Monday, December 29, 2025
Home Blog Page 383

Colon Cancer Symptoms | बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर सावधान; असू शकते ‘या’ कॅन्सरचे लक्षण

Colon Cancer Symptoms

Colon Cancer Symptoms | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीचा त्यांच्या शरीरावर मात्र विपरीत परिणाम होत आहे. यामुळे बद्धकोष्ठते सारख्या अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. अनेक लोक हे बाहेरचे अन्न जास्त खातात. त्यामुळे त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास चालू होतो. हे एक कोलन कॅन्सरचे (Colon Cancer Symptoms) लक्षण असू शकते. जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठता होत असेल, तर याला कोलन कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्याचा कर्करोग असे म्हणतात.

हा कॅन्सर मोठ्या आतड्यात किंवा गुद्दभागाच्या आतड्या (Colon Cancer Symptoms) संबंधित असतो. सुरुवातीला याची काही लक्षण दिसतात. परंतु लोक सुरुवातीला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. परंतु नंतर हीच लक्षणे आपल्या जीवासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे या लक्षणांना वेळीच ओळखले पाहिजे. आणि डॉक्टरांचे उपचार सुरू केले पाहिजे. आता या कॅन्सरची कोणती लक्षणे दिसतात? तसेच याचे काय परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया.

जर तुम्ही नेहमीच बाहेर जंक फूड खात असेल, तर तुम्हाला हा कोलन कॅन्सर (Colon Cancer Symptoms) होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बाहेरील पदार्थांचे कमीत कमी सेवन करा. तुम्ही जर जंकफुड जास्त प्रमाणात खाल्ले, तर तुम्हाला बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल. तसेच तुम्ही जास्त प्रमाणात मांस देखील सेवन करत असाल, तरी देखील कोलन कॅन्सर होण्याची शक्यता तुम्हाला जास्त भीती असते. तुम्ही जर सतत चीज, बटर यांसारख्या गोष्टीचे सेवन करत असाल तरी देखील सुरुवातीला बद्धकोष्ठतेपासून येथे सुरुवात होते. परंतु हळूहळू हा आजार कर्करोगामध्ये रूपांतरित होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकांना दारू आणि सिगरेटचे व्यसन आहे. त्यांना याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या रोगाची लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे असते. आणि त्यानुसार त्यावर उपचार घेणे गरजेचे आहे.

Curry Leaves | रोज सकाळी रिकाम्या पोटी खा कढीपत्त्याची पाने; शरीराला होतील अद्भुत फायदे

Curry Leaves

Curry Leaves | कढीपत्ता हा आपल्या भारतीय जेवणातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. कढीपत्त्याचा वापर जवळपास सगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खास करून साउथ इंडियन पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर जास्त होतो. कढीपत्त्यामुळे पदार्थाला चव देखील चांगली येते. आणि वेगळा सुगंध येतो. परंतु या कढीपत्त्यामुळे आपल्या आरोग्याला देखील अनेक फायदे होतात. कडीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असता. आयुर्वेदात देखील कढीपत्त्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात कढीपत्त्याचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही तर रोज सकाळी रिकाम्या पोटी पाच ते सात कडीपत्त्याच्या पानांचे सेवन केले तर तुमच्या शरीराला खूप चांगले फायदे मिळतील.

कढीपत्त्यामध्ये (Curry Leaves) आयन, प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन सी, अँटीऑक्सिडंट असे अनेक गुणधर्म असतात. ज्यामुळे आपल्या शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. कढीपत्त्याची पाने आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तुम्ही कढीपत्त्याची पाने दररोज खाऊन त्यावर कोमट पाणी पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला जास्तीचा फायदा होईल. आता कढीपत्त्याची पाने दररोज खाल्ल्याने तुमच्या शरीराला कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत.

