Wednesday, December 10, 2025
Home Blog Page 27

Vande Bharat Halt At Shegaon : शेगावला थांबणार ‘ही’ वंदे भारत एक्सप्रेस; प्रवाशांना मोठा फायदा

Vande Bharat Halt At Shegaon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Vande Bharat Halt At Shegaon । नागपूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेसला आता शेगाव मध्येही थांबा मिळणार आहे. रेल्वे विभागाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. खरं बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शेगावला थांबा मिळण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या मागणीला यश आलं असून शेगावकरांना मोठा फायदा होणार आहे. तसेच गजानन महाराजांच्या मठाला भेट देणाऱ्या भक्तांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे.

विदर्भाची पंढरी म्हणजे शेगाव- Vande Bharat Halt At Shegaon

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील कनेक्टिव्हिटी आणखी वाढवण्यासाठी रेल्वे विभाग येत्या १० ऑगस्ट पासून नागपूर पुणे वंदे भारत ट्रेन चालवणार आहे. २ दिवसापूर्वी या वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक आणि संभाव्य थांब्याची यादीही समोर आली होती. त्यामध्ये अजनी, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड या स्थानकांचा समावेश होता. मात्र शेगावचं नाव यामध्ये नव्हते. यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती आणि शेगावला या नागपूर – पुणे वंदे भारतचा थांबा मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या मागणीला यश आलं. दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर रेल्वे विभागाने एक परिपत्रक जारी करत शेगावला थांबा (Vande Bharat Halt At Shegaon) मिळाल्याचे जाहीर केलं. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रसिद्ध संत गजानन महाराज संस्थानला जाणाऱ्या भक्तांचे काम सोप्प झालं आहे. देशभरातून भाविक विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे येतात.

कस असेल ट्रेनचं वेळापत्रक –

ट्रेन क्रमांक २६१०२ अजनी (नागपूर)- पुणे वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ९:५० वाजता अजनीहून निघेल आणि त्याच रात्री ९:५० वाजता पुण्यात पोहोचेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे-अजनी (नागपूर) पुण्याहून सकाळी ६:२५ वाजता निघेल आणि संध्याकाळी ६:२५ वाजता अजनीला पोहोचेल. ही ट्रेन आठवड्यातील सहा दिवस धावेल… दर सोमवारी अजनीहून आणि मंगळवारी पुण्याहून…..

यापूर्वी पुण्याहून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला ये जा करण्यासाठी तब्बल १३-१४ तास लागायचे. मात्र आता वंदे भारत ट्रेनमुळे (Nagpur Pune Vande Bharat Express) हाच प्रवास १२ तासांवर आला आहे. म्हणजेच प्रवाशांचा वेळ २ तासांनी वाचणार आहे. सुरुवातीला हि स्लिपर ट्रेन नसेल, त्यामुळे प्रवाशांना बसून प्रवास करावा लागेल.

Ganeshotsav 2025 : 26 ऑगस्ट कि 27 ? गणरायाचे आगमन कधी? पहा शुभ मुहूर्त

Ganeshotsav 2025 Shubh Muhurt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav 2025 । हिंदू धर्मात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाचे साजरा केला जातो. दरवर्षी गणरायाच्या स्वागतासाठी भक्त आतुरटनेते वाट बघत असतात. यंदा २७ ऑगस्टला गणेशोत्सव असून सर्वांच्याच घरी गणरायाच्या आगमनाची लगबग आहे. गणपतीच्या स्वागतासाठी घरात वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक अशी सजावट केली जात आहे. गणपतीसाठी खास पदार्थ बनवले जात आहेत. 10 दिवस गणरायाची मनोभावे पूजा केली जाते. दहा दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाने संपतो. परंतु यंदा गणेशोत्सव २६ ऑगस्टला आहे कि २७ ऑगस्टला यावरून भक्त गोंधळले आहेत. आज आम्ही तुम्हाला यंदाच्या गणेशोत्सवाची तारीख आणि खास मुहूर्त याबाबत तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

कधी आहे शुभ मुहूर्त- Ganeshotsav 2025

तर मित्रानो, धार्मिक मान्यतेनुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला भगवान श्री गणेशाचा जन्म झाला होता. म्हणून, ही तारीख भगवान गणेशाला समर्पित मानली जाते. यंदाची चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट दुपारी 01:54 वाजेपासून 27 ऑगस्टला दुपारी 03:44 वाजेपर्यंत आहे. तुम्ही २७ ऑगस्टला सकाळी ११:१२ ते दुपारी १:४४ या दरम्यान गणरायाची प्राणप्रतिष्ठा करू शकता. म्हणजेच काय तर यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होईल आणि ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालेल.

