Friday, January 2, 2026
Home Blog Page 323

Bank Holidays In January 2025 : जानेवारीत 13 दिवस बँका बंद ; सुट्ट्यांची यादी पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षाची सुरुवात काही दिवसातच होणार असून, बँकेची कामे नियोजनपूर्वक करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जानेवारी 2025 मधील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. RBI ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ही यादी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतीही कामे करायची असतील, तर या सुट्ट्यांचा विचार करूनच नियोजन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर चला जाणून घेऊयात जानेवारी महिन्यात कोणकोणत्या दिवशी बँका बंद असणार आहेत.

जानेवारी 2025 मधील बँक सुट्ट्या –

जानेवारी 2025 मध्ये बँकांची सुट्ट्यांची यादी विविध राज्यांमध्ये भिन्न असू शकते. 1 जानेवारी रोजी नववर्षानिमित्त काही बँका बंद राहतील. 5 जानेवारी आणि 19 जानेवारी हे आठवड्याच्या सुट्टीचे दिवस असतील. 11 जानेवारी रोजी दुसरा शनिवार, 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती आणि आठवड्याची सुट्टी असेल. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत किंवा पोंगलच्या निमित्ताने आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये बँका बंद राहतील. 15 जानेवारी रोजी माघ बिहू किंवा संक्रांतीच्या दिवशी तामिळनाडू, आसाम आणि इतर राज्यांमध्ये सुट्टी असेल. 16 जानेवारी रोजी उज्जावर तिरुनल, जे तामिळनाडूत बँकांसाठी बंद असणारा दिवस असेल. 22 जानेवारी रोजी इमोइन सण मणिपूरमध्ये, तर 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीच्या निमित्ताने मणिपूर, ओडिशा, पंजाब, सिक्किम, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर आणि दिल्लीतील बँका बंद राहतील. 25 जानेवारी रोजी चौथा शनिवार, तर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर केलेली आहे. 30 जानेवारी रोजी सिक्किममधील बँका सोनम लोसर सणाच्या निमित्ताने बंद असतील.

सुट्ट्यांचे वेळापत्रक विविध राज्यानुसार वेगळे –

सुट्ट्यांचे हे वेळापत्रक विविध राज्यांतील स्थानिक उत्सव व राष्ट्रीय सुट्ट्यांवर आधारित आहे. या दिवसांव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये स्थानिक कारणांमुळेही बँका बंद असू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला बँकेची महत्त्वाची कामे असतील, तर या सुट्ट्यांचा विचार करूनच आपली कामे करून घ्यावीत . तसेच या सुट्ट्या जाहीर केल्या असल्या तरी तुम्हाला ऑनलाइन बँकिंग सेवा 24×7 उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे अनेक सेवा घरबसल्या करता येऊ शकतात.

आता सुई न टोचता मिळणार इंजेक्शन; संशोधकांनी तयार केली वेदनारहित सिरिंज

Syringe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत इंजेक्शनचे नाव घेतले की, त्यांना खूप भीती वाटते. कारण इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी वेदना होत असतात. परंतु आता इथून पुढे तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. कारण आता वेदना रहित इंजेक्शन तुम्हाला दिले जाणार नाही. कारण मुंबई आयआयटीच्या संशोधकांनी यावर एक मोठा उपाय शोधला आहे. त्यांनी शॉकवेव्ह नावाची एक नवीन सिरींज विकसित केलेली आहे. यामुळे तुम्हाला इंजेक्शन देताना कोणत्याही प्रकारच्या वेदना होणार नाही.