पचनक्रिया सुधारते | Curry Leaves

तुम्ही जर रोज सकाळी रिकामे पोटी कढीपत्त्याची काही पाने खाल्ली आणि कोमट पाणी पिले तर पोटा संबंधित तुमचे जे काही आजार आहे. ते सगळे दूर होतात. कढीपत्त्यामध्ये फायबर, जास्त प्रमाणात असते त्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली सुरळीत चालते तुमचे. तसेच अन्नदे खील सहजपणे पचते. नियमित या पानांचे तुम्ही सेवन केले, तर गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कायमच्या दूर होतील.

ब्लड शुगर कंट्रोल मध्ये राहते

कढीपत्त्याच्या पानांचा तुमच्या शरीराला देखील खूप फायदा होतो. तुम्ही जर रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केले, तर डायबिटीसच्या रुग्णांना फायदा होतो. यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल मध्ये राहते. आणि शरीरात इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढण्यास मदत होते. तुम्ही जर कढीपत्त्याच्या पानांचे दररोज सेवन केले, तर टाईप 2 डायबिटीसचा धोका देखील कमी होतो.

वजन कमी होते

तुम्ही जर एक महिना उपाशी पोटी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केले, तर तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होते. यामुळे मेटाबोलिझम बुस्ट होते. आणि शरीरातील एक्सट्रा कॅलरी बर्न होतात. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी देखील कढीपत्त्याच्या पानांच्या सेवन होते. यामुळे तुमची भूक देखील कंट्रोलमध्ये राहते.

इम्युनिटी बूस्ट होते

तुम्ही जर रोज सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्त्याची पाने खाल्ली, तर तुमची इम्युनिटी वाढेल यामध्ये. यामध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात. कढीपत्त्याच्या पानांमुळे अनेक आजारांपासून आणि इन्फेक्शन पासून तुमच्या शरीराचे संरक्षण होते.

डोळ्याची दृष्टी वाढते | Curry Leaves

डोळ्याच्या दृष्टी वाढण्यासाठी कढीपत्ताच्या पानांचा खूप चांगला वापर होतो. कढीपत्त्याच्या पानांमध्ये विटामिन ए असते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते. तसेच वाढत्या वयासोबत तर डोळ्या संबंधित काही आजार असतील तर ते देखील दूर होतात.

कढीपत्त्याची पाने कशी खावी ?

तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी पाच ते सात कडीपत्त्याची पाने चावून खा. त्यानंतर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकता. तुम्ही जर नियमितपणे एक महिना या पानांचे सेवन केले, तर काही दिवसातच तुमच्या शरीरात अद्भुत बदल होतील.

चार्जिंगला असताना Iphone 14 चा स्फोट; ‘या’ चुका तुम्ही तर करत नाही ना?

Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजपर्यंत आपण फोन चार्जिंगला लावलेला असताना त्याचा स्फोट झाल्याचा किंवा जाळ झाल्याच्या अनेक घटना ऐकलेल्या आहेत. अशातच आता चीनमधून एक भयंकर घटना समोर येत आहे. ती म्हणजे एका महिलेने सांगितले आहे की, रात्रभर तिने मोबाईल चार्ज करायला लावलेला होता. त्यावेळीच आयफोन 14 प्रो मॅक्स अचानक बॉम्ब सारखा फुटला. आणि तिच्या हाताला देखील गंभीर दुखापत झालेली आहे. आजकाल स्मार्टफोनच्या कंपन्या त्यांच्या सेफ्टी फीचर्स बद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. परंतु प्रत्यक्षात तशा कोणत्याही सेफ्टी नसल्याचे पाहायला मिळते. परंतु आता हा स्फोट नक्की कसा होतो? हा स्पॉट लागू नये, यासाठी कोणत्या चुका करू नयेत. म्हणून हे आज आपण जाणून घेणार आहोत.