दरम्यान, गणरायाच्या आगमनावेळी भक्त गणपती बाप्पा मोरया !! मंगलमूर्ती मोरया या जयघोषात गणपती बाप्पाचे स्वागत करतात. त्याची आकर्षक अशी आराम केली जाते. गणरायाला फुले अर्पण केली जातात. आरासाला लायटिंग केली जाते. गणेशोत्सवाच्या ११ दिवसांच्या काळात (Ganeshotsav 2025) सकासकाळी लवकर उठून अंघोळ करून गणपतीची आरती केली जाते. धार्मिक स्तोत्रे गायली जातात. गणरायाला दुर्वा वाहिल्या जातात. त्याच्यासाठी खास असे नवनवीन गोड़ पदार्थ बनवले जातात.

3 New Municipalities In Pune : पुण्यात 3 नव्या महापालिका होणार!! अजित पवारांची मोठी घोषणा

3 New Municipalities In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन 3 New Municipalities In Pune । उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यात हिंजवडी, चाकण आणि उरुळी देवाची – फुरसुंगी – मांजरी अशा ३ नव्या महापालिका होणार आहे अशी माहिती अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली. आज सकासकाळी अजित पवारांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. या पाहणीवेळी त्यांनी नव्या महापालिका निर्मितीबाबत माहिती दिली.

खरं तर मागच्या काही वर्षांपासून पुणेकरांना मोठ्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हिंजवडी, चाकण हे आयटी आणि ऑटो हब तर या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत. येथील अनधिकृत बांधकामे, वाहतुकीचा उडालेला बोजवारा यासाठी तेथील ग्राम पंचायती एवढ्या सक्षम नाहीत. यामुळे पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार असल्याची माहिती (3 New Municipalities In Pune) अजित पवार यांनी केली आहे. चाकण एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहने ये-जा करतात. त्यांची कोंडी फोडावी लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

कोणाला आवडो किंवा न आवडो, पण मी हे करणारच- 3 New Municipalities In Pune

अजित पवार म्हणाले, आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे. त्यासाठीही मी निधी सुद्धा देतोय. त्यानंतर आपण पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग बनवू. तसेच आपल्याला पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या (3 New Municipalities In Pune) लागणार आहेत. एक म्हणजे चाकण, दुसरी हिंजवडी येथे आणि तिसरी महापालिका , मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात करावी लागणार आहे. कोणाला आवडो किंवा न आवडो, पण मी हे करणारच आहे असं अजित पवार यांनी म्हंटल.

SBI Recruitment 2025 : SBI मध्ये 6589 पदांसाठी मेगाभरती!! असा करा अर्ज

SBI Recruitment 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन SBI Recruitment 2025 । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये तब्बल 6589 हजार पदासाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. ज्युनियर असोसिएट क्लार्क पदासाठी हि भरती असेल. या जॉबसाठी इच्छुक उमेदवारांना बँकेच्या अधिकृत sbi.co.in या वेबसाईडवरून अर्ज करावा लागेल.परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 26 ऑगस्ट आहे.त्यामुळे उमेदवारांनी वेळेवरती अर्ज करावा लागेल. एसबीआय मधील या भरतीसाठी पात्रता काय आहे? निवड प्रक्रिया कशी असेल याबाबत आज आपण जाणून घेऊयात.

एकूण पदे – 6589

पदाचे नाव – ज्युनियर असोसिएट क्लार्क

वयोमर्यादा

या पदांसाठी २० ते २८ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराची जन्मतारीख २ एप्रिल १९९७ ते १ एप्रिल २००५ दरम्यान असावी. तथापि, नियमांनुसार, काही राखीव श्रेणीतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट आहे. SBI Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता –

सदर उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराची प्राथमिक परीक्षा आणि अंतिम परीक्षा ही घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रांच्या तपासणीनंतर उमेदवारांनी निवड ही केली जाईल.