या सिरींजच्या मदतीने शरीरावर दाब देऊन इंजेक्शन देता येते. यामुळे तुम्हाला वेदना देखील होत नाही. आणि कोणताही संसर्ग होण्याचा धोका देखील कमी असतो. अशा प्रकारची माहिती संशोधकांनी दिलेली आहे. डॉक्टर मानवी शरीरात औषधे पोहचवण्यासाठी इंजेक्शनचा वापर करतात. पण सुईची अनेकांना भीती वाटते. तसेच लहान मुलांना देखील इंजेक्शन देणे खूप कठीण होते. त्याचप्रमाणे अनेक वेळा काही डॉक्टर एक इंजेक्शन अनेक वेळा वापरतात. त्यामुळे संसर्गाचा धोका मोठा प्रमाणात असतो. परंतु आता याचे कोणत्याही प्रकारची टेन्शन राहणार नाही.

आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे प्राधिकृत विरेन मेनेजेस यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या शॉक सिरिंज वापरून शरीरात जाण्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. यामध्ये दिलेल्या औषधांनी प्रयोगशाळेतील उंदरावर इंजेक्शनच्या सुईने दिलेल्या औषधांची तुलना केलेली आहे. आपण ज्यावेळी इंजेक्शन छोट्या प्रमाणात छिद्र करते. परंतु शॉक सीरींजमध्ये असे काहीही होणार नाही. त्याऐवजी आता ध्वनी लहरीद्वारे वेगाने प्रवास करतात.

यामध्ये प्रेशराईज नायट्रोजन वायू औषधाने भरलेल्या शॉक सीरींजवर दाब लागू करून द्रव्य औषधाच्या बारीक स्प्रे तयार करतो. हा स्प्रे वेगाने त्वचेत जातो. आणि संपूर्ण प्रक्रिया त्या व्यक्तीला समजण्याआधीच पूर्ण.होते.. हे 2019 मध्ये तयार केलेले आहे. यामध्ये सूक्ष्म शॉक ट्यूब आहेत.

रोज सकाळी रिकाम्या पोटी चावून खा कढीपत्त्याची पाने; शरीराला होतील फायदे

Curry Leaves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतीय मसाल्यातील गोष्टी आपल्या शरीरासाठी वरदान आहे. यामुळे जेवणाला चव तर येतेच परंतु यासोबत आरोग्याला देखील त्याचे फायदे होतात.त्यात कढीपत्ता देखील आरोग्याचा खजिना आहे. त्याला गोड कडुलिंब असेही म्हणतात. लिनालूल, अल्फा-टेरपीन, मायर्सीन, महानिम्बाइन, कॅरिओफिलीन, अल्फा-पाइनेन आणि मुरायनॉल, जीवनसत्त्वे ए, बी, सी, ई आणि कॅल्शियम यांसारखी अनेक संयुगे यामध्ये आढळतात, जे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. साधारणपणे कढीपत्त्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो.

हे सांबार, उपमा, ढोकळा, डोसा, टोमॅटो किंवा नारळाची चटणी, अरहर डाळ आणि करीमध्ये देखील जोडले जाते. याशिवाय भाज्या, सॅलड, पराठे आणि ओट्समध्ये कढीपत्ता घातल्यानेही चव वाढण्यास मदत होते. हे खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. सकाळी रिकाम्या पोटी ५-६ कढीपत्ता खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. चला जाणून घेऊया त्याचे फायदे

सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता कसा खावा

सकाळी रिकाम्या पोटी 5-6 ताजी कढीपत्ता चावून खाल्ल्यानंतर तुम्ही एक ग्लास पाणी पिऊ शकता. हे नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. एकूणच आरोग्य सुधारते आणि शरीर मजबूत होते.

सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता चघळण्याचे फायदे

प्रतिकारशक्ती वाढते

कढीपत्ता पाण्यात उकळून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स तुमच्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती वाढवून अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यास उपयुक्त

रोज सकाळी रिकाम्या पोटी ५-६ कढीपत्ता खाल्ल्याने चयापचय क्रिया सुधारते. यामुळे वजन कमी होते. यामध्ये आढळणारे डायक्लोरोमेथेन आणि इथाइल एसीटेट सारखे घटक वजन कमी करण्यास मदत करतात आणि शरीराला डिटॉक्सिफाय करतात.

