Monday, December 8, 2025
Home Blog Page 26

Trump Tariff On India : ट्रम्प टॅरिफचा भारताला दणका!! कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार?

Trump Tariff On India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Trump Tariff On India । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगात सध्या टॅरिफ युद्ध चालू केले आहे. जगभरातील अनेक देशांमधील वस्तूंना मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या संकटात आल्या आहेत. नुकतंच त्यांनी भारताला 25% टॅरिफ अतिरिक्त कर लावून पुन्हा दणका दिला आहे.अमेरिकेने हा निर्णय घेताना म्हटलं आहे की, भारताने रशियन तेलाची सतत खरेदी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून याआधी अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावला होता. त्यामुळे आता अमेरिकेचा एकूण कर 50 % झाला आहे. भारतासाठी हो मोठी चिंतेची बाब आहे. ट्रम्प यांच्या या दणक्यामुळे भारतातील कृषी क्षेत्राला आणि जनेरिक औषध क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. आता ऑर्गेनिक केमिकल्सवर ५४% पर्यंत, कार्पेटवर ५२.९%, विणलेल्या कपड्यांवर ६३.९%, दागिने आणि हिऱ्यांवर ५२.१% आणि यंत्रसामग्रीवर ५१.३% शुल्क आकारलं जाईल.

कृषी क्षेत्रातील व्यापाराला सर्वाधिक फटका – Trump Tariff On India

आपला भारत हा देश कृषिप्रधान देश आहे. भारतातून अमेरिकेला प्रामुख्याने साखर, प्रक्रिया केलेलं खाद्य, तूप, बटर, दूध पावडर तांदूळ, कोळंबी, मध, वनस्पती अर्क, एरंडेल तेल आणि काळी मिरी या वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात होते. कृषी क्षेत्रातील वस्तू पुरवठा करणारा अमेरिकेचा मोठा निर्यातदार म्हणून भारत ओळखला जातो. त्यामुळे भारताच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा होत आला आहे.पण आता अमेरिकेने टॅरिफ लावल्याने (Trump Tariff On India) भारताला याचा जबर फटका बसणार आहे. याशिवाय, भारत हा अमेरिकेत 2.58 अब्ज डॉलर किमतीचं समुद्री खाद्य पाठवतो. टॅरिफमुळे त्याची निर्यात कमी झाली तर भारतात या गोष्टी स्वस्त दरात उपलब्ध होतील. त्यामुळे या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांचं आर्थिक उत्पन्न कमी होईल. मोठ्या प्रमाणात रोजगारावर परिणाम या निर्णयाने होणार आहे.

कोळंबीच्याही किमतीवर परिणाम होणार

भारत जगातला आठवा मोठा कृषी उत्पादनं निर्यात करणारा देश आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिवच्या म्हणण्यानुसार भारत अमेरिकेतून आलेल्या कृषी उत्पादनांवर सरकारी 37.7 टक्के टॅरिफ लावतो.

कापड उधोग अडचणीत येणार

भारतातून अमेरिकत मोठ्या प्रमाणत कापडांची निर्यात होते. भारत हा कापडाच्या बाबतीत अमेरिकेचा तिसरा मोठा निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो. अमेरिकेत दरवर्षी 4.93 अब्ज डॉलर्स किमतीचे कपडे आयात केले जातात. त्यामुळे या व्यापारालाही टॅरिफचा तडाखा (Trump Tariff On India) बसणार आहे.देशात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादित केला जातो.जर भारतातील कापड उधोगावर संकट आल तर त्याचा थेट परिणाम हा देशातील शेतकऱ्यावर होईल. कापसाच्या बाजारातील भाव पडतील अशी भीती या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

टॅरिफचे अमेरिकेवर काय परिणाम होणार?