निवड प्रक्रिया –

निवड प्रक्रिया पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यात पार पडली. पूर्व परीक्षा 100 गुणांची असेल. इंग्रजी भाषा, गणितीय क्षमता आणि तार्किक क्षमता यावर प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा एक तासाची असेल. मुख्य परीक्षा 200 गुणांची असेल. तर, या परीक्षेत 190 प्रश्न असतील. वित्तीय जागरुकता, जनरल इंग्रजी,क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड, रिझनिंग एबिलिटी यावर प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा 2 तास 40 मिनिटांची असेल. स्थानिक भाषा चाचणी परीक्षा 50 गुणांची असेल.

अर्ज कसा करावा ? SBI Recruitment 2025

उमेदवारांनी बँकेच्या या sbi.co.in जाऊन अर्ज व्यवस्थित भरावा. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीचा अर्ज व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मगच अर्ज करावा. एकदा अर्ज केल्यास परत अर्जाची रक्कम मिळणार नाही.त्यामुळे अर्ज भरताना माहिती हि व्यवस्थित भरावी.

Donald Trump Property In India : मुंबई पुण्यात डोनाल्ड ट्रम्पची प्रचंड संपत्ती; किंमत जाणून थक्क व्हाल

Donald Trump Property In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Donald Trump Property In India । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरु केले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाने अनेक देशाची चांगलीच पंचाईत झाली आहे. टॅरिफ वॉरचा फटका भारताला देखील बसला आहे. भारतावर तब्बल ५० टक्के आयात शुल्क लावत ट्रम्प यांनी भारतीयांचा रोष अंगावर घेतला आहे.
मीच कसा शहाणा हे देखील दाखवण्याचा प्रयत्न ट्रम्प करताना दिसत आहेत. एका बाजूला भारतीय अर्थव्यवस्था मृत म्हणणारे, भारताला सतत धमक्या देणारे आणि भारतीयांचा राग अंगावर घेणाऱ्या याच ट्रम्प यांची भारतात प्रचंड संपत्ती आहे. याचाच अर्थ एकीकडे भारताला नावे ठेवायची आणि बाजूला भारतात पसरलेल्या उद्योगातून कोट्यवधींची कमाई करायची अशी दुपट्टी भूमिका ट्रम्प घेत असल्याचे दिसत आहे.

भारतात सर्वात आधी पुण्यामध्ये ट्रम्प यांनी बांधकाम क्षेत्रात गुतंवणूक केली .२०१२ साली पुण्यातील पंचशील रिअल्टी या कंपनीसोबत व्यावसायिक भागीदारीतून ट्रम्प टॉवरची उभारणी केली. २३ मजली २ टॉवर असलेले ट्रम्प टॉवर हे २०१५ मध्ये हे तयार झाले. या प्रकल्पाचा खर्च अदाजे ३०० कोटी रूपये इतका आहे. तर, मुंबई वरळीमध्ये, लोढा ग्रुप आणि ट्रम्प यांच्या भागीदारीतून २०१३ मध्ये ७६ मजली टॉवरचे काम सुरु झाले आणि २०२१ मध्ये पूर्ण झाले. हा प्रकल्प खर्च ३,००० कोटी रूपये इतका आहे. तर कोलकाता ३८ मजली निवासी टॉवर, ईएम बायपासवर, त्रिबेका, उनिमार्क आणि आरडीबी ग्रुप सोबत भागीदारी करून ट्रम्प टॉवर्स उभा केले आहे. हा प्रकल्प जून २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.प्रकल्पाचा खर्च हा अंदाजे ४०० कोटी रुपये आहे.Donald Trump Property In India

दिल्लीतही ट्रम्प टॉवर- Donald Trump Property In India

देशाच्या राजधानीत सुद्धा ट्रम्प टॉवर्स उभारले गेले आहे. दिल्ली एनसीआर, गुरुग्राम मध्ये त्रिबेका आणि एम३एम ग्रुपने सेक्टर ६५ मध्ये दोन ४७ मजली टॉवर उभा केले जात असून, २०२६ हा प्रकल्प पूर्ण होईल होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प खर्च रु. १,९०० कोटी रूपये इतका आहे. म्हणजेच काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात बांधकाम क्षेत्रातून कोट्यवधी पैसा कमावला आहे.