मधुमेह आणि हृदयाचे आरोग्य सुधारते

सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता चावल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा रामबाण उपाय मानला जातो. त्यात हायपोग्लाइसेमिक आहे, म्हणजे साखरेची पातळी कमी करणारे गुणधर्म, जे योग्य इन्सुलिन उत्पादनास मदत करते. याशिवाय सकाळी कढीपत्ता खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

डोळ्यांना फायदा होतो

कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए असते, जे दृष्टी सुधारण्यास मदत करते. त्यामुळे दूरवर पाहण्याची क्षमताही वाढते. जर दृष्टी कमी होत असेल तर जेवणानंतर ५-६ कढीपत्ता खा. सकाळी रिकाम्या पोटी याचे मधासोबत सेवन करणे देखील फायदेशीर ठरते. याशिवाय सकाळी रिकाम्या पोटी ते चघळल्याने मॉर्निंग सिकनेसपासून आराम मिळतो आणि मळमळ यासारख्या समस्या दूर होतात.

यकृत निरोगी ठेवते, पचन सुधारते

कढीपत्त्यात असलेले टॅनिन आणि कार्बाझोल अल्कलॉइड्स सारखे घटक यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे हिपॅटायटीस आणि सिरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. गॅस, ॲसिडीटी, पोटफुगी यांसारख्या समस्याही दूर होतात.

स्नायू बळकट होतात

कढीपत्त्यातील प्रथिने स्नायूंना मजबूत करतात आणि स्नायू देखील तयार करतात. याशिवाय कढीपत्ता नियमितपणे रिकाम्या पोटी चघळल्याने तणाव दूर होतो. यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स यामध्ये मदत करतात. रोज एक ग्लास पाण्यासोबत कढीपत्ता खाल्ल्याने तणाव कमी होतो.

दात किडणे थांबवते

कढीपत्ता तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. ही पाने चघळल्याने दातांमधील बॅक्टेरिया निघून जातात आणि किडण्याची समस्याही दूर होते. ही पाने खाल्ल्याने केसांना अंतर्गत पोषण मिळते.

भारतातील प्राचीन किल्ले; हिवाळ्यात एकदा तरी भेट द्याच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा पर्यटनासाठी समृद्ध देश असून येथील ऐतिहासिक वारसा जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. प्रत्येक ठिकाणी नैसर्गिक सौंदर्याबरोबरच ऐतिहासिक ठेवा जतन करणारी ठिकाणे पाहायला मिळतात. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे भारतातील विविध किल्ले वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे . राजपूत, मुघल, आणि द्रविडीयन स्थापत्यशैलीने बांधलेले हे किल्ले भूतकाळातील राजेशाही वैभवाची साक्ष देतात. तसेच अनेक गोष्टींनी भारताला समृद्ध बनवले आहे. महाराष्ट्रातील किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून देतात, तर इतर राज्यांतील किल्ले त्याच्या विशिष्ट सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जातात. तर आज आपण अशाच भारतातील प्राचीन किल्यांची वैशिष्टये पाहणार आहोत.

किल्ला मुबारक –

किल्ला मुबारक पंजाबमध्ये असून , भटिंडामध्ये स्थित हा किल्ला भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे. सुमारे सात प्रकारच्या विटांनी बांधलेल्या या किल्ल्याच्या भिंती ऐतिहासिक वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहेत.

ग्वाल्हेर किल्ला –

मध्यप्रदेशमधील उंच वाळूच्या खडकांवर वसलेला हा किल्ला तोमर घराण्याच्या इतिहासाशी निगडित आहे. ग्वाल्हेर किल्ला राजपूत स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

कांगडा किल्ला –

कांगडा किल्ला हिमाचल प्रदेशात इसवी सन पूर्व चौथ्या शतकात बांधलेला भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे. कटोच राजवंशाच्या इतिहासाशी निगडित हा किल्ला हिमाचल प्रदेशातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो.

