु होणार आहे. उपसमितीचे सदस्य दादा भुसे, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांच्यासह इतर सदस्य या बैठकीसाठी दाखल होत आहेत. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमका काय निर्णय होतो? सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर जाणार का? जरांगे पाटलांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य होणार? याकडे समस्त मराठा बांधवांचे लक्ष्य लागलं आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आंदोलक- पोलिसांमध्ये बाचाबाची; मुंबईत वातावरण तापलं

Manoj Jarange Patil Mumbai Morcha (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil Mumbai Morcha। मराठा आरक्षणासाठी मुंबई गाठलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून सकासकाळीच मराठा आंदोलक आणि मुंबई पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. आझाद मैदानावर मुसळधार पावसामुळे मराठा आंदोलक मुंबई महानगरपालिकेच्या समोरच्या रस्त्यावर उतरले असून तिथे त्यांचं आंदोलन सुरू आहे. एक मराठा लाख मराठा.. आता कस, तर पाटील म्हणतील तस अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आहे. मात्र या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.. परिणामी पोलिसांची मोठी फौज याठिकाणी दाखल झाली… त्यांनी मराठा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला… यावेळी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

आमची बसण्याची व्यवस्था तरी सरकारने नीट करावी- Manoj Jarange Patil Mumbai Morcha

मुंबई एकीकडे पाऊस सुरु असताना दुसरीकडे आमच्या खाण्यापिण्याची सोय नाही, खाऊगल्ल्ली बंद केली आहे….. हॉटेलं बंद अशा परिस्थितीमध्ये पोटावर पाय आल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी आपल्यासोबत आणलेली रसद वापरत रस्त्यातच चूल मांडत त्यावर पोहे, नाश्ता बनवण्यात सुरुवात केली आणि आरक्षणाच्या मागणीसाठीच्या घोषणा केल्याचं पाहायला मिळालं. आझाद मैदानावर पाणीच पाणी पाणी साचलं आहे, आम्हाला चिखलात बसावं लागतंय, तिथे कमीत कमी खडी तरी टाकावी, आमची बसण्याची व्यवस्था तरी सरकारने नीट करावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. आम्ही सर्वांना सहकार्य करत असूनही इथं आमच्यासाठी मात्र प्रशासन सहकार्य करतान दिसत नाहीये असं म्हणत मराठा समाजाने संताप व्यक्त केला. Manoj Jarange Patil Mumbai Morcha

आंदोलकांनी सीएसटी आणि बीएमसी बाहेर अक्षरशः रस्ता जाम करून टाकला… ,त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली…. बसेस गाड्या अनेक वेळापासून जागेवरच थांबल्या आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांनी मुंबईतील हा चौक रिकमा करावा अशी विनंती पोलिसांकडून विनंती करण्यात आली. पण आंदोलक काहीही ऐकण्याच्या तयारीत नाहीत.. जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाबाबत सरकार जोपर्यंत भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत रस्ता रिकमा केला जाणार नाही, असे मराठा आंदोलकांकडून (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) स्पष्ट करण्यात आले.

Eknath Shinde On Maratha Aarakshan : OBC मधून मराठ्यांना आरक्षण नाहीच; एकनाथ शिंदेनी स्पष्टच सांगितलं

Eknath Shinde On Maratha Aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Eknath Shinde On Maratha Aarakshan । मराठा समाजाला ओबीसी कोट्यातुनच आरक्षण मिळावं हि मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, विजयाचा गुलाल अंगावर घेतल्याशिवाय इथून उठणार नाही अशी गर्जना मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातून केली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि लाखो मराठा बांधव मुंबईत एकवटल्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे. याच दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरून सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू, परंतु ओबीसी आरक्षण काढून मराठा समाजाला ते देता येणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसेल ते देऊ असं एकनाथ शिंदेनी म्हंटल आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले? Eknath Shinde On Maratha Aarakshan

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. आजही त्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळतोय. कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली. लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत, आजही ती समिती काम करत आहे. आमच्या सरकारने सारथीच्या माध्यामातून विविध कोर्सेस सुरू केले, त्याचा लाभ होतोय. समाजाला बिनव्याजी कर्ज, हॉस्टेलची सोय केली. अनेक योजना मराठा समाजासाठी आणल्या, त्याचा लाभ मराठा समाजाला मिळतोय.

परंतु ओबीसी समाज असो वा इतर कोणताही समाज असो, त्यांचं आरक्षण कमी करून दुसऱ्याला देऊन, याच काढून त्याला देणे हे करता येणार नाही. पण मराठा समाजासाठी जे जे करता आलं ते आम्ही केलं, यापुढेही आम्ही करेन.. जे योग्य आहे, कायद्याच्या चौकटीत आणि नियमात बसून जे काही द्यायचं आहे ते देण्याची भूमिका आजही सरकारची आहे (Eknath Shinde On Maratha Aarakshan) अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेनी दिली. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारं हे सरकार आहे, हे सरकार गोळ्या घालणार सरकार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.