टॅरिफमुळे अमेरिकेचा मोठा फायदा होत असल्याचा बोलले जात आहे. अमेरिकेच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल आणि स्थानिकांच्या नोकऱ्या वाचतील. तसेच, कर महसूल आणि आर्थिक वाढही होईल असे बोलले जात आहे. टॅरिफमुळे विदेशी कंपन्या अमेरिकेमध्ये उत्पादन सुरू करतील आणि त्यामुळे अमेरिकन सरकारचं उत्पन्न वाढेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी असे धोरण का राबवत आहेत?

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या आर्थिक राष्ट्रवाद म्हणजेच अमेरिका फर्स्ट धोरणाचा भाग असून, यामुळं अमेरिकेत देशांतर्गत उद्योगाला फायदा मिळू शकतो. मात्र, हा जागतिक व्यापार आणि पर्यावरण संतुलनासाठी धोक्याचं संकेत ठरु शकतात.

Tymal Mills On Porn Site : मुंबईच्या माजी खेळाडूची पॉर्न साइटवर एंट्री; क्रिकेटविश्वात खळबळ!!

Tymal Mills On Porn Site

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Tymal Mills On Porn Site। इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आणि इंडियन प्रीमिअर लीग (IPL) मध्ये एकेकाळी मुंबई इंडियसचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू टायमल मिल्स याने अडल्ट साइटवर एंट्री केली आहे. टायमल मिल्सने एका पॉर्न साईटवर त्याचे अकाउंट तयार केले आहे, त्यामुळे क्रिकेट विश्वास मोठी खळबळ उडाली आहे. टायटल मिल्स पॉर्नस्टार होतोय कि काय अशा चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये सुरु झाल्या, पण जेव्हा या विषयाच्या खोलात गेलं असता एक वेगळंच सत्य समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण? Tymal Mills On Porn Site

टायमल मिल्सने ‘Only Fans’या अडल्ट साईटवर त्याच अकाउंट उघडलं आहे. याबाबत टायटल मिल्सने स्वतः सांगितले की त्याला या साईटबद्दल लोक काय विचार करतात हे माहित आहे, परंतु त्याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. या अकाउंटवर कोणतेही अश्लील फोटो किंवा ग्लॅमर फोटो मी शेअर करणार नाही, तर त्याचा क्रिकेट प्रवास आणि वैयक्तिक जीवनातील अनुभव आपण या साईटवर (Tymal Mills On Porn Site) शेअर करेन असं टायमल मिल्सने म्हंटल आहे. चाहत्यांशी जोडण्याचा हा एक नवीन मार्ग आहे, मी या साईटच्या माध्यमातून चाहत्यांशी थेट संवाद साधणार आहे. मी या प्लॅटफॉर्मचा वापर एक माध्यम म्हणून करू शकतो असं टायमल मिल्सने स्पष्ट केलं. खरं तर, जेव्हा टायमल मिल्सने एसेक्ससाठी खेळायला सुरुवात केली तेव्हा तो क्रीडा पत्रकारितेचाही अभ्यास करत होता.

IPL मध्ये 2 संघाचा भाग –

डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला टायमल मिल्स हा स्लोवर बॉल आणि डेथ ओव्हर साठी स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. गरजेच्या वेळी तो बॅटिंग सुद्धा करू शकतो. मिल्सने इंग्लंडसाठी १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत. टायमल मिल्स आयपीएल मध्ये सुद्धा २ संघाचा भाग बनला आहे. त्याने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू या २ संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. २०१७ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला १२ कोटी रुपयांना खरेदी केले. त्यावेळी त्याने ५ सामन्यात ५ बळी घेतले. त्यानंतर ५ वर्षांनी २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने टायमल मिल्सला १.५ कोटी रुपयांत संघात सामील करून घेतलं, मात्र तिथेही त्याला आपल्या कामगिरीत छाप पाडता आली नाही. ५ सामन्यांमध्ये तो फक्त ६ विकेट्स घेऊ शकला.

Nagpur Pune Vande Bharat Express : नागपूर- पुणे वंदे भारतचे वेळापत्रक जाहीर!! कुठे- कुठे थांबणार?