अगदी अलीकडे नोव्हेंबर २०२४ मध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतामध्ये आपली गुंतवणूक आणखी वाढवली. भारतातील भागिदारी ट्रायबेका डेव्हलपर्ससह गुरुग्राम, पुणे, हैदराबाद, मुंबई, नोएडा आणि बेंगळुरूमध्ये किमान सहा प्रकल्पांची घोषणा केली. तब्बल ८० लाख चौरस फुटांचा रिअल इस्टेट विकास होणार आहे. या प्रकल्पातून ट्रम्प यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे.

Trump Tariff On India : ट्रम्प टॅरिफचा भारताला दणका!! कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार?

Trump Tariff On India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Trump Tariff On India । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगात सध्या टॅरिफ युद्ध चालू केले आहे. जगभरातील अनेक देशांमधील वस्तूंना मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या संकटात आल्या आहेत. नुकतंच त्यांनी भारताला 25% टॅरिफ अतिरिक्त कर लावून पुन्हा दणका दिला आहे.अमेरिकेने हा निर्णय घेताना म्हटलं आहे की, भारताने रशियन तेलाची सतत खरेदी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून याआधी अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावला होता. त्यामुळे आता अमेरिकेचा एकूण कर 50 % झाला आहे. भारतासाठी हो मोठी चिंतेची बाब आहे. ट्रम्प यांच्या या दणक्यामुळे भारतातील कृषी क्षेत्राला आणि जनेरिक औषध क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. आता ऑर्गेनिक केमिकल्सवर ५४% पर्यंत, कार्पेटवर ५२.९%, विणलेल्या कपड्यांवर ६३.९%, दागिने आणि हिऱ्यांवर ५२.१% आणि यंत्रसामग्रीवर ५१.३% शुल्क आकारलं जाईल.

कृषी क्षेत्रातील व्यापाराला सर्वाधिक फटका – Trump Tariff On India

आपला भारत हा देश कृषिप्रधान देश आहे. भारतातून अमेरिकेला प्रामुख्याने साखर, प्रक्रिया केलेलं खाद्य, तूप, बटर, दूध पावडर तांदूळ, कोळंबी, मध, वनस्पती अर्क, एरंडेल तेल आणि काळी मिरी या वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात होते. कृषी क्षेत्रातील वस्तू पुरवठा करणारा अमेरिकेचा मोठा निर्यातदार म्हणून भारत ओळखला जातो. त्यामुळे भारताच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा होत आला आहे.पण आता अमेरिकेने टॅरिफ लावल्याने (Trump Tariff On India) भारताला याचा जबर फटका बसणार आहे. याशिवाय, भारत हा अमेरिकेत 2.58 अब्ज डॉलर किमतीचं समुद्री खाद्य पाठवतो. टॅरिफमुळे त्याची निर्यात कमी झाली तर भारतात या गोष्टी स्वस्त दरात उपलब्ध होतील. त्यामुळे या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांचं आर्थिक उत्पन्न कमी होईल. मोठ्या प्रमाणात रोजगारावर परिणाम या निर्णयाने होणार आहे.

कोळंबीच्याही किमतीवर परिणाम होणार

भारत जगातला आठवा मोठा कृषी उत्पादनं निर्यात करणारा देश आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिवच्या म्हणण्यानुसार भारत अमेरिकेतून आलेल्या कृषी उत्पादनांवर सरकारी 37.7 टक्के टॅरिफ लावतो.

कापड उधोग अडचणीत येणार

भारतातून अमेरिकत मोठ्या प्रमाणत कापडांची निर्यात होते. भारत हा कापडाच्या बाबतीत अमेरिकेचा तिसरा मोठा निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो. अमेरिकेत दरवर्षी 4.93 अब्ज डॉलर्स किमतीचे कपडे आयात केले जातात. त्यामुळे या व्यापारालाही टॅरिफचा तडाखा (Trump Tariff On India) बसणार आहे.देशात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादित केला जातो.जर भारतातील कापड उधोगावर संकट आल तर त्याचा थेट परिणाम हा देशातील शेतकऱ्यावर होईल. कापसाच्या बाजारातील भाव पडतील अशी भीती या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

टॅरिफचे अमेरिकेवर काय परिणाम होणार?