ठाकरेंची भूमिका काय?

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख यांनाही पत्रकारांनी विचारलं कि, मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यावं का? याबाबत तुमचं मत काय आहे? त्यावर उत्तर देताना ठाकरेंनी आरक्षणाचा चेंडू सत्ताधाऱ्यांच्या कोर्टात टाकला. मी याआधी जरांगे यांच्या समोर माझी भूमिका मांडलेली आणि मी काही ही बोललो तरी सरकार काय करणार? माझ्याकडे आत्ता सत्ता नाही, काहीच नाही, त्यामुळे माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही. परंतु ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं, तेच आज सत्तेत आहेत, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. ज्यांनी आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ते लोक आता गावी पळालेत. का फक्त दर्शन घेतात. गेले अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत मग ते जरांगेंना न्याय का देऊ शकत नाहीत असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.

Uddhav Thackeray On Maratha Aarakshan : मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यावं का? अवघड प्रश्नावर ठाकरेंचं उत्तर चर्चेत

Uddhav Thackeray On Maratha Aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Uddhav Thackeray On Maratha Aarakshan । मराठा समाजाला ओबीसी कोट्यातुनच आरक्षण मिळावं हि मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसोबत मुंबईला गेले आहेत. आझाद मैदानावर जरांगे पाटलांचं उपोषण सुरु असून संपूर्ण मुंबईत आज भगवं वादळ बघायला मिळतेय. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यावं का? याबात तुमचं मत काय आहे? असा सवाल केला असता उद्धव ठाकरेंनी सावध प्रतिक्रिया देत आरक्षणाचा चेंडू सत्ताधाऱ्यांच्या कोर्टात टाकला. माझ्या बोलण्याचा काहीच अर्थ नाही, कारण मी सत्तेत नाही. त्यामुळे यावर सत्ताधार्यांनीच बोललं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी (Uddhav Thackeray On Maratha Aarakshan) सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. आरक्षणासाठी मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत आणि गुवाहाटीला जाणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मुंबई मराठी लोकांची राजधानी आहे. आंदोलक दहशतवादी नाहीत, आणि जे आंदोलन करण्यासाठी आले आहेत ती आपली मराठी माणसं आहेत. मराठा समाजाला नाईलाजाने न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले?

मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यावं का? Uddhav Thackeray On Maratha Aarakshan

यादरम्यान, मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यावं का? असा अडचणीत टाकणारा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. मात्र ठाकरेंनी स्ट्रेट ड्राइव्ह मारत हा प्रश्न सत्ताधाऱ्यांकडे टोलवला. ही सगळी जबाबदारी सरकारची आहे. मी याआधी जरांगे यांच्या समोर माझी भूमिका मांडलेली आणि मी काही ही बोललो तरी सरकार काय करणार? माझ्याकडे आत्ता सत्ता नाही, काहीच नाही, त्यामुळे माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही. परंतु ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं, तेच आज सत्तेत आहेत, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा.. काही जण तर पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री होतात, परंतु तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी का सोडवला नाही हे त्यांना विचारा असा उलट सवाल (Uddhav Thackeray On Maratha Aarakshan) उद्धव ठाकरेंनी केला. ज्यांनी आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ते लोक आता गावी पळालेत. का फक्त दर्शन घेतात. गेले अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत मग ते जरांगेंना न्याय का देऊ शकत नाहीत असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.

Vande Bharat Express Train : रेल्वे विभागाचा मोठा निर्णय!! वंदे भारतचे डब्बे वाढवणार

Vande Bharat Express Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Vande Bharat Express Train भारतीय रेल्वे विभागाने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे डब्बे १६ वरून २० करण्याचं रेल्वे विभागाने ठरवलं आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार वंदे भारत गाड्यांमध्ये अधिक डब्बे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सरसकट सर्वच ट्रेनमध्ये हे बदल करण्यात येणार नाहीत, तर फक्त ७ वंदे भारत एक्सप्रेस मध्ये हे बदल करण्यात येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना आता अतिरिक्त सीट्स मिळणार आहेत, आरामदायी प्रवास करता येणार आहे तसेच रेल्वेचे उत्पन्नही वाढणार आहे.