Nagpur Pune Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nagpur Pune Vande Bharat Express । नागपूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून येत्या १० ऑगस्ट पासून नागपूर- पुणे मार्गावरून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. हि ट्रेन आठवड्यातून ३ वेळा धावेल. तिचा सुरुवातीचा स्टॉप अजनी रेल्वे स्थानक असेल आणि शेवटचा थांबा पुण्यातील हडपसर स्टेशन असेल. या नव्या वंदे भारत एक्सप्रेस मुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी आणखी वाढण्यास मदत होईल. तसेच व्यापार आणि पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल.

कस असेल वेळापत्रक ? Nagpur Pune Vande Bharat Express

पुणे रेल्वे स्थानकात सध्या अधिक गाड्या सामावून घेणे शक्य नसल्याने नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी (Nagpur Pune Vande Bharat Express) हडपसरला तात्पुरते टर्मिनस बनवलं आहे. ट्रेन क्रमांक २६१०२ अजनी (नागपूर)- पुणे वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ९:५० वाजता अजनीहून निघेल आणि त्याच रात्री ९:५० वाजता पुण्यात पोहोचेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे-अजनी (नागपूर) पुण्याहून सकाळी ६:२५ वाजता निघेल आणि संध्याकाळी ६:२५ वाजता अजनीला पोहोचेल. ही ट्रेन आठवड्यातील सहा दिवस धावेल… दर सोमवारी अजनीहून आणि मंगळवारी पुण्याहून…..

यापूर्वी पुण्याहून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला ये जा करण्यासाठी तब्बल १३-१४ तास लागायचे. मात्र आता वंदे भारत ट्रेनमुळे (Nagpur Pune Vande Bharat Express) हाच प्रवास १२ तासांवर आला आहे. म्हणजेच प्रवाशांचा वेळ २ तासांनी वाचणार आहे. सुरुवातीला हि स्लिपर ट्रेन नसेल, त्यामुळे प्रवाशांना बसून प्रवास करावा लागेल. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांना वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड या रेल्वे स्थानकावर थांबेल. त्यामुळे इथल्या प्रवाशाना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या स्थानकावर किती वाजता थांबणार ?

अजनी – सकाळी ९.५० वाजता
वर्धा – सकाळी १०.४० वा.
बडनेरा – दुपारी १२.०३ वा.
अकोला – दुपारी १ वाजता
भुसावळ – दुपारी २.५५ वा.
जळगाव – सायंकाळी – ३.२६ वा.
मनमाड – सायंकाळी ५.२५ वा.
कोपरगाव – ६.२० वा.
अहमदनगर – रात्री ७.३५ वा.
दौंड – रात्री ८.४३ वा.
पुणे – रात्री ९.५०

जैन समाजामध्ये कबुतराचं महत्व कसं काय? यामागचं कारण समजून घ्या

dadar kabutar khana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दादर कबूतर खाना परिसर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय. हा कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरुन मोठं राजकारण तापलं आहे. जैन समाज तर पुरता आक्रमक झाला असून संतप्त जमावाने कबुतरखान्यावर झाकलेली ताडपत्री हटवली . यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. मात्र जैन समाज कबुतरखान्यासाठी एवढा आक्रमक का झाला आहे? जैन समाजामध्ये कबुतरांना खायला घालणं एवढं महत्त्वाचं का मानलं जातं? जैन समाजात कबुतरांविषयी इतकी आपुलकी आणि महत्व का आहे? यामागे कोणतं कारण आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जैन धर्मामध्ये कबुतराचे महत्त्व का आहे ?