टॅरिफमुळे अमेरिकेचा मोठा फायदा होत असल्याचा बोलले जात आहे. अमेरिकेच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल आणि स्थानिकांच्या नोकऱ्या वाचतील. तसेच, कर महसूल आणि आर्थिक वाढही होईल असे बोलले जात आहे. टॅरिफमुळे विदेशी कंपन्या अमेरिकेमध्ये उत्पादन सुरू करतील आणि त्यामुळे अमेरिकन सरकारचं उत्पन्न वाढेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी असे धोरण का राबवत आहेत?

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या आर्थिक राष्ट्रवाद म्हणजेच अमेरिका फर्स्ट धोरणाचा भाग असून, यामुळं अमेरिकेत देशांतर्गत उद्योगाला फायदा मिळू शकतो. मात्र, हा जागतिक व्यापार आणि पर्यावरण संतुलनासाठी धोक्याचं संकेत ठरु शकतात.

Tymal Mills On Porn Site : मुंबईच्या माजी खेळाडूची पॉर्न साइटवर एंट्री; क्रिकेटविश्वात खळबळ!!

Tymal Mills On Porn Site

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Tymal Mills On Porn Site। इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आणि इंडियन प्रीमिअर लीग (IPL) मध्ये एकेकाळी मुंबई इंडियसचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू टायमल मिल्स याने अडल्ट साइटवर एंट्री केली आहे. टायमल मिल्सने एका पॉर्न साईटवर त्याचे अकाउंट तयार केले आहे, त्यामुळे क्रिकेट विश्वास मोठी खळबळ उडाली आहे. टायटल मिल्स पॉर्नस्टार होतोय कि काय अशा चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये सुरु झाल्या, पण जेव्हा या विषयाच्या खोलात गेलं असता एक वेगळंच सत्य समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण? Tymal Mills On Porn Site

टायमल मिल्सने ‘Only Fans’या अडल्ट साईटवर त्याच अकाउंट उघडलं आहे. याबाबत टायटल मिल्सने स्वतः सांगितले की त्याला या साईटबद्दल लोक काय विचार करतात हे माहित आहे, परंतु त्याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. या अकाउंटवर कोणतेही अश्लील फोटो किंवा ग्लॅमर फोटो मी शेअर करणार नाही, तर त्याचा क्रिकेट प्रवास आणि वैयक्तिक जीवनातील अनुभव आपण या साईटवर (Tymal Mills On Porn Site) शेअर करेन असं टायमल मिल्सने म्हंटल आहे. चाहत्यांशी जोडण्याचा हा एक नवीन मार्ग आहे, मी या साईटच्या माध्यमातून चाहत्यांशी थेट संवाद साधणार आहे. मी या प्लॅटफॉर्मचा वापर एक माध्यम म्हणून करू शकतो असं टायमल मिल्सने स्पष्ट केलं. खरं तर, जेव्हा टायमल मिल्सने एसेक्ससाठी खेळायला सुरुवात केली तेव्हा तो क्रीडा पत्रकारितेचाही अभ्यास करत होता.

IPL मध्ये 2 संघाचा भाग –

डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला टायमल मिल्स हा स्लोवर बॉल आणि डेथ ओव्हर साठी स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. गरजेच्या वेळी तो बॅटिंग सुद्धा करू शकतो. मिल्सने इंग्लंडसाठी १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत. टायमल मिल्स आयपीएल मध्ये सुद्धा २ संघाचा भाग बनला आहे. त्याने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू या २ संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. २०१७ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला १२ कोटी रुपयांना खरेदी केले. त्यावेळी त्याने ५ सामन्यात ५ बळी घेतले. त्यानंतर ५ वर्षांनी २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने टायमल मिल्सला १.५ कोटी रुपयांत संघात सामील करून घेतलं, मात्र तिथेही त्याला आपल्या कामगिरीत छाप पाडता आली नाही. ५ सामन्यांमध्ये तो फक्त ६ विकेट्स घेऊ शकला.

Nagpur Pune Vande Bharat Express : नागपूर- पुणे वंदे भारतचे वेळापत्रक जाहीर!! कुठे- कुठे थांबणार?