मेहरानगड किल्ला –

राजस्थान , जोधपुरमध्ये स्थित हा किल्ला राजपूत स्थापत्यकलेचे प्रभावी उदाहरण आहे. याला मयूर ध्वज किल्ला म्हणूनही ओळखले जाते. किल्ल्याच्या नक्षीकामाने तो अद्वितीय बनवला आहे. भारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यांमुळे देशाचा भूतकाळ आणि सांस्कृतिक वारसा जिवंत राहतो. हे किल्ले केवळ वास्तुकलेच्या दृष्टीनेच नव्हे, तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे ठिकाण आहेत. भारतातील हे ऐतिहासिक किल्ले देशाच्या वैभवशाली भूतकाळाचा गौरव वाढवतात. त्यामुळे या केल्यानं अन्यनसाधारण महत्व आहे.

हिवाळ्यात घ्या फिरण्याचा आनंद; महाराष्ट्रातील ही 4 पर्यटनस्थळे ठरतील बेस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळ्याच्या ( Winter Season ) थंडगार दिवसांत महाराष्ट्रातील काही ठिकाणे प्रवासासाठी सर्वोत्तम मानली जातात. शांतता, निसर्गाचे सौंदर्य, आणि थंड हवामानाचा आनंद घेण्यासाठी प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकणी फिरत असतात. अशा भटकंती करणाऱ्या प्रवाशांसाठी आज आम्ही अशी ठिकाणे सांगणार आहोत , ज्यामुळे तुमचा आनंद दुप्पट होणार आहे. तर चला जाणून घेऊयात ती कोणती ठिकाणे आहेत .

माथेरान –

माथेरान हे आशियातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे, जे पर्यटकांना शुद्ध हवा आणि निसर्गाच्या अप्रतिम सान्निध्यात रमण्याची अनोखी संधी मिळते . येथील पॅनोरमा पॉईंट आणि इको पॉईंट हे दोन प्रमुख ठिकाणे आहेत, जिथून पर्यटकांना चित्तथरारक दृश्यांचा आनंद घेता येतो. माथेरानमध्ये घोडेसवारी आणि पायी फेरफटका यांसारख्या साहसी क्रियांचा अनुभव घेण्याचीही संधी आहे. हे सुंदर ठिकाण निसर्गप्रेमींना आणि साहस प्रेमींना आकर्षित करते, कारण ते एक शांतीपूर्ण आणि निसर्गाच्या गाभ्यात हरवलेले ठिकाण आहे.

नाशिक –

हे आध्यात्मिक शहर आणि भारताची वाइन राजधानी म्हणून ओळखले जाते, इथं थंड हवामानात अनेक प्रवास स्थळांचा अनुभव घेतला येतो . या शहरातील प्रमुख आकर्षणांमध्ये सुला वाइनयार्ड आहे, जिथे पर्यटक वाइनचा आणि द्राक्षमळ्यांचे सुमधुर भ्रमण करण्याचा आनंद घेतात. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर ( Trimbakeshwar Jyotirling Mandir) हे नाशिकमधील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे, जे अनेक भाविकांचे आकर्षण केंद्र आहे. त्याचसोबत नाशिकच्या अंजनेरी डोंगरावर ट्रेकिंग करण्याची संधीही पर्यटकांना साहसी अनुभव प्रदान करते. या शहराच्या निसर्गदृष्ट्या समृद्ध आणि आध्यात्मिक वातावरणात प्रवास करणाऱ्यांना एक अद्वितीय अनुभव मिळतो.