धार्मिक मान्यतेनुसार, जैन समाजामध्ये सर्व जीवमात्रांप्रती करुणा आणि अहिंसा ही अत्यंत मूलभूत तत्त्वे मानली जातात. जैन संस्कृतीमध्ये मुक्या प्राण्यांना खाऊ घालणं हे पुण्याचे काम मानलं जातं. याच भावनेतून कबुतरांना दाणे खायला दिले जातात. जैन समाज कबुतरांप्रती विशेष प्रेम आणि आपुलकी दर्शवतो यामागेही काही कारणे आहेत.. कारण कबुतरे हे शांत, निरुपद्रवी आणि अहिंसक पक्षी मानले जातात. कबुतर हे मांसाहारी आहे, ते कोणत्याही इतर पक्षाचा जीव घेत नाही, त्यामुळे कबुतरे जैन समाजाला खूप प्रिय असतात. जैन धर्मामध्ये कबुतरांना दाणे टाकणे हे जीव दया म्हणजेच करुणेचं प्रतीक मानलं जातं.तसेच जैन धर्मीय लोक आपले धार्मिक कर्तव्य समजतात. जैन धर्मात जीव दयेच्या परंपरेला धार्मिक कर्तव्य मानलं जातं.

तसेच जैन धर्मात पूर्वजांच्या आत्म्याला तृप्ति आणि पितृ-दोषातून मुक्तीसाठीही पक्षांना खायला टाकतात अशीही समाजात भावना आहे. विशेष म्हणजे कबुतराला अमावस्येच्या दिवशी दाणे टाकणं शुभ आणि फलदायक मानलं जातं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अमावस्येच्या दिवशी कबुतराला दाणे टाकतात. अध्यात्मिक दृष्टीकोन विचार केला तर कबुतरांना अध्यात्मिक संदेशवाहक मानलं जातं. त्यामुळेच कबुतरांना जास्त महत्त्व आहे. मुंबई शहरात काही जैन मंदिरांकडून आणि ट्रस्टच्या माध्यमातून ‘कबुतरखाने’ चालवले जातात. म्हणूनच दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय म्हणजे धार्मिक विश्वासांवर हल्ला असल्याचं मानत त्याला विरोध करत आहेत.

दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय का घेतला गेला?

बॉम्बे उच्च न्यायालयाच्या 31 जुलै 2025 च्या आदेशानुसार, कबुतरखान्यांमधील कबुतरांना खायला घालण्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका आणि वारसा स्थळांचे नुकसान होत असल्याने, मुंबई महानगर पालिकेला कबुतरखाने बंद करण्याचे आणि दाणे टाकण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता सरकारने हा निर्णय फिरवला आहे. जैन समाजाच्या धार्मिक भावना आणि लोकांचे आरोग्य यांची सांगड घालावी लागेल, यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे. कबुतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.

Western Railways : फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा दणका!! 71.68 कोटी वसूल केले

Western Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Western Railways । रेल्वेने प्रवास करत असताना तिकीट न काढणारे आणि फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त असते. पैसे वाचवण्यासाठी अनेकजण विनातिकीट प्रवास करतात. मात्र आता याच फुकट्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेने दणका दिला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी अशा प्रवाशांकडून तब्बल 71.68 कोटी रुपये वसूल केले आहेत. लोकल गाड्या आणि रेल्वे स्थानकांमधील सखोल तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान हि कारवाई करण्यात आली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या काळात तिकीट तपासणी मोहिमा– Western Railways

पश्चिम रेल्वेच्या (Western Railways) वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या काळात अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या, या तिकीट मोहिमेच्या माध्यमातून तब्बल ७१.६८ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ज्यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातून वसूल केलेल्या १८.४० कोटी रुपयांचाही समावेश आहे. खरं तर विना तिकीट प्रवासामुळे तिकीट काढणाऱ्या प्रवासांना त्रास होत आहे. विशेष म्हणजे मेल/ एक्सप्रेस गाड्या तसेच प्रवासी गाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमधील प्रवाशांची रेल्वे प्रशासनाला विनातिकीट प्रवाशांबाबत तक्रार केली होती. रेल्वे प्रसासनाने याची दखल घेऊन विनातिकीट प्रवास करणाऱ्या बाबत हि मोहीम हाती घेतली होती.

याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रकाशित केलेल्या प्रसिद्धी पत्रात सांगितले आहे कि ऑगस्ट २०२३ मध्ये १.८३ लाख विना तिकीट प्रवाशांकडून १०.४२ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून, ज्यामध्ये बुक न केलेल्या सामानाच्या केसेसचा देखील समावेश आहे. तसेच, ऑगस्ट महिन्यात, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात ५९,००० हून अधिक विनातिकीट प्रवासांकडून २.५८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. ठाकूर पुढे म्हणाले, मुंबईतील एसी लोकल गाड्यांमध्ये विना तिकीट प्रवासांना रोखण्यासाठी वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जातात. या मोहिमांमुळे एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत जवळजवळ ३३,००० हजार विनातिकीट प्रवाशांना दंड करण्यात आला आहे आणि त्यांच्याकडून १०९.१७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १७४ टक्क्यांहून जास्त आहे.

Mumbai Local Mega Block : वाशी- पनवेल लोकल ‘या’ तारखेपर्यंत बंद!! रेल्वेचा मोठा निर्णय

Mumbai Local Mega Block

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Mega Block । मुंबईकरांनो, हार्बर रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून हार्बर रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक वाशी स्थानकात घेण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे कामामुळं ब्लॉक घेण्यात आला असल्याचे रेल्वे विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार आहे.

बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन रात्रीसाठी रात्री १०.४५ ते पहाटे ३.४५ पर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकनिमित्त अनेक लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या कालावधीत वाशी ते पनवेलदरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच या ब्लॉकदरम्यान काही लोकल सेवा ठरावीक स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. बेलापूरहून रात्री 8.54 वाजता सुटणारी बेलापूर-सीएसएमटी लोकल वाशीपर्यंतच धावेल, तर रात्री 9.16ची बेलापूर-सीएसएमटी लोकल वडाळा रोडपर्यंतच धावणार आहे. वांद्रे-सीएसएमटी लोकल रात्री 10 वाजता सुरू होऊन वडाळा रोडवरच थांबवण्यात येणार आहे. पनवेलहून रात्री 10.55 आणि 11.32 वाजता सुटणाऱ्या पनवेल- वाशी लोकल सेवा नेरूळपर्यंतच धावतील.

हार्बर रेल्वे ब्लॉकमुळे कोणत्या लोकल सेवामध्ये बदल होणार- Mumbai Local Mega Block

  • वाशी ते पनवेल: या दरम्यान सर्व लोकल सेवा पूर्णपणे बंद राहील.
  • बेलापूर-सीएसएमटी: रात्री 8:54 वाजता सुटणारी लोकल वाशीपर्यंतच धावेल. नंतरची रात्री 9:16 वाजता सुटणारी लोकल वडाळा रोडपर्यंत धावेल.
  • वांद्रे-सीएसएमटी: रात्री 10:00 वाजता सुटणारी लोकल वडाळा रोडवर थांबवली जाईल.
  • पनवेल-वाशी: रात्री 10:50 आणि 11:32 वाजता सुटणाऱ्या लोकल नेरूळपर्यंतच धावेल. .
  • वाशीहून सुटणाऱ्या अप लोकल रेल्वे हि : 5 आणि 6 ऑगस्ट रोजी पहाटे 4:03, 4:15, 4:25, 4:37, 4:50 आणि 5:04 वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील.
  • 7 आणि 8 ऑगस्ट रोजी फक्त पहाटे 4:03 आणि 4:25 वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द होईल.
  • सीएसएमटीहून वाशीकडे जाणाऱ्या डाउन लोकल रेल्वे हि रात्री 9:50, 10:14 आणि 10:30 वाजता सुटणाऱ्या लोकल सर्व चार रात्री ह्या रद्द केल्या आहेत.

प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊनच घराबाहेर पडावं आणि प्रवास करावा… शक्यतो मेगाब्लॉकच्या काळात प्रवास करणे टाळावे… कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Repo Rate RBI : रेपो रेट बाबत RBI चा मोठा निर्णय!! तुमचा EMI वाढणार की कमी होणार?