Nagpur Pune Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nagpur Pune Vande Bharat Express । नागपूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून येत्या १० ऑगस्ट पासून नागपूर- पुणे मार्गावरून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. हि ट्रेन आठवड्यातून ३ वेळा धावेल. तिचा सुरुवातीचा स्टॉप अजनी रेल्वे स्थानक असेल आणि शेवटचा थांबा पुण्यातील हडपसर स्टेशन असेल. या नव्या वंदे भारत एक्सप्रेस मुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी आणखी वाढण्यास मदत होईल. तसेच व्यापार आणि पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल.

कस असेल वेळापत्रक ? Nagpur Pune Vande Bharat Express

पुणे रेल्वे स्थानकात सध्या अधिक गाड्या सामावून घेणे शक्य नसल्याने नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी (Nagpur Pune Vande Bharat Express) हडपसरला तात्पुरते टर्मिनस बनवलं आहे. ट्रेन क्रमांक २६१०२ अजनी (नागपूर)- पुणे वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ९:५० वाजता अजनीहून निघेल आणि त्याच रात्री ९:५० वाजता पुण्यात पोहोचेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे-अजनी (नागपूर) पुण्याहून सकाळी ६:२५ वाजता निघेल आणि संध्याकाळी ६:२५ वाजता अजनीला पोहोचेल. ही ट्रेन आठवड्यातील सहा दिवस धावेल… दर सोमवारी अजनीहून आणि मंगळवारी पुण्याहून…..

यापूर्वी पुण्याहून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला ये जा करण्यासाठी तब्बल १३-१४ तास लागायचे. मात्र आता वंदे भारत ट्रेनमुळे (Nagpur Pune Vande Bharat Express) हाच प्रवास १२ तासांवर आला आहे. म्हणजेच प्रवाशांचा वेळ २ तासांनी वाचणार आहे. सुरुवातीला हि स्लिपर ट्रेन नसेल, त्यामुळे प्रवाशांना बसून प्रवास करावा लागेल. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांना वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड या रेल्वे स्थानकावर थांबेल. त्यामुळे इथल्या प्रवाशाना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या स्थानकावर किती वाजता थांबणार ?

अजनी – सकाळी ९.५० वाजता
वर्धा – सकाळी १०.४० वा.
बडनेरा – दुपारी १२.०३ वा.
अकोला – दुपारी १ वाजता
भुसावळ – दुपारी २.५५ वा.
जळगाव – सायंकाळी – ३.२६ वा.
मनमाड – सायंकाळी ५.२५ वा.
कोपरगाव – ६.२० वा.
अहमदनगर – रात्री ७.३५ वा.
दौंड – रात्री ८.४३ वा.
पुणे – रात्री ९.५०

जैन समाजामध्ये कबुतराचं महत्व कसं काय? यामागचं कारण समजून घ्या

dadar kabutar khana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दादर कबूतर खाना परिसर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय. हा कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरुन मोठं राजकारण तापलं आहे. जैन समाज तर पुरता आक्रमक झाला असून संतप्त जमावाने कबुतरखान्यावर झाकलेली ताडपत्री हटवली . यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. मात्र जैन समाज कबुतरखान्यासाठी एवढा आक्रमक का झाला आहे? जैन समाजामध्ये कबुतरांना खायला घालणं एवढं महत्त्वाचं का मानलं जातं? जैन समाजात कबुतरांविषयी इतकी आपुलकी आणि महत्व का आहे? यामागे कोणतं कारण आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जैन धर्मामध्ये कबुतराचे महत्त्व का आहे ?

धार्मिक मान्यतेनुसार, जैन समाजामध्ये सर्व जीवमात्रांप्रती करुणा आणि अहिंसा ही अत्यंत मूलभूत तत्त्वे मानली जातात. जैन संस्कृतीमध्ये मुक्या प्राण्यांना खाऊ घालणं हे पुण्याचे काम मानलं जातं. याच भावनेतून कबुतरांना दाणे खायला दिले जातात. जैन समाज कबुतरांप्रती विशेष प्रेम आणि आपुलकी दर्शवतो यामागेही काही कारणे आहेत.. कारण कबुतरे हे शांत, निरुपद्रवी आणि अहिंसक पक्षी मानले जातात. कबुतर हे मांसाहारी आहे, ते कोणत्याही इतर पक्षाचा जीव घेत नाही, त्यामुळे कबुतरे जैन समाजाला खूप प्रिय असतात. जैन धर्मामध्ये कबुतरांना दाणे टाकणे हे जीव दया म्हणजेच करुणेचं प्रतीक मानलं जातं.तसेच जैन धर्मीय लोक आपले धार्मिक कर्तव्य समजतात. जैन धर्मात जीव दयेच्या परंपरेला धार्मिक कर्तव्य मानलं जातं.