पाचगणी –

पाचगणी टेबललँड आणि गोड स्ट्रॉबेरी शेतीसाठी प्रसिद्ध असून , थंड हवामानाचा अनुभव घेण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. येथील प्रमुख आकर्षणांमध्ये सिडनी पॉईंट आणि पारशी पॉईंट ( parsi point ) यांचा समावेश आहे, जिथून डोंगराळ प्रदेशाचे सुरेख दृश्य पाहता येते. पाचगणीत मप्रो गार्डनमध्ये ताजे जॅम्स आणि आइस्क्रीमचा आनंद घेता येतो, जे पर्यटकांसाठी एक विशेष अनुभव असतो. साहस प्रेमींसाठी पॅराग्लायडिंग देखील एक रोमांचक आकर्षण आहे, जेथून पाचगणीच्या सुंदर निसर्गाचा हवाईदृष्ट्या आनंद घेतला जातो. या ठिकाणी निसर्गाची शांतता आणि साहसी अनुभवांचा उत्तम संगम आहे.

महाबळेश्वर –

महाबळेश्वर, स्ट्रॉबेरीच्या बागा आणि हिरव्यागार दऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. ते हिवाळ्यात निसर्गप्रेमींसाठी एक खास आकर्षण आहे. येथील वेण्णा लेक (venna lake) हे एक लोकप्रिय स्थळ आहे, जिथे पर्यटक बोटिंगचा अनुभव घेऊ शकतात. महाबळेश्वरमध्ये असलेला प्राचीन प्रातपगड किल्ला देखील इतिहासप्रेमींचा आकर्षण ठरतो. आर्थर सीटवरून दिसणारे विलोभनीय दृश्ये पर्यटकांना चांगलेच मोहित करतात, ज्यातून आसपासच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला जातो. या ठिकाणी निसर्गाच्या विविध रंगांचा अनुभव घेता येतो, जे महाबळेश्वरला एक अनोखं आकर्षण बनवतात.

गाडीचं मायलेज वाढवायचंय ? फक्त वापरा या 5 ट्रिक्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतामध्ये पेट्रोलच्या दरात सतत वाढ होत असल्याने चांगले मायलेज देणारी मोटरसायकल वापरणे ही गरज बनली आहे. अनेक वेळा मोटरसायकल स्वारांना त्यांच्या वाहनाचा अपेक्षेप्रमाणे मायलेज न मिळाल्यास निराशा होतात , विशेषतः जे दररोज 25 ते 30 किलोमीटर प्रवास करतात. अशा परिस्थितीत गाडीचे मायलेज सुधारण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही जबरदस्त उपाय सांगणार आहोत , ज्यामुळे तुमच्या गाडीचे मायलेज चांगले होईल.

मायलेज वाढवण्यासाठी उपयुक्त उपाय –

जर तुमच्या बाईकचे मायलेज कमी असेल तर कार्बुरेटरची सेटिंग तपासा. तसेच आवश्यक असल्यास कार्बुरेटरला मॅन्युअली किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रीट्यून करा. यामुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारते आणि मायलेजही वाढते. तसेच जर सिग्नलवर 20 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागले तर इंजिन बंद करा. सतत चालू ठेवलेले इंजिन इंधनाचा अपव्यय करते. याचा सर्वात जास्त फायदा शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी आहे , कारण तिथे वारंवार थांबावे लागते . यासोबतच बाईकच्या टायरमध्ये कंपनीने दिलेल्या निर्देशांनुसार हवेचा दाब ठेवावा. जर लांब प्रवासाला जात असाल तर पेट्रोल पंपावर टायरचा प्रेशर नक्की तपासा. तसेच
बाईक नियमितपणे स्वच्छ ठेवा आणि चालत्या भागांवर लुब्रिकेशन करा. यामुळे भागांची कार्यक्षमता टिकून राहते आणि बाईकचा परफॉर्मन्स सुधारतो, ज्याचा थेट परिणाम मायलेजवर होतो. बाईकवर अनावश्यक मॉडिफिकेशन केल्यास मायलेज कमी होऊ शकते.