ओव्हर चार्जिंगमुळे स्फोट होतो

चीनमधील या महिलेने रात्रभर फोन चार्जिंगला ठेवला असल्याने ही घटना घडलेली आहे. सकाळी उठल्यावर तिचा फोन पेटलेला दिसला. तसेच तिच्या ब्लांकेटला आणि खोलीच्या काही भागांना देखील आग लागली, असून त्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. झोपेत त्या महिलेचा हात चुकून त्या आगीला लागला. त्यावेळी तिच्या हाताला आणि मागील भागाला देखील भाजलेले आहे.

त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे लोक देखील गेले होते. त्या स्फोटमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या घटनेचे व्हिडिओ फुटेज देखील समोर आलेले आहे. या फोटोमध्ये महिलेचे ब्लॅंकेट जळलेले आहेत. तसेच भिंत देखील धुराने काळी झालेली आहे. ही आग अत्यंत भयंकर होती. त्यामुळे नुकसान देखील झालेले आहे. या महिलेने हा आयफोन २०२२ मध्ये खरेदी केला होता. आणि त्याची गॅरंटी देखील संपली होती.

कोणत्या चुका टाळाव्या

इतर कोणत्याही चार्जरचा वापर करू नये

आपल्या स्मार्टफोनला चार्जिंग करताना मोबाईलच्या चार्जर चार्जिंग करावी. जर इतर चार्जर चार्जिंग केली, तर त्यामुळे मोबाईल डॅमेज होऊ शकतो आणि आपला फोन देखील फुटू शकतो.

चार्जिंग करताना मोबाईल वापरू नये

अनेक लोक हे आजकाल चार्जिंग करताना मोबाईल फोन वापरत असतात परंतु चार्जिंग करताना मोबाईल फोन वापरणे चुकीचे असते. चार्जिंग चालू असताना मोबाईलच्या इंटर्नल सिस्टीम चालू असतात. त्यामुळे मोबाईलचे स्पोट होण्याची शक्यता होते.

चार्जिंग करताना कव्हर वापरणे

अनेक लोक मोबाईल चार्जिंग करताना कव्हर सोबतच मोबाईल चार्जिंगला लावतात. परंतु कव्हरसोबत जर मोबाईल चार्जिंगला लावला, तर त्यामुळे देखील मोठे नुकसान होऊ शकते.

मोबाईल रात्रभर चार्जिंगला ठेवू नका

अनेक लोक हे मोबाईल रात्रभर चार्जिंगला ठेवतात. परंतु असे अजिबात करू नये. फोनचा ब्लास्ट होण्याचे हे एक मोठे कारण आहे. तुमची जर चार्जिंग प्रमाणापेक्षा जास्त झाली, तरी देखील मोबाईलच स्फोट होऊ शकतो.

PM Vidyalaxmi Scheme | PM विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखापर्यंत लाभ; जाणून घ्या पात्रता

PM Vidyalaxmi Scheme

PM Vidyalaxmi Scheme | सरकार हे समाजातील सगळ्या नागरिकांचा विचार करून विविध योजना आणत असतात. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना झालेला आहे. अनेक विद्यार्थी हे पैसे नसल्या कारणाने पुढचे शिक्षण घेत नाही. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे. तसेच त्यांचे करिअर चांगले घडावे. याची जबाबदारी आता सरकारने घेतली आहे. यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पीएम विद्या लक्ष्मी योजना (PM Vidyalaxmi Scheme) सुरू केलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील या योजनेला मंजुरी दिलेली आहे. परंतु आता ही योजना नक्की कोणासाठी आहे? या योजनेचा कसा फायदा होणार आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

विद्यार्थ्यांना किती लाभ मिळणार ? | PM Vidyalaxmi Scheme

पीएम विद्या लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी याचा लाभ मिळणार आहे ल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणतीही आर्थिक अडचणी येऊ नये. पैशाच्या अभावी त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये. यासाठी आता सरकारने ही योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येणार आहे.

सरकारकडून किती कर्ज मिळणार ?

विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळावे. यासाठी अनेक योजना सुरू झालेल्या आहेत. सरकारच्या या पीएम विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होते. पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक कर्ज देण्यात येणार आहे. दरवर्षी जवळपास 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

योजनेचे नियम

भारत सरकार हे 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी 75 टक्के क्रेडिट गॅरंटी देखील देणार आहे. त्यामुळे बँकांना विद्यार्थ्यांसाठी त्यांचे कव्हरेज आणि समर्थन वाढवण्यात मदत होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपर्यंत आहे. अशा विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याजदर आकारले जाणार आहे. तसेच वार्षिक उत्पन्न 4.5 रुपये लाख रुपयांपर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण व्याजाची सवलत मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया कशी करायची ?

या योजनेसाठी पीएम विद्यालक्ष्मी (PM Vidyalaxmi Scheme) नावाचे एक एकात्मिक ऑनलाईन पोर्टल सुरू केलेले आहे. येथे विद्यार्थी कर्ज आणि व्याज सवलतीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी सर्व बँकांमध्ये अर्ज प्रक्रिया एकत्रित केली जाईल. आणि अर्जदारांना सुलभ अनुभव घेता. येईल ई-वाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी वॉलेटच्या माध्यमातून व्याज सवलतीची देयके सुलभ केली जाणार आहेत.

प्रॉपर्टी खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी; वाचतील लाखो रुपये

property

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोक जमीन घेण्यात किंवा प्लॉट घेण्यामध्ये त्यांचे जास्त पैसे गुंतवत असतात. नुकताच एक सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. त्यानुसार असे समोर आले आहे की, आजकाल बहुतांश लोक हे प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात. बँकेतील ठेवी, सोने गाड्यांपेक्षा, मालमत्ता खरेदी करण्यामध्ये जास्त पैसा गुंतवला जात आहे. तसा विचार केला तर मालमत्ता खरेदी करणे तितके सोपे नाही. जर कोणताही फ्लॅट खरेदी करायचा असो किंवा कोणतीही जमीन खरेदी करायचा असेल, तर त्यासाठी खूप मोठी जोखीम देखील घ्यावी लागते. सामान्य माणसांच्या आयुष्यातील ही सगळ्यात मोठी गुंतवणूक असते. जर तुम्ही यामध्ये छोटीशी चूक केली, तर तुमचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणतेही प्रॉपर्टी खरेदी करताना, तुम्हाला योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे. आता प्रॉपर्टी खरेदी करताना कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी घेणार असेल तर त्यासाठी त्या आधी त्या भागातील लोकांना जाऊन भेटा. आणि प्रॉपर्टीचे त्या ठिकाणी साधारण दर किती आहेत? या सगळ्याची माहिती जाणून घ्याम त्यानंतर विकासक आणि इतर गोष्टींची देखील चर्चा करा. तसेच अनेक डेव्हलपर्स सणासुदीच्या काळात घर खरेदी करणाऱ्या लोकांसाठी ऑफर देत असतात. या ऑफरची तुम्ही माहिती घ्या. त्या सवलतीचा देखील तुम्हाला फायदा घेता येईल.

तुम्हाला जर घर खरेदी करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या बजेटनुसार घर खरेदी करा. अन्यथा नंतर तुमच्यावर आर्थिक भार वाढू शकतो. तुम्हाला किती मोठे घर पाहिजे आहे? तसेच केवढा फ्लॅट हवा आहे? हे आधी ठरवा. तसेच तुमची आर्थिक जुळवाजुळव करा. आणि त्यानंतरच घर खरेदी करा. हे घर खरेदी करताना तुमच्या मित्रांशी तसे शेजारच्या लोकांची चर्चा करा. यामधून तुम्हाला थेट मालकाशी देखील संपर्क साधता येऊ शकतो. आणि तुमची आर्थिक भार थोडा कमी होऊ शकतो.