तसेच जैन धर्मात पूर्वजांच्या आत्म्याला तृप्ति आणि पितृ-दोषातून मुक्तीसाठीही पक्षांना खायला टाकतात अशीही समाजात भावना आहे. विशेष म्हणजे कबुतराला अमावस्येच्या दिवशी दाणे टाकणं शुभ आणि फलदायक मानलं जातं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अमावस्येच्या दिवशी कबुतराला दाणे टाकतात. अध्यात्मिक दृष्टीकोन विचार केला तर कबुतरांना अध्यात्मिक संदेशवाहक मानलं जातं. त्यामुळेच कबुतरांना जास्त महत्त्व आहे. मुंबई शहरात काही जैन मंदिरांकडून आणि ट्रस्टच्या माध्यमातून ‘कबुतरखाने’ चालवले जातात. म्हणूनच दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय म्हणजे धार्मिक विश्वासांवर हल्ला असल्याचं मानत त्याला विरोध करत आहेत.

दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय का घेतला गेला?

बॉम्बे उच्च न्यायालयाच्या 31 जुलै 2025 च्या आदेशानुसार, कबुतरखान्यांमधील कबुतरांना खायला घालण्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका आणि वारसा स्थळांचे नुकसान होत असल्याने, मुंबई महानगर पालिकेला कबुतरखाने बंद करण्याचे आणि दाणे टाकण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता सरकारने हा निर्णय फिरवला आहे. जैन समाजाच्या धार्मिक भावना आणि लोकांचे आरोग्य यांची सांगड घालावी लागेल, यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे. कबुतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.

Western Railways : फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा दणका!! 71.68 कोटी वसूल केले

Western Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Western Railways । रेल्वेने प्रवास करत असताना तिकीट न काढणारे आणि फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त असते. पैसे वाचवण्यासाठी अनेकजण विनातिकीट प्रवास करतात. मात्र आता याच फुकट्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेने दणका दिला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी अशा प्रवाशांकडून तब्बल 71.68 कोटी रुपये वसूल केले आहेत. लोकल गाड्या आणि रेल्वे स्थानकांमधील सखोल तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान हि कारवाई करण्यात आली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या काळात तिकीट तपासणी मोहिमा– Western Railways

पश्चिम रेल्वेच्या (Western Railways) वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या काळात अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या, या तिकीट मोहिमेच्या माध्यमातून तब्बल ७१.६८ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ज्यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातून वसूल केलेल्या १८.४० कोटी रुपयांचाही समावेश आहे. खरं तर विना तिकीट प्रवासामुळे तिकीट काढणाऱ्या प्रवासांना त्रास होत आहे. विशेष म्हणजे मेल/ एक्सप्रेस गाड्या तसेच प्रवासी गाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमधील प्रवाशांची रेल्वे प्रशासनाला विनातिकीट प्रवाशांबाबत तक्रार केली होती. रेल्वे प्रसासनाने याची दखल घेऊन विनातिकीट प्रवास करणाऱ्या बाबत हि मोहीम हाती घेतली होती.

याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रकाशित केलेल्या प्रसिद्धी पत्रात सांगितले आहे कि ऑगस्ट २०२३ मध्ये १.८३ लाख विना तिकीट प्रवाशांकडून १०.४२ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून, ज्यामध्ये बुक न केलेल्या सामानाच्या केसेसचा देखील समावेश आहे. तसेच, ऑगस्ट महिन्यात, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात ५९,००० हून अधिक विनातिकीट प्रवासांकडून २.५८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. ठाकूर पुढे म्हणाले, मुंबईतील एसी लोकल गाड्यांमध्ये विना तिकीट प्रवासांना रोखण्यासाठी वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जातात. या मोहिमांमुळे एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत जवळजवळ ३३,००० हजार विनातिकीट प्रवाशांना दंड करण्यात आला आहे आणि त्यांच्याकडून १०९.१७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १७४ टक्क्यांहून जास्त आहे.