कोणत्या गोष्टी टाळाव्यात –

जास्त वेगाने बाईक चालवण्याचे टाळा, कारण उच्च वेगाने चालवल्यास इंधनाचा अधिक वापर होऊ शकतो . त्याचप्रमाणे, अचानक ब्रेक लावण्यापासून टाळा , कारण यामुळे इंजिनवर अतिरिक्त ताण येतो आणि इंधनाची कार्यक्षमता कमी होते. गियर योग्य प्रकारे वापरणेही खूप महत्त्वाचे आहे, कारण योग्य गियरमध्ये बाईक चालवल्यास इंधनाचा वापर कमी होतो. तसेच बाईकची नियमितपणे सर्व्हिसिंग करून घ्या, कारण चांगली स्थिती राखलेली बाईक अधिक कार्यक्षमतेने चालते आणि इंधनाची बचत करते. हे सर्व उपाय जर तुम्ही अवलंबले, तर तुमच्या बाईकचे मायलेज नक्कीच चांगला होऊ शकते आणि इंधन खर्च कमी होऊ शकतो.

Manmohan Singh Death : …. तेव्हा मनमोहन सिंग नसते तर भारतीय अर्थव्यवस्था बुडाली असती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1990 च्या दशकाच्या सुरूवातीला भारताला एका गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तयावेळी परदेशी गुंतवणूक कमी झाली होती, इन्स्पेक्टर राज मुळे उद्योगधंदे सुरू करणे कठीण होऊन बसले होते, आणि देशाची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. अशा स्थितीत भारताच्या आर्थिक धोरणांना एक मोठी परीक्षा द्यावी लागत होती . पण मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांनी हे सिद्ध केलं की योग्य दिशा आणि नेतृत्वासोबत कोणत्याही संकटाचा सामना केला जाऊ शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी मनमोहन सिंग यांचा सिहाचा वाटा आहे.

मनमोहन सिंग यांना वित्तमंत्रीपदाची जबाबदारी –

1991 मध्ये नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांना वित्तमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. सिंग यांचा अनुभव आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग क्षेत्रातील साखेचा उपयोग देशाला बाहेर काढण्यासाठी करण्यात आला. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर राहिले होते, तसेच त्यांनी आर्थिक धोरणांवर आधीच मोठे काम केले होते. त्याचसोबत त्यांनी 24 जुलै 1991 रोजी सादर केलेल्या त्यांच्या बजेटमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे परिवर्तन घडून आले. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठ्याप्रमाणात चालना मिळाली . म्हणून मनमोहन सिंग याना अर्थव्यस्थेला बळकटी आणणारा सिंह असल्याचे म्हंटले जाते.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण बदल –

1991 च्या बजेटमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण बदल केले गेले. त्यात लायसन्स-परमिट राजाचा शेवट करण्यात आला, ज्यामुळे उद्योग-व्यवसायांवरील अनेक निर्बंध काढले गेले. यामुळे व्यावसायिक गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी आयात-निर्यात धोरणांमध्ये बदल करण्यात आले, ज्यामुळे परकीय व्यापारात सुधारणा झाली. परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने परकीय कंपन्यांना आकर्षित करण्याचे पाऊल उचलले, ज्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळाली. याशिवाय, सॉफ्टवेअर उद्योगाला विशेष सवलती देण्यात आल्या, ज्यामुळे भारत सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये एक महत्त्वपूर्ण केंद्र बनला. या सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर अधिक खुले आणि प्रतिस्पर्धी बनली. याचा मोठा फायदा भारताला झाला .

नव्या युगाचा प्रारंभ –

या सुधारणा केवळ देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरल्या नाहीत, तर त्यांनी भारताला तीन दशकांत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून दिले. या सुधारणांमुळे लाखो रोजगार निर्माण झाले, आणि कोट्यवधी लोक गरिबीच्या रेषेवरून वर आले. 1991 च्या या बदलांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या नव्या युगाचा प्रारंभ केला.