जर तुमचा थेट घर मालकाशी संपर्क झाला, तर तुमची कमिशनची रक्कम वाचू शकेल. आणि तुमच्या आर्थिक नुकसान देखील वाचेल. तुम्ही असलेल्या किमतीवर पाच टक्क्यांपर्यंत बचत करू शकता. यासाठी तुम्ही गृह निर्माण प्रकल्पात मालमत्ता खरेदी कराल असाल, तर कायदेशीर सर्व परवानगी घेतल्या पाहिजेत. तुम्हाला शक्य असेल, तितके रोख पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही आधीपासूनच पैशांचे जुळवाजवळ करा. यामध्ये तुम्हाला जास्त सूट मिळेल. कारण एक रकमी पैसे देऊन घर कमी किमतीत देखील खरेदी करता येतात.

‘या’ कारणांमुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही; इतके दिवस पिरिअड न येणे सामान्य

periods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मासिक पाळी ही महिलांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु आज काल जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. बाहेर तळलेले पदार्थ खाणे तसेच इतर चुकीच्या वाईट सवयींमुळे आजकाल मासिक पाळीमध्ये (Periods) अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अनेक महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता आलेली आहे. परंतु मासिक पाळी योग्य वेळेत न येण्याची अनेक कारण आहेत. जर मासिक पाळी नियमित न येण्याची कारणे कोणती आहेत? तुम्ही किती मासिक पाळी न येणे सामान्य गोष्ट आहे. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पीसीओएसची कारणे

आरोग्य तज्ञांच्या मते वेळेवर मासिक पाळी न येणे पीसीओएस किंवा पीसीओडी हे देखील कारण असू शकते. अनेक वेळा पीसीओएस किंवा पीसीओडीएस मुळे महिलांच्या मासिक पाळीत अनियमितता येते. यावेळी या महिलांचे ओफ्युलेशन होत नाही. त्यांच्या शरीरातील एस्ट्रोजेनची पातळी देखील वाढते. त्यामुळे त्यांच्या मासिक पाळीत अनियमितता येते.

ताणतणाव वाढणे

मासिक पाळी रेग्युलर न येण्याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे ताणतणाव. ज्या महिलांना ताणतणाव असतो. त्यांचे हार्मोनल संतुलन बिघडते. अशावेळी त्यांची मासिक पलीपाळी उशिरा येते. किंवा काही महिने येत देखील नाही. परंतु अशा वेळी त्यांना इतर अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

लठ्ठपणा

आजकाल बदलत्या जीवनशैली मुळे लठ्ठपणा वाढत चालला आहे. आणि हे मासिक पाळी न येण्याचे एक मुख्य कारण आहे. ज्या महिलांचे वजन जास्त आहे. त्यांच्या शरीरात इस्ट्रोजनची पातळी जास्त होते. आणि याचा परिणाम त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर होतो. त्याचप्रमाणे त्यांना इतर अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

प्रमाणापेक्षा जास्त वजन कमी होते

वजन अतिशय कमी असणे हे देखील मासिक पाळी नियमित न येण्याचे एक कारण आहे. तुमचे वजन जर अचानक जास्त कमी झाले, तरी देखील तुमच्या शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते. अशावेळी तुम्हाला नियमित मासिक पाळी येत नाही.

गर्भनिरोधक औषधे घेणे

अनेक महिला या गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करतात. परंतु या गोळ्यांचा महिलांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. या गोळ्यांचे सातत्याने सेवन केल्याने मासिक पाळी येण्यास अडचण निर्माण होते. तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.

21 ते 30 दिवसांची मासिक सायकल असणे अगदी सामान्य गोष्ट आहे. पण जर 6 आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवस मासिक पाळी तुम्हाला आली नाही, तर ती मात्र गंभीर गोष्ट आहे. अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य तपासणी करून घेतली पाहिजे. आणि त्यानुसार तुमच्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे.