कोणकोणत्या रेल्वेचे डब्बे वाढवणार – Vande Bharat Express Train

१) मंगळुरू सेंट्रल-तिरुवनंतपुरम सेंट्रल वंदे भारत
२) सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत
३) चेन्नई एग्मोर-तिरुनेलवेली वंदे भारत
४) मदुराई-बेंगळुरू कॅन्ट वंदे भारत
५) देवघर-वाराणसी वंदे भारत
६) हावडा-राउरकेला वंदे भारत
७) नागपूर-इंदूर वंदे भारत (Vande Bharat Express Train)

रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रसिद्धी कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांच्या मते, “१६ डब्यांची ट्रेन २० डब्यांची केली जाईल आणि ८ डब्यांची ट्रेन १६ डब्यांची केली जाईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ७ या मार्गांवर 8 कोच असलेल्या 4 वंदे भारत गाड्या आणि 16 कोच असलेल्या 3 वंदे भारत गाड्या चालवल्या जात आहेत. मात्र आता डब्यांची संख्या वाढवली जाणार आहे. मंगळुरू सेंट्रल-तिरुवनंतपुरम सेंट्रल, सिकंदराबाद-तिरुपती आणि चेन्नई एग्मोर-तिरुनेलवेली या तीन वंदे भारत मार्गांची संख्या १६ डब्यांवरून २० केली जाईल. तर सध्या ८ डब्यांच्या गाड्यांसह चालणाऱ्या मदुराई-बेंगळुरू कॅन्ट, देवघर-वाराणसी, हावडा-राउरकेला आणि इंदूर-नागपूर वंदे भारत ट्रेनच्या (Vande Bharat Express Train) डब्ब्यांची संख्या ८ वरून १६ डब्यांपर्यंत वाढवली जाईल. प्रवाशांच्या संख्येनुसार वंदे भारत ट्रेनमधील कोटचा आराखडा तयार केला जात आहे

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : उपोषण सुरु होताच 2 आमदार जरांगेच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?

Manoj Jarange Patil Mumbai Morcha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil Mumbai Morcha । मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी गावातून मुंबईत पोचले आहेत. आझाद मैदानावर जरांगे पाटलांचं उपोषण सुरु असून कोणत्याही परिस्थितीत गुलाल अंगावर घेतल्याशिवाय इथून हलणार नाही, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही अशी गर्जना मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. लाखोंचा समुदाय यावेळी जरांगे पाटील यांच्या सोबत असून संपूर्ण मुंबईत मराठ्यांचं वादळ बघायला मिळत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून सुद्धा पाठिंबा मिळताना दिसतोय. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करताच दोन आमदार त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेत.

जे दोन आमदार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर गेले आहेत ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.. एक आहे शरद पवार गटाचा तर दुसरा आहे अजित पवार गटाचा… शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर तर अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे मनोज जरांगे पाटलांच्या स्टेजवर दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात या आमदारांनी आधीच जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा दिला आहे. संदीप क्षीरसागर यांनी जरांगे यांचं आंतरवली सराटी मधून निघाल्यानंतरच स्वागत केलं होते, तर प्रकाश सोळंके यांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली. तिघांमध्ये आरक्षणाच्या दृष्टीने खलबते झाली.

मनोज जरांगे हे सर्व समाजासोबत आहे. ते जे करत आहेत ते योग्यच आहे. सरकारने ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. विरोधीपक्षाचा आमदार म्हणून आम्ही निवेदन देणार आहोत. मनोजदादा जे आवाहन करतील आम्ही तसे करू. मनोजदादा ओबीसींवर अन्याय झाला तरीही रस्त्यावर उतरतात. महादेव मुंडे यांच्यासाठी सुध्दा ते मैदानात उतरले होते. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेला आपला जाहीर पाठिंबा असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी म्हंटल. (Manoj Jarange Patil Mumbai Morcha)

कोणकोणत्या नेत्यांचा जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा –

ओमराजे निंबाळकर – खासदार, धाराशिव लोकसभा
कैलास पाटील – आमदार, धाराशिव-कळंब विधानसभा
संजय ऊर्फ बंडू जाधव – खासदार, परभणी लोकसभा
उत्तमराव जानकर, आमदार माळशिरस विधानसभा
बजरंग सोनवणे खासदार, बीड लोकसभा
नारायण आबा पाटील, आमदार करमाळा विधानसभा
संदीप क्षीरसागर आमदार, बीड विधानसभा
राजेश विटेकर – आमदार पाथरी विधानसभा
विजयसिंह पंडित – आमदार, गेवराई विधानसभा
प्रकाश सोळंके – आमदार, माजलगाव विधानसभा
राजू नवघरे – आमदार- वसमत विधानसभा
डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आमदार सांगोला विधानसभा

जरांगे पाटील यांच्या मागण्या काय ? Manoj Jarange Patil Mumbai Morcha

1) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
2) मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे
3) हैदराबाद गझेटियर लागू करा…तसेच सातारा, मुंबई गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
४) सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या पोट जात म्हणून घ्या.
५) मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी
६) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.