Repo Rate RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Repo Rate RBI । रेपो रेट बाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. झर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीने रेपो रेट मध्ये कोणताही बदल केलेला नाही. आधीप्रमाणेच तो ५.५० टक्के इतका असणार आहे. त्यामुळे तुमच्या EMI वर कोणताही परिणाम होणार आहे. सध्या जो EMI तुम्ही भरत आहात तो तसाच कायम असणार आहे. यापूर्वी आरबीआयने सलग ३ वेळा रेपो दर कमी केला होता, मात्र यावेळी मात्र रेपो रेट मध्ये कोणतीही कपात न करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.

गृहकर्ज आणि वाहन कर्जधारकांच्यादृष्टीने रेपो रेट (Repo Rate RBI ) महत्वाचा असतो. त्यामुळे अनेकांचं लक्ष्य या रेपो रेट कडे असते. आरबीआयने यापूर्वी फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये रेपो रेट मध्ये कपात केली होती. जून महिन्यात तर तब्बल रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५० टक्के करण्यात आला होता. आताही रेपो रेट आणखी कमी होईल असा अंदाजज बांधला जात होता. मात्र आरबीआयने रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. अलीकडच्या काळातील महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले.

जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 टक्के- Repo Rate RBI

संजय मल्होत्रा यांनी म्हंटल कि, ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) इन्फ्लेशन (किरकोळ महागाई) २०२६ च्या आर्थिक वर्षात ३.१% इतकी राहील तर किरकोळ महागाई आर्थिक वर्ष २७ साठी ४.९% असा अंदाज आहे. तसेच आर्थिक वर्ष 2026 मध्ये जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 टक्के ठेवण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीसाठी तो 6.5 टक्के ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या तिमाहीसाठी तो 6.7 टक्के, तिसऱ्या तिमाहीसाठी 6.6 टक्के आणि चौथ्या तिमाहीसाठी 6.3 टक्के ठेवण्यात आला आहे.

Bachhu Kadu Meet Raj Thackeray : बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट!! टाकला मोठा प्रस्ताव

Bachhu Kadu Meet Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bachhu Kadu Meet Raj Thackeray । प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन बच्चू कडू यांनी हि भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरेंना यवतमाळमध्ये होणाऱ्या यात्रेला येण्याचे आवाहन केले. तसेच आम्ही अनेकदा मुंबई बंद झाल्याचे बघितलं, परंतु एकदा शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद व्हावी असं बच्चू कडू यांनी म्हंटल. या भेटीवेळी बाळा नांदगावकर यांच्यासह इतर नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे सोबत आली तर नक्कीच बळ मिळेल- Bachhu Kadu Meet Raj Thackeray

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर (Bachhu Kadu Meet Raj Thackeray) बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. त्यांनी म्हंटल कि, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच आज राज ठाकरेंची भेट घेतली. मराठवाड्यात जी आमची शेतकऱ्यांसाठी यात्रा निघणार आहे त्या यात्रेला राज ठाकरेंनी यावं आणि शेतकरी म्हणून संभोधित करावं. तसेच मुंबई अनेकदा आम्ही बंद होताना बघितलं, आता शेतकऱ्यांसाठी ती एक दिवस बंद व्हायला पाहिजे. किमान अर्धा तास, एक तास मुंबई शेतकऱ्यांच्या पाठीशी अभीर राहावी असं बच्चू कडू यांनी म्हंटल. शेतकरी हा कोणत्या एका पक्षाचा विषय नाही.. कोणत्याही एका जाती-धर्माचा नाही… त्यामुळे मनसे आमच्या सोबत आली तर नक्कीच शेतकऱ्याला बळ मिळेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, सरकार जे शेतकऱ्यांची टिंगल करत आहे ते काय योग्य नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात की दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करु. त्यामुळे आता दुष्काळ पडण्याची वाटच पाहिली जात आहे का, असा प्रश्न आता पडला आहे. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला भाव दिला जात नाही, भाव भेटत नसल्याने शेतकरी मरत आहे हे दुष्काळापेक्षा भयंकर असल्याचे बच्चू कडू म्हणाले