कुटुंबासोबत भेट द्या बेटांच्या दुनियेला ; IRCTC चे स्वस्तात मस्त टूर पॅकेज

Andaman tour

देशभर दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. अद्यापही शाळा सुरु झाल्या नसल्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत एक झक्कास ट्रिप नक्कीच प्लॅन करू शकता. IRCTC कडून बेटांची दुनिया म्हणजेच अंदमान-निकोबार ट्रिप चे खास नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पॅकेजमध्ये तुमचा प्रवास, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असेल. चला जाणून घेऊया या खास टूर पॅकेज बद्दल ..

IRCTC च्या या टूर पॅकेज चे नाव LTC ANDAMAN AIR PACKAGE असे आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला 5 रात्री आणि 6 दिवस प्रवास करण्याची संधी मिळेल. या सहलीला कोलकाता येथून सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला अंदमानमधील अनेक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.

किती दिवसांची ट्रिप ?

ही सहल 5 रात्री आणि 6 दिवसांची असेल. हे पॅकेज 9 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 07 डिसेंबरसाठी आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तारीख निवडा आणि पॅकेज बुक करू शकता. हे पॅकेज बुक केल्यावर तुम्हाला फ्लाइटने अंदमानला नेले जाईल.

किती येईल खर्च ?

या पॅकेजमध्ये, तुम्ही सिंगल ऑक्युपन्सीसाठी तिकीट बुक केल्यास तुम्हाला65,225रुपये, डबल शेअरिंग 48,155रुपये, ट्रिपल शेअरिंग 46,455 रुपये खर्च येईल. या सहलीत 5 ते 11 वर्षांचे मूल तुमच्यासोबत गेले तर तुम्हाला 39,275 रुपये मोजावे लागतील. तर 2 ते 5 वर्षांचे मूल गेल्यास 35,810 रुपये मोजावे लागतील.

आधीक माहितीसाठी 8595904080/ 8595904073 या क्रमांकावर संपर्क करू शकता. किंवा www.irctctourism.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.

अमेरिकेतील निवडणुकानंतर , सोन्याचा भाव एका दिवसात 2000 रुपयांनी घसरला, चांदीच्या दरातही घसरण

gold rate

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. यानंतर लगेचच सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झाला असून दोन्हीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. MCX वर सोन्याचा भाव 76,500 पर्यंत खाली उतरला आहे. तर एमसीएक्स वर सोन्याचा वायदा काल 78 हजार 593 रुपयांवर ट्रेंड करत होता. COMEX मध्ये सुद्धा सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. US मध्ये सोन्याचा दर जवळपास 100 डॉलरली घसरला होता. 30 ऑक्टोबरला सोन्याचा दर 2802 डॉलर इतका रेकॉर्ड झाला होता. त्यामध्ये 150 डॉलर ने घसरण झाली आहे.

चांदीचे दर

चांदीच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास चांदीचे दर MCX वर 90 हजार पाचशे रुपयांपर्यंत घसरले आहेत. चांदीच्या दरात चार टक्के घसरण झाली आहे. 23 ऑक्टोबरला चांदीचा दर एक लाख 81 रुपये होता. तरCOMEX वर सलग दुसऱ्या आठवड्यात हे घसरण झालेली दिसून येत आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये चांदीचा दर काल 31 डॉलर ने घसरला आहे.

डॉलर इंडेक्स वाढला

तज्ञांच्या म्हणण्यानुसार डॉलर इंडेक्स चार महिन्यात सर्वाधिक उंचीवर गेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलर इंडेक्स आणि बॉण्ड इल्ड यामध्ये तेजी आली आहे. तर सोन्याच्या दरातील चढ-उतार हे इतरही कारणांमुळे होत असतात. यामध्ये सोन्याची मागणी तसेच अन्य कारणे असतात.

भारतातील आजचे दर

तर भारतात आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर काय आहे? याबाबत माहिती घेतली असता गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरेट 1g सोन्याचा दर 7200 इतका असून आज सोन्याच्या दरात 165 रुपयांची घसरण झाली आहे. तर आज 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा दर 7856 रुपये इतका असून यामध्ये 179 रुपयांची घसरण झाली आहे. तर अठरा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा दर पाच हजार 891 रुपये इतका असून यामध्ये 135 रुपयांची घसरण झाली आहे.

लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा 2100 रुपये, वाचा महायुतीच्या जाहीरनाम्यातील महत्वपूर्ण गोष्टी

mahayuti sarkar

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पंधरा दिवस शिल्लक असतानाच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ,यांच्या महायुतीने आपला धमाकेदार जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणारी पंधराशे रुपये ची रक्कम 2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यातील काही इंटरेस्टिंग फॅक्टर्स विषयी जाणून घेणार आहोत

महिलांसाठी विविध योजना, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ,शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिलात कपात, 25 लाख रोजगार निर्मिती अशी आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.” केलंय काम भारी, आता पुढची तयारी” अशी टॅग लाईन असलेला जाहीरनामा राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेसाठी राज्यभरातून तब्बल अडीच कोटी महिलांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत महिलांना तीन हप्ते अदा करण्यात आले असून निवडणूक झाल्यानंतर पुढचा हप्ता देण्यात येणार आहे. फक्त निवडणूक कालावधीत या योजनेच्या अंमलबजावणी निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. विरोधकांनी प्रचंड टीका करूनही ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली.

बहिणींना 1500 ऐवजी मिळणार 2100 रुपये

महायुतीच्या जाहीरनाम्यात पहिलेच वचन लाडक्या बहिणींसाठी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणारी पंधराशे रुपयाची रक्कम वाढवून ती 2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन या जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे. एखादी योजना आणल्यानंतर तिची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्याचा महायुती सरकारचा लौकिक आहे. महिलांना प्राधान्य देताना महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलीस दलात समाविष्ट करण्याचे आश्वासन देखील महायुतीने दिले आहे.

वृद्ध पेन्शन धारकांनाही आता 2100 रुपये देणार

शेती हा महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, बदललेले हवामान तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घडणाऱ्या विपरीत घडामोडी यामुळे शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरू लागला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे जाहीरनाम्यावरून दिसून येत आहे. राज्यातील बळीराजाला देखील या जाहीरनाम्यात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचे अत्यंत महत्त्वपूर्ण आश्वासन मायावतीच्या जाहीरनाम्यात देण्यात आले असून शेतकरी सन्मान योजनेतून मिळणारी रक्कम बारा हजार वरून पंधरा हजार रुपये करणार असल्याचे महायुतीने म्हटले आहे. एमएसपी वर 20 टक्के अनुदान देणार असल्याचेही महायुतीने स्पष्ट केले आहे. प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाराण देणार असून वृद्ध पेन्शन धारकांची पेन्शनची रक्कम पंधराशे रुपये वरून 2100 रुपये करणार असल्याचा वादा महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. वृद्ध पेन्शन धारकांसाठी ही खूपच समाधानकारक बाब ठरणार आहे.

अंगणवाडी, आशा सेविकांना 15 हजार वेतन देणार

जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवल्या जाणार असून 25 लाख रोजगार निर्मिती आणि दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन देणार असल्याचे महायुती म्हणते. अर्थात विद्यावेतनयोजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच केली आहे. ग्रामीण भागातील रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या विषयाला स्पर्श करताना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तब्बल 45 हजार गावांमध्ये पानंद रस्ते बांधण्याचे वचन महायुतीने दिले आहे. तळागाळात काम करणाऱ्या अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये वेतन आणि विमा संरक्षण देणार असल्याचे महायुतीचा जाहीरनामा सांगतो. या आश्वासनाच्या माध्यमातून देखील तळागाळात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे

वीज बिलात 30 % कपात करणार

भरमसाठ वीज बिल ही वीज ग्राहकांची मोठी समस्या आहे. शेतकऱ्यांना मोफत कृषी दिन मिळण्याची योजना सरकारने यापूर्वीच सुरू केली आहे. आता विज बिलात 30 टक्के कपात करून सौर आणि अक्षय उर्जेवर भर देणार असल्याचे महायुती म्हणते. भविष्यातील महाराष्ट्र कसा असेल, सरकारच्या योजना काय काय आहेत आणि त्याची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे याची दिशा दर्शविणारा व्हिजन महाराष्ट्र@ 2029 सरकार स्थापनेच्या नंतर शंभर दिवसात सादर करण्याचे आश्वासनही महायुतीच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

सर्वच घटकांचा बारकाईने विचार

एकूणच महायुतीच्या जाहीरनाम्यात महिला, वृद्ध, तरुण, शेतकरी अशा सर्वच समाज घटकांचा बारकाईने विचार करण्यात आला असून त्यांच्या कल्याणासाठी योजनांचे सुतोवाच करण्यात आले आहे. व्यक्तिगत लाभाच्या योजना देण्याबरोबरच महाराष्ट्र सक्षम करण्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या अधिक प्रगत करण्यासाठी ठोस उपाययोजना देखील या जाहीरनाम्यात सांगण्यात आल्या आहेत. वीज बिलात कपात करण्याच्या आश्वासन देताना सौर ऊर्जा निर्मितीवर प्राधान्य देणार असल्याचे त्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. म्हणजेच कमी बिलातून निर्माण होणारी तूट कोणत्या पर्यायाने भरून काढणार याचे उत्तरही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

महायुती सरकारने राज्यात विविध योजना आणल्या असून अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे नेले आहेत. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, अमरावती येथे टेक्सटाईल पार्क, महापे येथे सेमीकंडक्टर संदर्भातील प्रकल्प, विदर्भात सुरजागड येथील प्रकल्प, सौर ऊर्जा निर्मिती करणारे कंपनीची स्थापना आणि त्या संदर्भातील करार, विविध नदी जोड प्रकल्पांना मान्यता आणि गती, मोफत कृषी वीज, वाढवण बंदराला मान्यता, रखडलेल्या प्रकल्पांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता, राज्यभरात जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या उभारणीला गती अशी अनेक कामे महायुती सरकारच्या काळात होत आहेत आणि झाली आहेत. त्यामुळेच “केलंय काम भारी, आता पुढची तयारी” अशी टॅग लाईन या जाहीरनाम्याला देण्यात आली असून “विकासनीती म्हणजे महायुती” अशी जोड देखील देण्यात आली आहे.

सलमान खाननंतर आता शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

SRK

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याच्यानंतर आता सुपरस्टार शाहरुख खानचेही नाव या प्रकरणात सामील असल्याची बातमी येत आहे, ज्याला रायपूरमधील एका व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले असून धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीने अभिनेत्यानकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:21 वाजता शाहरुख खानच्या नावाने वांद्रे पोलिसांना धमकीचा कॉल आला होता. कॉलर म्हणाला की , “बँड स्टँड असलेला शाहरुख खान मन्नत मध्ये आहे ना… जर त्याने मला ५० लाख रुपये दिले नाहीत, तर मग मी त्याला मारीन”. पोलिसांनी कॉलरला त्याची ओळख विचारली तेव्हा त्याचे उत्तर होते, ” माझे नाव काय आहे याने काही फरक पडत नाही… लिहायचेच असेल तर माझे नाव हिंदुस्थानी लिहा.”

शाहरुख खानने 2 नोव्हेंबरला त्याचा 59 वा वाढदिवस साजरा केला आणि आता अवघ्या 5 दिवसांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखला ही धमकी छत्तीसगडच्या रायपूर येथील एका व्यक्तीकडून मिळाली आहे.

मन्नतची सुरक्षा वाढवली

धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलिसांनी शाहरुख खानच्या मुंबईतील मन्नत येथील घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. याच प्रमाणे अभिनेता सलमान खानला सुद्धा धमक्या येऊ लागल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.