RBI च्या नावाने होतोय मोठा स्कॅम; मिनिटातच होऊ शकते बँक अकाउंट रिकामे

RBI Fraud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल ऑनलाईन फ्रॉड होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून व्हॉइस मेसेज आला असेल, तर तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे. अनेक स्कॅमर्स आरबीआयच्या नावाने लोकांना व्हॉइस मेसेज पाठवत आहेत. यामध्ये त्यांची बँक खाती बंद करण्याचा धाक दाखवून लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत सरकारने अलर्टही जारी केला आहे. सरकारने याला घोटाळा ठरवून अशा ध्वनी संदेशांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

व्हॉइस मेसेजद्वारे धमक्या दिल्या जातात

आरबीआयच्या नावाने पाठवल्या जाणाऱ्या या बनावट व्हॉईस मेसेजमध्ये, “नमस्कार, ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. तुमचे क्रेडिट कार्ड फसवणुकीत गुंतलेले आढळले आहे. येत्या २४ तासांत सर्व बँक खाती तुमच्या नावाने उघडले जाईल अधिक माहितीसाठी 9 दाबा.” जर एखाद्या व्यक्तीने भीतीपोटी 9 दाबले तर त्याची वैयक्तिक माहिती स्कॅमर्सच्या हाती जाण्याची भीती असते. त्यामुळे या व्हॉइस मेसेजमध्ये दिलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन करू नका.

असे व्हॉईस मेसेज घोटाळे कसे टाळायचे?

आजकाल, सायबर गुन्ह्यांची प्रकरणे खूप वाढली आहेत आणि घोटाळेबाज लोकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अतिरिक्त खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे घोटाळे टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे-

  • जर कोणी बँक किंवा सरकारी अधिकाऱ्याची तोतयागिरी करत बोलत असेल, तर फोन नंबर आणि ओळखीची खात्री करा. कॉलर फसवणूक करणारा देखील असू शकतो.
  • फोनवर कोणाशीही संवेदनशील माहिती शेअर करू नका. सरकारी अधिकारी कधीही ओटीपीसह वैयक्तिक तपशील विचारत नाहीत.
  • जर कोणी तुम्हाला घाईत काहीतरी करण्यास सांगितले तर अशा सूचनांचे पालन करू नका. थोडा वेळ घ्या आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा.
  • तुम्हाला कोणत्याही संशयास्पद नंबरवरून कॉल आल्यास किंवा कोणत्याही गडबडीचा संशय असल्यास, अशा नंबरला त्वरित ब्लॉक करा आणि तक्रार करा.

सरकारच्या या योजने अंतर्गत ड्रोन घेण्यासाठी मिळणार 4 ते 5 लाखाचे अनुदान; जाणून घ्या सविस्तर

Drone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांचा विकास व्हावा आणि त्यांना चांगल्या प्रकारे शेती करता यावी. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना आणत असतात. आजकाल कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण आणि डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सरकार अनुदान देत असतात. त्यांना पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी मदत होते.

अशाच प्रकारची एक नवीन योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे. या योजनेचे नाव ड्रोन अनुदान योजना असे आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी चांगलीच फायदेशीर आहे. पिकांवर कीटकनाशके फिरण्यासाठी ड्रोन फायद्याचा ठरतो. परंतु रोजगार निर्मितीला देखील यामुळे चालणार नाही. यासाठी केंद्रशासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण या योजनेच्या माध्यमातून दोन घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. ड्रोन खरेदीसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते. या अंतर्गत 100 ड्रोन खरेदीसाठी महाराष्ट्र राज्यसाठी आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे.

शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी सहकारी संस्था व कृषी आणि सत्संग पदवीधर लाभार्थी यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. या अंतर्गत शेतकरी सहकारी संस्था तसेच शेतकरी उत्पादन कंपनी यांना जोड खरेदीसाठी जवळपास 40% म्हणजे 4 लाखांपर्यंत अनुदान सरकारकडून मिळणार आहे. त्याचप्रमाणे कृषी संबंधित पदवीधर असेल तर त्यांना 50% म्हणजे 5 लाख रुपयांपर्यंतच्या अनुदान दिले जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती त्याचप्रमाणे महिला शेतकऱ्यांना 50% अनुदान म्हणजेच 5 लाख रुपये देण्यात येणार आहे. आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना 40 टक्के म्हणजे 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

ड्रोनचा फायदा कसा होणार

पिकांवर जर रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल किंवा तो होऊ नये यासाठी पिकांवर फवारणी करत असतात. परंतु ही फवारणी करण्यासाठी जर जास्त वेळ लागत असेल, तर तुम्ही ड्रोनचा वापर करू शकता. यामुळे पिकांवर फवारणी करणे सोपे झाले आहे. ड्रोनची माहिती घेऊन शेतकरी स्वतः देखील फवारणी करू शकतात. किंवा तज्ञ प्रशिक्षण चालकांकडून देखील फवारणी करून घेऊ शकतात. या माध्यमातून रोजगार निर्मिती देखील होते.

नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास शरीरात दिसतात ही लक्षणे; वेळीच व्हा सावध

Vein blockge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या शरीरामध्ये कोणताही बदल झाला असल्यास शरीर आपल्याला वेळोवेळी त्याचा संकेत देत असते. आपल्या संपूर्ण शरीरात शिरा पसरलेल्या असतात. या शिरा रक्त सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असतात. अशा वेळी तुमच्या मज्जातंतूचे कार्य चांगल्या पद्धतीने पार पडणे खूप गरजेचे असते. जर तुमच्या मजातंतूमध्ये कोणताही प्रकारची समस्या आढळली, तर त्याचा परिणाम तुमच्या शरीराच्या प्रमुख अवयवांवर होऊ शकतो.

जर तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले, तर शरीर आपल्याला वेळोवेळी त्याबाबतचे संकेत देत असतात. याबाबतची कारण देखील वेगळी असतात. जसे की तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी, शारीरिक हालचालीचा अभाव, लठ्ठपणा वाढत जातो, उच्च कॉलेस्ट्रॉल, धुम्रपान यांसारख्या गोष्टीमुळे तुमच्या शिरा बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्त हृदयापर्यंत नीट पोहोचत नाही. आणि हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे शरीर आपल्याला काही संकेत देत असतात. त्यावेळी त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

छातीत दुखणे

जेव्हा एखाद्या व्यक्तीला सतत छातीमध्ये दुखते किंवा जडपणा जाणवतो, यावेळी शिऱ्यांमध्ये अडथळा निर्माण झालेला असतो. म्हणजेच पुरेसा ऑक्सिजन तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे छातीमध्ये दुखते.

श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे

तुमच्या नसांमध्ये जर बिघाड झाला तरी, देखील तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या ब्लॉकेजमुळे तुमच्या शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो, अशा काही समस्या जाणवल्या, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

तीव्र थकवा आणि अशक्तपणा

तुम्हाला जर वारंवार थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर हे देखील शिरांमध्ये अडथळा निर्माण होण्याचे एक लक्षण आहे. जर तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला तर हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला सारखे थकल्यासारखे आम्ही अशक्तपणा वाटते. जर तुम्हाला अशा प्रकारचे लक्षण दिसत असेल तरी देखील डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

वारंवार चक्कर येणे

वारंवार चक्कर येणे हे देखील नसांमध्ये अडथळा येण्याचे एक प्रमुख लक्षण आहे ते ब्लॉकेजमुळे मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही त्यामुळे तुम्हाला चक्कर येते अनेक वेळा माणसं जास्त वेळ बेशुद्ध अवस्थेत देखील सापडतात.