Municipal Elections Date : महापालिका निवडणुका कधी होणार? आयुक्तांनी दिली मोठी बातमी

Municipal Elections Date

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Municipal Elections Date । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत मागच्या काही दिवसापासून चर्चा सुरु आहेत. जवळपास सर्वच महापालिकेत मागच्या २०३ वर्षांपासून प्रशासक असल्याने अनेक कामे मार्गी लावण्यात अडथळे येत आहेत. अशावेळी सर्वच राजकीय पक्ष निवडणूका कधी जाहीर होणार याकडे डोळे लावून बसले होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत.

आज राज्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आढावा बैठक पार पडली. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीविषयी माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मनपा, जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुका टप्पाटप्प्याने होणार आहेत असं दिनेश वाघमारे यांनी म्हंटल. कारण सर्व निवडणुका एकत्रित करण्यासाठी तेवढं मनुष्यबळ राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. पण तरीही पहिली कोणती निवडणूक घेतली जाईल ते अद्याप निश्चित नाही, अशी महिती दिनेश वाघमारे यांनी दिली.

आरक्षण कस असेल- Municipal Elections Date

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत माहिती देताना दिनेश वाघमारे म्हणाले की, SC-ST आरक्षण निश्चित असते, परंतु OBC आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार आहे ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमचे काम थोडे सोपे झाले आहे असं त्यांनी म्हंटल. तसेच या निवडणुकांमध्ये VV-PAT यंत्रे वापरण्यात येणार नाहीत, कारण एकापेक्षा जास्त प्रभाग पद्धत असते. त्यामुळे एका पेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतात. तसेच त्यांची मतमोजणी करायची असते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या निवडणुकीत होणार नाही असं वाघमारे यांनी स्पष्ट केलं .

Uttarkashi Cloudburst : उत्तरकाशीत ढगफुटी!! गंगेचं रौद्ररूप, घरे उध्वस्त; Video पाहून अंग कापेल

Uttarkashi Cloudburst

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Uttarkashi Cloudburst । उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाली. धाराली भागात ढगफुटीची घटना घडली. यामुळे खिरगंगा नदीला मोठा महापूर आला. या पुरात अनेक घरे वाहून गेली.. उध्वस्त झाली.. याबाबतचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. नदीने रौद्ररूप पाहून तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० ते १२ कामगार गाडले गेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

60 जण बेपत्ता असल्याचा दावा – Uttarkashi Cloudburst

धराली गावाला लागून असलेल्या नदीतून पाण्याचा प्रचंड लोंढा मातीच्या मलब्यासह गावात घुसला. बघता बघता सगळं वाहून गेलं .. अवघ्या २० ते ३० सेकंदात होत्याच नव्हतं झालं आणि लोकांची घरे अक्षरशः वाहून गेली… या महापुरात 60 जण बेपत्ता असल्याचा दावा करण्यात येत आहे तर 12 लोक मलब्या खाली गाडल्या गेल्याची भीती आहे. तरलोकांच्या किंचाळ्या आणि वेदना व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने या नैसर्गिक संकटाची पुष्टी केली आहे. तातडीने याठिकाणी मदत आणि पुनर्वसनची टीम दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. पुरामुळे धाराली बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले आहे. आजूबाजूला फक्त कचरा दिसत आहे. लोक आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. खीर गंगेच्या काठावर असलेले प्राचीन कल्प केदार मंदिरही ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे वृत्त आहे.

या महापुराच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, उत्तराखंडमधील धाराली भागात ढगफुटीची घटना (Uttarkashi Cloudburst) घडली आहे, जिथे पाण्याची पातळी वाढल्याने मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासन, भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांच्या पथके बचाव आणि मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहेत. आम्ही लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. बाधितांना सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.